SHRIMANT

Friday, March 6, 2026

सुरेश वडगावकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर उत्साहात

डिजिटल मीडिया mee24taas सुरेश वडगावकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या औचित्य साधून शिवतेज मित्र मंडळाच्या तर्फे सामाजिक बांधिलकी जपत मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पद्मश्री मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या वतीने या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ४२१ नागरिकांची नेत्र तपासणी करून आवश्यक त्यातील २१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली. या २१ रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. डोळ्यांचे आरोग्य, योग्य आहार, नियमित तपासणी याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. त्याचबरोबर रेड ब्लड बँकेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे राष्ट्रीय संरक्षण स्वयंसेवक संघाचे कार्यवाही नरेंद्र पेंडसे, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, जैन साधू पंकज मुनी, सुरेश वडगावकर, अजित वडगावकर, शंतनू पोफळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या सामाजिक उपक्रमांमुळे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यास सेवा व समर्पणाची जोड मिळाली. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत अशा विधायक उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी आणि जनजागृतीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मुंगसे यांनी तर सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

ज्ञानेश्वरी ग्रंथावर विधान प्रकरणी स्वामी गोविंददेवगिरी यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे निषेध आळंदी मंदिरात आज्ञानेश्वरी ग्रंथावर विधान प्रकरणी स्वामी गोविंददेवगिरी यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे निषेध लगेच सत्कार

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आचार्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकाराम’ या राष्ट्रीय परिषदेत केलेल्या विधानाचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या वतीने तीव्र निषेध करीत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज आणि श्री संत तुकाराम यांच्या ग्रंथांमध्ये वाङ्मय हे ग्रंथ नाहीत, ते भाष्य व संकलन आहे, अशा आशयाचे विधान केल्याचा आरोप संस्थान कमिटीने केला आहे.
आळंदी संस्थान कमिटीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत व मराठी भाषेत साकारलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ अत्यंत सहज, सुंदर, रसाळ व अलंकारिक भाषेत लिहिलेला असून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा आधार आहे. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे यासाठी ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या उपसंहारात संत ज्ञानेश्वरांनी स्वतः ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले असून, माझा आत्माराम बोली, माणसांमध्ये मिसे | वर्णिला शांतेशी तो हा ग्रंथु || अशा ओवी द्वारे ग्रंथाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. त्या मुळे संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथ रचने बाबत केलेले विधान अयोग्य असल्याचे संस्थानने निवेदनातून म्हटले आहे. तसेच, संस्कृत गीतेमागील प्राकृत मराठी शब्द वाचले तर मराठी शब्द हे गीतेच्या वाणीचा अर्थ उलगडतात, असे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये नमूद केले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ भाष्य नसून स्वतंत्र आणि प्रगल्भ ग्रंथ रचना असल्याचे ही संस्थानने स्पष्ट केले. स्वामी गोविंददेव गिरी यांनी केलेल्या विधानाशी संस्थान कमिटी असहमत असून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याचा व संत परंपरेचा आदर राखून संबंधितांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि संतांची क्षमा मागावी, अशी मागणीही संस्थानने केली आहे. आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ गुरुशांतिनाथ, चैतन्य केशवराव लोंढे , अ‍ॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. आळंदी मंदिरात आचार्य गोविंददेवगिरी यांचा संस्थान तर्फे सत्कार गोविंद गिरी महाराज प्रकरणा वरून वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत असतानाच देहूत विरोध झाला. तर आळंदी देवस्थानने सकाळी जाहीर निषेध करीत दुपारी आचार्य गोविंददेवगिरी यांचा संस्थान तर्फे स्वागत करीत श्रींचे गाभाऱ्यात श्रींची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त माउली मंदिरात होता. आचार्य गोविंददेव गिरी महाराज उर्फ आचार्य किशोरजी व्यास यांनी माउली मंदिरात श्रींचे दर्शन घेत मंदिर प्रदक्षिणा केली. दरम्यान सुवर्णपिंपळ प्रांगणाचे मागील बाजूला मंदिरातून बाहेर पडताना मंदिरात साष्टांग दंडवत घातले. श्रींचे मंदिराचे कळसाचे दर्शन घेत मंदिरात पत्रकारांशी संवाद न साधता गुपचूप मार्गस्थ झाले. या वेळी बघ्यांची खूप गर्दी झाली होती. वातावरण रोषमय असल्याने त्यांचे समवेतच्या पोलिसांनी तसेच आळंदी येथील पोलिसांनी त्यांना सुरक्षा देत पुढील प्रवासास मार्ग सुखकर करून दिला. ते आळंदी मंदिरात येऊन गेल्या नंतर अनेकांना माहिती मिळाली. अनेकांनी त्यांचे वक्तव्याचा जाहीर निषेध करून आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर अनेक महाराज मंडळी, जाणकार यांनी जाहीर निषेध केला. आळंदी देवस्थानने एकीकडे जाहीर निषेध तर लगेच दुपारी मंदिरात स्वागत सत्कार केला. यावर हि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुळात जाहीर निषेधाचे पत्र जाहीर करण्यास हि देवस्थानने विलंब लावला. या साठी अनेकांनी देवस्थान ला आठवण करून दिल्या नंतर जग आली. संत ग्रंथ संपदा विषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यांमुळे धार्मिक व सामाजिक वर्तुळात लोकांच्या भावना दुखावल्या. या वरून वारकरी संप्रदायात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. संत परंपरेचा अवमान झाल्याचा आरोप करत देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थान कडून विरोध व्यक्त करण्यात आला, तर दुसरीकडे आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कडून त्यांचा सत्कार झाल्याने देवस्थान चर्चेत राहिले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रंथां विषयी केलेले वक्तव्य वारकरी संप्रदाया कडून जाहीर निषेध करण्यात आला. या वक्तव्यांमुळे वारकरी, संत-महंत आणि भाविक, भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. आळंदीत आचार्य श्रीगोविंददेवगिरी महाराज यांचा मंदिर समितीने सत्कार केल्याचे समोर आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शन घेऊन गोविंददेवगिरीजी महाराज यांनी व्यक्त केलेले शब्द ( संभाषण ) मागे घेत असल्याचे सांगत कोणाचे भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागत असल्याचे जाहीर केले. आळंदी चे पविञ्य जपण्यास वेळ येईल तेव्हा आम्ही निस्वार्थी सेवा करु हे गोविंददेवगिरीजी महाराज यांनी जाहीर केले. या मुळे वातावरण काहीसे निवळले. दरम्यान अनेक ठिकाणी वारकरी संप्रदाय मधील मान्यवरांनी निषेध व्यक्त केला.

Tuesday, March 3, 2026

खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आळंदी माऊली मंदिरात धार्मिक विधी इंद्रायणी नदीवर भाविकांची प्रथापरंपरांचे पालन करीत स्नानास गर्दी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्रीक्षेत्र आळंदीत तीर्थक्षेत्रातील प्रथा परंपरांचे पालन करीत खग्रास चंद्रग्रहण दिनी मंगळवारी ( दि. ३ ) सायंकाळी ६:४४ ते ६:४८ या कालावधीत आलेल्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरे नुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हरिनाम गजरात झाले. ग्रहणा निमित्त श्रीनां पवमान अभिषेख, जलाभिषेक, धुपारती, महानैवेद्य उत्साहात झाला.
चंद्रग्रहण काळात श्रीनां विधीवत स्नान घालून अभिषेख पूजा करण्यात आली. भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीवर पाण्याचा जलाभिषेख करण्यास गर्दी केली. ग्रहण काल उरकल्यावर माऊली मंदिरात श्रींची पूजा, आरती, महानैवेद्य परंपरांचे पालन करीत आरती, धुपारती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन वेदमंत्रजयघोषात झाले. दैनंदिन धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने झाला. चंद्रग्रहणाच्या काळात मंदिरातील धार्मिक परंपरा जोपासण्यात आल्या. भाविक, नागरिकांनी परिसरात शांततेत व हरिनाम गजरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक श्रींचे दर्शनास गर्दी करून सहभागी होतात. इंद्रायणी नदीत वेदमंत्र साधक, विध्यार्थी, जप जाप करीत ग्रहणकाळातील विशेष विधींस साधकांनी गर्दी केली. हरिनामजय घोष आणि वेदमंत्राची साधना करीत ग्रहणात विधी परंपरांचे पालन करीत केल्याचे महंत मल्हार काळे यांनी सांगितले. या वेळी राम कृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली, चंद्रग्रहण काळात अखंड नामजप साधक, भाविकांनी केला. इंद्रायणी नदीत उभे राहून वेदमंत्र, तंत्र साधकांनी ग्रहणातील प्रथा परंपरांचे पालन करीत चंद्रग्रहण पर्वणी साधली. इंद्रायणी नदीचे पाण्यात उभे राहून ध्यान धारणा, साधना करताना साधक मोठ्या प्रमाणात होते. सुमारे अडीच तास साधना केली. माऊली मंदिरात श्रींचे संजीवन समाधीवर जलाभिषेख भाविकांनी करण्यास गर्दी करून श्रींचे दर्शन केले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव हरे चा अखंड नाम जप या वेळी सुरु होता. दरम्यान सोमवारी ( दि. २ ) होलिकोत्सव विविध मंदिरांसह माऊली मंदिरात तसेच आळंदी पंचक्रोशीत हरिनाम गजरात झाला. या वेळी आळंदीतील घराघरांचे अंगणात होळी पूजन, पुरण पोळी नैवेध्य वाढविण्यात आला. उत्साहात होळी उत्सव परंपरेने संस्कृती जतन करत साजरा झाला.

Monday, March 2, 2026

सुरेश काका वडगावकर यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा दिमागदार वातावरणात संपन्न

कर्म,भक्ती व ज्ञान यांचा त्रिवेणी संगम - सुरेश धनराज वडगावकर यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न
राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणारे अलंकापुरीचे माजी नगराध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष, सकल जैन संघ (पुणे जिल्हा) उपाध्यक्ष सुरेश (काका)वडगांवकर वयाच्या ८३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या मंगलमयी गोड क्षणांचे औचित्य साधून काकांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा रविवार, दि. १ मार्च २०२६ या शुभदिनी दिमाखदार वातावरणामध्ये संपन्न झाला. या पवित्र प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कृतज्ञताभाव व्यक्त करत भक्तिमय वातावरणात सामूहिक महापूजा, आरती व नामस्मरण करण्यात आले. उपस्थित मान्यवर, नातेवाईक व भाविकांनी सुरेशकाका यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना केली. नंतर काका यांचा सहस्त्रचंद्रदर्शन विधी त्यांच्या निवासस्थानी वेदघोष, मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींसह हा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला. तदनंतर त्यांच्या निवासस्थानापासून फ्रुटवाले धर्मशाळा येथपर्यंत बग्गीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “ज्ञानोबा-तुकाराम” जय महावीर -जय आनंदच्या जयघोषात मिरवणूक उत्साहात पार पडली. सजवलेल्या बग्गीत सुरेश वडगावकर यांचे मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी , औक्षण, सत्कार करून स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, जैन बांधव ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेली ही मिरवणूक सर्वांच्या स्मरणात राहणारी ठरली. दुपारी 12:30 वाजता वेदांताचार्य ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव व प.पू. जयस्मितजी म. सा. यांनी काकांच्या जीवनातील सात्त्विकता, कृतज्ञता आणि साधनेचे महत्त्व अधोरेखित करत काकांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी आशीर्वचन दिले. या सोहळ्याचे औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. भावार्थ देखणे, एम. आय. टी. पुणे चे मंगेश कराड, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, पुणे जिल्ह्याचे सकल जैन संघाचे अध्यक्ष पोपटलालजी ओस्तवाल, कार्याध्यक्ष विलास राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. संत पूजनाच्या ह.भ.प. यशोधन म. साखरे, शंकर म. पांचाळ, बाळासाहेब म. शेवाळे, पंडित म. क्षीरसागर, अशोक म. पांचाळ, पंडित कल्याण गायकवाड, सोळंके महाराज, पंडित राधाकृष्ण महाराज, बाळासाहेब म. शेळके, रामभाऊ म. राऊत, नारायण म. जाधव, संतोषानंद म. शास्त्री, ह .भ. प.नरहरी चौधरी , ह भ प मुखेकर शास्त्री या महंत, कीर्तनकार यांच वडगावकर परिवाराच्यावतीने पूजन कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. विविध विषयांवरील शैक्षणिक, संस्कारक्षम व प्रेरणादायी पुस्तकांचे माध्यमातून काकांची ग्रंथ तुला करण्यात आली व हे ग्रंथ पुस्तके ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी शेठ काळे व वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्र.विश्वस्त भावार्थ देखणे व विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा), पुणे जिल्हा शिक्षण संस्था चालक महामंडळाचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत व पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते काकांचा अभिष्टचिंतनाचा सोहळा संपन्न झाला.काकांचे औक्षण करण्यात आले. याप्रसंगी वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपालिका, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ, अखिल वारकरी गुरुकुल संघ, पत्रकार संघ आळंदी तसेच खेड पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार, नातेवाईक, इतर संस्थांच्या माध्यमातून काकांना सन्मान चिन्ह व भेटवस्तू देत त्यांना सन्मानित केले. सर्व मान्यवरांनी काकांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवत दीर्घायुष्य करिता शुभेच्छा दिल्या. सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य साधून दादासाहेब करांडे यांच्या संकल्पनेतून प्रदीप काळे व संजय कंठाळे यांच्या सहकार्यातून अवघ्या अडीच दिवसांत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नातून हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासून दरवर्षी १११ गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रू.१०००/- अशी रू.१,११००० ची "सुरेश ध. वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती" योजना जाहीर करण्यात आली. व एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश प्राचार्य राठोड,मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची शासकीय शिष्यवृत्ती न मिळणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत देण्यात येणार आहे. काकांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने विद्यालयामध्ये रांगोळी, निबंध, वकृत्व, चित्रकला आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये जवळपास ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. काकांच्या जीवन प्रवासात प्रभाव असणाऱ्या वीज क्षेत्रातील व्यक्तिमत्व वासुदेव घुंडरे ,अशोक कांबळे ,रामदास भोसले, बजरंग ठाकूर जयवंत ठाकूर ,लालचंद नहार, नंदकुमार कुऱ्हाडे , डी डी. भोसले पा., नंदकुमार कुऱ्हाडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.दोन दिवसात हजारो विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात साकारलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम म्हणून पद्मश्री मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव वतीने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मध्ये ४०० लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली .पैकी २१ जणांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन रेड ब्लड बँकेच्या माध्यमातून करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे राष्ट्रीय संरक्षण स्वयंसेवक संघाचे कार्यवाही नरेंद्र पेंडसे, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व जैन साधू पंकज मुनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याउपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. . ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील, शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे, कीर्तनकार अश्विनी इप्पर, आळंदीचे नगरसेवक रामदास भोसले, तुकाराम गवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या प्रसंगी ८३ मृदुंगांच्या निनादात हजारो वारकरी विद्यार्थ्यांच्या वतीने हरिपाठ झाला. ह. भ. प. जगन्नाथ म. पाटील यांचे किर्तन झाले.काकांचे जीवन हे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष या माध्यमातून ज्ञान, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष या माध्यमातून कर्म व जैन स्थानकाचे अध्यक्ष म्हणून भक्ती अशा ज्ञान योग ,कर्म योग, भक्ती योग या भगवद्गीतेतील तिन्ही योगांचे दर्शन घडविते. व त्याप्रमाणे ते ‌परिपूर्ण झाले असून त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता ही त्यांच्या कार्याची प्रचिती देत असल्याचे सांगितले. काकांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आळंदी नगरपालिकेचे नगरसेवक पूजा घुंडरे, कांचन येळवंडे, साक्षी कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, ऋतुजा घुंडरे, सचिन गिलबिले, हेमंत कुऱ्हाडे, गोविंद कुऱ्हाडे, अरुणा घुंडरे, दिनेश घुले, सर्व पत्रकार, वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी उपस्थित राहून काकांना शुभेच्छा दिल्या. शेवटी महाराष्ट्र शासनाच्या ‘कंठ संगीत रत्न’ पुरस्काराने सन्मानित गायक व संगीतकार पंडित कल्याण गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "माझ्या वडिलांची मिराशी गा देवा"या भावपूर्ण गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आज सोहळा आमच्या वडगावकर कुटुंबासाठी अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरले असल्याचे सांगत अजित वडगावकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष लहान थोरांपासून ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Sunday, March 1, 2026

रीडिंग (Reading, UK) 2026 शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न

रीडिंग, युनायटेड किंगडम – ‘गर्जना, रीडिंग (UK)’ यांच्या वतीने शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० ते सायं. ७.०० या वेळेत रीडिंग हिंदू मंदिर येथे भव्य शिवजयंती उत्सव २०२६ उत्साहात संपन्न झाला.

Friday, February 27, 2026

अलंकापुरीत आमलकी एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट ; इंद्रायणी आरती उत्साहात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आमलकी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी भाविकांनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदीचे वतीने इंद्रायणी आरती उत्साहात झाली. यावेळी ग्रामस्थ, महिला भाविकांची उपस्थिती होती.
आळंदी मंदिरात भाविकांनी परंपरेने एकादशी दिनी गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी संस्थानचे पदाधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी, सेवक, मानकरी, पुजारी, कर्मचारी आदि उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था व्यवस्थापक माउली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी यांचे सहकार्याने केली. मंदिरात दुपारचा फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री धुपारती परंपरेने झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास तसेच आचमनास गर्दी केली. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. मंदिरात एकादशी दिनीच धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. या मध्ये मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्ता वरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी आळंदीतील वाहतुकीचे सुरळीत नियोजन परिश्रम पूर्वक केले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेने कामकाज पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून एकादशी दिनी सोय झाली. आळंदीत भाविकानी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. आळंदीत बेकायदेशीर वाहन पार्किंग आणि बेशीस्त वाहन चालकांवर कारवाई सुरु आहे. कारवाई टाळण्यासाठी आळंदीत रस्त्यावर वाहने पार्क करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. आळंदीत बांधकाम परवानगी देताना मंजूर प्लॅन आणि प्रत्येक्षात झालेले बांधकाम आणि यात पार्किंगच्या जागांचा गैर वापर होताना आढळून आल्यास करावा करण्याचा इशारा नगरपरिषदेचे वतीने देण्यात आला आहे. या साठी फेर सर्व्हे करून पार्किंगच्या जागा पार्किंग साठी वापरल्या जाण्यासाठी दक्षता घेण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. आळंदीत पार्किंग रस्त्याचे दुतर्फ़ा न करता इमारती खालील पार्किंगचे जागेत वाहने पार्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती उत्साहात येथील इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. दर एकादशी दिनी इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदी तर्फे आरती सेवा रुजू करण्यात येते. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजक अनिता झुजम, अनिता शिंदे, नीलम कुरधोंडकर, कौशल्या देवरे, सरस्वती भागवत, शोभा कुलकर्णी, पुनम नागरे, कमल जोशी, शकुंतला फड, तारामती गोरे, संगीता देवकर, सुरेखा कुऱ्हाडे, सरूबाई मुंडे, ज्योती कोळेकर, सोनाली कोळेकर, गोविंद ठाकूर यांच्यासह पंचक्रोशीतील महिला भगिनी, भाविक उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले असल्याचे अनिता झुजम यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण मुक्तीसाठी सुरु असलेल्या उपक्रमात सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ कामकाज सुरु करण्याची गरज असल्याचे इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने संयोजक अनिता झुजम,अर्जुन मेदनकर यांनी आवाहन केले आहे. उपस्थित मान्यवरांचे हस्ते इंद्रायणीची आरती नंतर पसायदान, प्रसाद वाटप उत्साहात झाले. तत्पूर्वी इंद्रायणी सेवा समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करण्यात आली. यावेळी भाविक देखील उपस्थित होते. आळंदीतील इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन जल संवर्धनाचे एल्गार मध्ये सहभागी होण्याचे आवाहन सेवाभावी संस्था आणि सेवा भावी कार्यकर्ते यांना करण्यात आले असून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंद्रायणी आरती सेवा समितीचे पुढाकाराने सुरु झालेल्या इंद्रायणी आरतीचे उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे कार्य अधिक वाढावे यासाठी आळंदी देवस्थानने आरती उपक्रम वेगळा सुरु करून इंद्रायणी आरती सेवा समितीचे कार्य पुढे नेले असल्याचे अनिता झुजम यांनी सांगितले.

स्वसंरक्षण आधुनिक काळाची गरज ''ॲड.पदमावती पाटील

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ पुणे व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने “ निर्भय कन्या अभियान “ अंतर्गत सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आणि अँटी रॅगिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी करून दिला. विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी प्रस्ताविक प्रसंगी संबंधित कार्यक्रम विद्यार्थिनींच्या स्वयसंरक्षणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून त्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आणि अँटी रॅगिंग’ ही कार्यशाळा आयोजित करणे कसे महत्त्वाचे आहे या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ॲड. पदमावती पाटील सहसचिव- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन, यांनी अँटी रॅगिंग या विषयाला न्याय देतांना अँटी रॅगिंग ही संकल्पना काय आहे? त्याचे परिणाम काय होतात? त्यासाठी भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमांची तरतूद केलेली असून त्या बरोबरच संबंधित कायद्याला अनुसरून विद्यार्थिनीच्या बाबतीत कशी भूमिका घेणे आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर विवेचन करून महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेत कसे कायद्याचे नियोजन केलेले असून महिलांना त्या कायद्यांचा कसा फायदा होतो या संदर्भात मत मांडून स्वसंरक्षण काळाची गरज आहे या बाबत विविध उदाहरणांचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले. सेल्फ डिफेन्स या विषयावर मत मांडतांना कु.पायल पाटील- तायकांडो कराटे प्रशिक्षक, यांनी पी.पी.टी.च्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स म्हणजे काय? त्याचा उदय कधी झाला तसेच स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणाची गरज आहे त्याचबरोबर कराटेचे विविध प्रकार कोणते आहेत? लाठी काठी, नन चॉकू , हे प्रकार स्वसंरक्षणासाठी कसे महत्वपूर्ण आहेत या संदर्भात ऐतिहासिक दाखले देत प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महात्मा फुले महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शितल जाधव यांनी ‘ स्वजाणीव व आरोग्य ‘ या विषयावर भाष्य करतांना आधुनिक काळात प्रत्येक स्त्रीने स्वतःला ओळखण्याची आवश्यकता प्रतिपादन करून स्त्री ही वेळेनुसार कशाप्रकारे आई,बहीण,बायको, वाघीण तसेच नागिन बनते या संदर्भात ऐतिहासिक दाखले देऊन अनमोल मार्गदर्शन केले. तसेच आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्त्रीने आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना स्त्री पुरुष समानता आधुनिक काळात कशी महत्त्वाची असून पुरुष मानसिकता बदलण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. सद्य परिस्थितीत विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठी कसे तत्पर असले पाहिजे तसेच यासाठी स्वसंरक्षणाच्या विविध प्रकाराचे अवलोकन करून स्वसंरक्षणाचे प्रकार स्वीकारण्याची आवश्यकता विशद केली. या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खनिजदान मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी प्रवीण भावे,कार्यालयीन अधीक्षक,प्रा.प्रफुल्ल जाधव,बी.बी.ए.सी.ए.विभाग प्रमुख प्रा. रोहित कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख,प्रा.डॉ. देवानंद गोरडवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा.प्रभाकर गायकवाड, प्रा.डॉ. रंजीत कदम, प्रा. रेखा सुतार,प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. रूपाली औटे,प्रा.पूजा खेडकर,प्रा. प्राजक्ता पवार,ग्रंथालय विभाग प्रमुख,सौ.वर्षा ताजने, सचिन गावडे, वैभव बडवे,श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कला,वाणिज्य व बी.बी.ए.(सी. ए.) बी.सी.ए शाखेतील विद्यार्थिनीची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक देवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सविता मानके , भूगोल विभाग प्रमुख यांनी मानले. सदर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.

Monday, February 23, 2026

आळंदी येथे सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या नियोजन बैठकीत उत्स्फूर्त सहभाग

आळंदी नगरीत माजी नगराध्यक्ष मा.श्री सुरेश काका वडगावकर यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नियोजन बैठक उत्साहात पार पडली. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बैठकीस उपस्थित राहून आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
या बैठकीस श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे उपाध्यक्ष राजूशेठ धोका उपस्थित होते. तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व कथाकार संतोषानंद शास्त्रीजी, संदीप महाराज लोहार, बाळासाहेब शेळके महाराज यांनीही मार्गदर्शन केले. याशिवाय “ओळख ज्ञानेश्वरी” परिवाराचे संकेत वाघमारे, इंद्रायणी सेवा फाउंडेशन विठ्ठल शिंदे तसेच सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, धार्मिक विधी, अभंगवाणी, प्रवचन, कीर्तन, गायन सोहळा, काही मान्यवरांचे स्वागत सत्कार, या विषयाला घेऊन विविध शालेयस्पर्धा , रक्तदान आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, अन्नदान ,ग्रंथतुला , हुशार गरजू विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिष्यवृत्ती, संत पूजन तसेच नागरिकांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वांनी हा सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय करण्याचा निर्धार व्यक्त केला. आळंदी नगरीत होणारा हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा भक्ती, कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी उत्सव ठरणार आहे.

Sunday, February 22, 2026

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मातृ–पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा

पुणे आळंदी Mee24taas Team श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर प्रशालेत संस्कारक्षम सोहळा मातृ –पितृ पूजन मोठ्या उत्साहात साजरा झाला . कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून ह.भ.प. भाग्यश्री भाग्यवंत, उद्योजक व आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश झोंबाडे, आळंदी नगर परिषदेच्या नगरसेविका ऋतुजा घुंडरे, माजी विद्यार्थी व रोबोटिक्स इंजिनिअर नितीश साळुंखे व परिवार, संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक श्रीधर कुऱ्हाडे, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड , मुख्याध्यापक प्रदीप काळे, माध्यमिक पा.शि.संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षिरसागर , उपाध्यक्षा तेजश्री साळुंखे , ज्योती श्रीखंडे , अंजली ढगे,मनिषा देवकाते,सविता उपाध्ये, शिक्षक सूर्यकांत खुडे, संजय कंठाळे, पालक,विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
माऊलींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकाद्वारे शालेय अभ्यासक्रमा बरोबर हा संस्कारक्षम सहशालेय उपक्रम साजरा करण्यामागचा उद्देश तसेच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावेत यासाठी आई वडील, शिक्षक,शाळा यांचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. विद्यार्थिनी ईश्वरी ढगे हिने मातृ पितृ पूजन म्हणजे आई - वडीलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.आई संस्कार करते तर बाबा जगाशी लढायला शिकवतात असे सांगितले. पालक ह.भ.प. तुकाराम कुरकुटे यांनी भारतीय संस्कृतीची जोपासना ही शालेय शिक्षणातून होत असते. प्रशाला दरवर्षी हा उपक्रम राबवत असल्याबद्दल संस्था, प्रशाला यांचे आभार व्यक्त केले.ह.भ.प.मुक्ता मालुंजकर यांनी शिक्षण विकत घेता येते पण संस्कार विकत घेता येत नाहीत. गेली 18 वर्ष प्रशाला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार करत आहे. असे नमूद केले. अजित वडगावकर यांनी विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावे यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. तसेच भविष्यात वृद्धाश्रमाची संख्या कमी होण्यासाठी अशा या संस्कारक्षम उपक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. नितीन साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न,मेहनत,सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब जीवनात करा. तसेच आयुष्याचा पाया शालेय जीवनात शिक्षकांकडून घडवला जातो. त्यामुळे त्यांचा नेहमी आदर करा असे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांकरिता एक रोबोटिक मॉडेल व दहा हजार एकशे अकरा रुपये (१०१११/-)प्रशालेच्या भौतिक सुविधा करीता देऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ऋतुजा घुंडरे यांनी मुलांची प्रगती ही आई-वडिलांचे आशीर्वाद असतात. आई-वडिलांनी मुलांशी विविध विषयावर चर्चा केली, धार्मिक ऐतिहासिक स्थळी एकत्र जायला पाहिजे. त्यांच्याबरोबर एकत्र वेळ घालवला पाहिजे असे विचार व्यक्त केले. सुरेश झोंबाडे यांनी आई-वडिलांचे महत्त्व सांगत आईसाठी तिच्या आजारपणात वेळ देता यावा या कारणास्तव आपण सरकारी नोकरी सोडल्याचे सांगितले. व तिची सेवा केल्याने उद्योगधंद्यात नाव कमवू शकलो तसेच आई-वडिलांच्या आशीर्वादाने, संस्काराने आज समाजात मानाचे जीवन जगत आहे असे सांगितले. प्रशालेच्या भौतिक सुविधांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. ह.भ.प.भाग्यश्री भाग्यवंत यांनी भक्त पुंडलिकाचे उदाहरण देत आई ,वडील,मुले यांनी मोबाईल, टीव्ही इ. सोशियल मीडियापासून दूर राहून एकमेकांना वेळ द्यावा असे सांगत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेची सहल यावर्षी रायगड किल्ल्यावर गेली होती सहलीवर आधारित परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील तीन क्रमांकाचे विद्यार्थी व एक उत्तेजनार्थ विद्यार्थ्यास मान्यवरांच्या हस्ते वस्तुरूप बक्षीस, प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. सहलीसाठी पाच हजार रुपये योगदान दिलेले पालक हेमंत जामदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना कुमकुम तिलक करून फुले वाहून पालकांच्या गळ्यात हार घातला. तदनंतर पालकांनी मुलांना कुमकुम तिलक करत आपल्या गळ्यातील हार मुलांच्या गळ्यात घातले. मुलांनी आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवून वंदन केले. मुलांनी आई-वडिलांच्या भोवती सात प्रदक्षिणा घातल्या व आई-वडिलांची सेवा करण्याचा दृढ निश्चय केला. आई-वडिलांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून "त्रिलोचन बना व आयुष्यात यशस्वी व्हा" असे आशीर्वाद दिले. मुलांनी पालकांना व पालकांनी मुलांना गोड खाऊ देऊन तोंड गोड केले अशा रीतीने मातृ-पितृ पूजनाचा भावपूर्ण सोहळा संपन्न झाला. वैशाली शेळके आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. राहुल चव्हाण,आरती गावडे यांनी सूत्रसंचालन केले.निशा कांबळे वर्षा काळे,प्रतिभा भालेराव, गीतांजली मोरस्कर, गजानन राठोड,राजू सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.