SHRIMANT

Friday, February 27, 2026

अलंकापुरीत आमलकी एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट ; इंद्रायणी आरती उत्साहात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आमलकी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी भाविकांनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदीचे वतीने इंद्रायणी आरती उत्साहात झाली. यावेळी ग्रामस्थ, महिला भाविकांची उपस्थिती होती.
आळंदी मंदिरात भाविकांनी परंपरेने एकादशी दिनी गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी संस्थानचे पदाधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी, सेवक, मानकरी, पुजारी, कर्मचारी आदि उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था व्यवस्थापक माउली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी यांचे सहकार्याने केली. मंदिरात दुपारचा फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री धुपारती परंपरेने झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास तसेच आचमनास गर्दी केली. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. मंदिरात एकादशी दिनीच धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. या मध्ये मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्ता वरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी आळंदीतील वाहतुकीचे सुरळीत नियोजन परिश्रम पूर्वक केले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेने कामकाज पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून एकादशी दिनी सोय झाली. आळंदीत भाविकानी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. आळंदीत बेकायदेशीर वाहन पार्किंग आणि बेशीस्त वाहन चालकांवर कारवाई सुरु आहे. कारवाई टाळण्यासाठी आळंदीत रस्त्यावर वाहने पार्क करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. आळंदीत बांधकाम परवानगी देताना मंजूर प्लॅन आणि प्रत्येक्षात झालेले बांधकाम आणि यात पार्किंगच्या जागांचा गैर वापर होताना आढळून आल्यास करावा करण्याचा इशारा नगरपरिषदेचे वतीने देण्यात आला आहे. या साठी फेर सर्व्हे करून पार्किंगच्या जागा पार्किंग साठी वापरल्या जाण्यासाठी दक्षता घेण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. आळंदीत पार्किंग रस्त्याचे दुतर्फ़ा न करता इमारती खालील पार्किंगचे जागेत वाहने पार्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती उत्साहात येथील इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. दर एकादशी दिनी इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदी तर्फे आरती सेवा रुजू करण्यात येते. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजक अनिता झुजम, अनिता शिंदे, नीलम कुरधोंडकर, कौशल्या देवरे, सरस्वती भागवत, शोभा कुलकर्णी, पुनम नागरे, कमल जोशी, शकुंतला फड, तारामती गोरे, संगीता देवकर, सुरेखा कुऱ्हाडे, सरूबाई मुंडे, ज्योती कोळेकर, सोनाली कोळेकर, गोविंद ठाकूर यांच्यासह पंचक्रोशीतील महिला भगिनी, भाविक उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले असल्याचे अनिता झुजम यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण मुक्तीसाठी सुरु असलेल्या उपक्रमात सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ कामकाज सुरु करण्याची गरज असल्याचे इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने संयोजक अनिता झुजम,अर्जुन मेदनकर यांनी आवाहन केले आहे. उपस्थित मान्यवरांचे हस्ते इंद्रायणीची आरती नंतर पसायदान, प्रसाद वाटप उत्साहात झाले. तत्पूर्वी इंद्रायणी सेवा समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करण्यात आली. यावेळी भाविक देखील उपस्थित होते. आळंदीतील इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन जल संवर्धनाचे एल्गार मध्ये सहभागी होण्याचे आवाहन सेवाभावी संस्था आणि सेवा भावी कार्यकर्ते यांना करण्यात आले असून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंद्रायणी आरती सेवा समितीचे पुढाकाराने सुरु झालेल्या इंद्रायणी आरतीचे उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे कार्य अधिक वाढावे यासाठी आळंदी देवस्थानने आरती उपक्रम वेगळा सुरु करून इंद्रायणी आरती सेवा समितीचे कार्य पुढे नेले असल्याचे अनिता झुजम यांनी सांगितले.

स्वसंरक्षण आधुनिक काळाची गरज ''ॲड.पदमावती पाटील

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ पुणे व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने “ निर्भय कन्या अभियान “ अंतर्गत सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आणि अँटी रॅगिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी करून दिला. विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी प्रस्ताविक प्रसंगी संबंधित कार्यक्रम विद्यार्थिनींच्या स्वयसंरक्षणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून त्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आणि अँटी रॅगिंग’ ही कार्यशाळा आयोजित करणे कसे महत्त्वाचे आहे या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ॲड. पदमावती पाटील सहसचिव- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन, यांनी अँटी रॅगिंग या विषयाला न्याय देतांना अँटी रॅगिंग ही संकल्पना काय आहे? त्याचे परिणाम काय होतात? त्यासाठी भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमांची तरतूद केलेली असून त्या बरोबरच संबंधित कायद्याला अनुसरून विद्यार्थिनीच्या बाबतीत कशी भूमिका घेणे आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर विवेचन करून महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेत कसे कायद्याचे नियोजन केलेले असून महिलांना त्या कायद्यांचा कसा फायदा होतो या संदर्भात मत मांडून स्वसंरक्षण काळाची गरज आहे या बाबत विविध उदाहरणांचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले. सेल्फ डिफेन्स या विषयावर मत मांडतांना कु.पायल पाटील- तायकांडो कराटे प्रशिक्षक, यांनी पी.पी.टी.च्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स म्हणजे काय? त्याचा उदय कधी झाला तसेच स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणाची गरज आहे त्याचबरोबर कराटेचे विविध प्रकार कोणते आहेत? लाठी काठी, नन चॉकू , हे प्रकार स्वसंरक्षणासाठी कसे महत्वपूर्ण आहेत या संदर्भात ऐतिहासिक दाखले देत प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महात्मा फुले महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शितल जाधव यांनी ‘ स्वजाणीव व आरोग्य ‘ या विषयावर भाष्य करतांना आधुनिक काळात प्रत्येक स्त्रीने स्वतःला ओळखण्याची आवश्यकता प्रतिपादन करून स्त्री ही वेळेनुसार कशाप्रकारे आई,बहीण,बायको, वाघीण तसेच नागिन बनते या संदर्भात ऐतिहासिक दाखले देऊन अनमोल मार्गदर्शन केले. तसेच आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्त्रीने आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना स्त्री पुरुष समानता आधुनिक काळात कशी महत्त्वाची असून पुरुष मानसिकता बदलण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. सद्य परिस्थितीत विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठी कसे तत्पर असले पाहिजे तसेच यासाठी स्वसंरक्षणाच्या विविध प्रकाराचे अवलोकन करून स्वसंरक्षणाचे प्रकार स्वीकारण्याची आवश्यकता विशद केली. या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खनिजदान मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी प्रवीण भावे,कार्यालयीन अधीक्षक,प्रा.प्रफुल्ल जाधव,बी.बी.ए.सी.ए.विभाग प्रमुख प्रा. रोहित कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख,प्रा.डॉ. देवानंद गोरडवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा.प्रभाकर गायकवाड, प्रा.डॉ. रंजीत कदम, प्रा. रेखा सुतार,प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. रूपाली औटे,प्रा.पूजा खेडकर,प्रा. प्राजक्ता पवार,ग्रंथालय विभाग प्रमुख,सौ.वर्षा ताजने, सचिन गावडे, वैभव बडवे,श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कला,वाणिज्य व बी.बी.ए.(सी. ए.) बी.सी.ए शाखेतील विद्यार्थिनीची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक देवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सविता मानके , भूगोल विभाग प्रमुख यांनी मानले. सदर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.

Monday, February 23, 2026

आळंदी येथे सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या नियोजन बैठकीत उत्स्फूर्त सहभाग

आळंदी नगरीत माजी नगराध्यक्ष मा.श्री सुरेश काका वडगावकर यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नियोजन बैठक उत्साहात पार पडली. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बैठकीस उपस्थित राहून आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
या बैठकीस श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे उपाध्यक्ष राजूशेठ धोका उपस्थित होते. तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व कथाकार संतोषानंद शास्त्रीजी, संदीप महाराज लोहार, बाळासाहेब शेळके महाराज यांनीही मार्गदर्शन केले. याशिवाय “ओळख ज्ञानेश्वरी” परिवाराचे संकेत वाघमारे, इंद्रायणी सेवा फाउंडेशन विठ्ठल शिंदे तसेच सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, धार्मिक विधी, अभंगवाणी, प्रवचन, कीर्तन, गायन सोहळा, काही मान्यवरांचे स्वागत सत्कार, या विषयाला घेऊन विविध शालेयस्पर्धा , रक्तदान आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, अन्नदान ,ग्रंथतुला , हुशार गरजू विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिष्यवृत्ती, संत पूजन तसेच नागरिकांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वांनी हा सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय करण्याचा निर्धार व्यक्त केला. आळंदी नगरीत होणारा हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा भक्ती, कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी उत्सव ठरणार आहे.

Sunday, February 22, 2026

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मातृ–पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा

पुणे आळंदी Mee24taas Team श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर प्रशालेत संस्कारक्षम सोहळा मातृ –पितृ पूजन मोठ्या उत्साहात साजरा झाला . कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून ह.भ.प. भाग्यश्री भाग्यवंत, उद्योजक व आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश झोंबाडे, आळंदी नगर परिषदेच्या नगरसेविका ऋतुजा घुंडरे, माजी विद्यार्थी व रोबोटिक्स इंजिनिअर नितीश साळुंखे व परिवार, संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक श्रीधर कुऱ्हाडे, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड , मुख्याध्यापक प्रदीप काळे, माध्यमिक पा.शि.संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षिरसागर , उपाध्यक्षा तेजश्री साळुंखे , ज्योती श्रीखंडे , अंजली ढगे,मनिषा देवकाते,सविता उपाध्ये, शिक्षक सूर्यकांत खुडे, संजय कंठाळे, पालक,विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
माऊलींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकाद्वारे शालेय अभ्यासक्रमा बरोबर हा संस्कारक्षम सहशालेय उपक्रम साजरा करण्यामागचा उद्देश तसेच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावेत यासाठी आई वडील, शिक्षक,शाळा यांचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. विद्यार्थिनी ईश्वरी ढगे हिने मातृ पितृ पूजन म्हणजे आई - वडीलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.आई संस्कार करते तर बाबा जगाशी लढायला शिकवतात असे सांगितले. पालक ह.भ.प. तुकाराम कुरकुटे यांनी भारतीय संस्कृतीची जोपासना ही शालेय शिक्षणातून होत असते. प्रशाला दरवर्षी हा उपक्रम राबवत असल्याबद्दल संस्था, प्रशाला यांचे आभार व्यक्त केले.ह.भ.प.मुक्ता मालुंजकर यांनी शिक्षण विकत घेता येते पण संस्कार विकत घेता येत नाहीत. गेली 18 वर्ष प्रशाला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार करत आहे. असे नमूद केले. अजित वडगावकर यांनी विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावे यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. तसेच भविष्यात वृद्धाश्रमाची संख्या कमी होण्यासाठी अशा या संस्कारक्षम उपक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. नितीन साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न,मेहनत,सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब जीवनात करा. तसेच आयुष्याचा पाया शालेय जीवनात शिक्षकांकडून घडवला जातो. त्यामुळे त्यांचा नेहमी आदर करा असे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांकरिता एक रोबोटिक मॉडेल व दहा हजार एकशे अकरा रुपये (१०१११/-)प्रशालेच्या भौतिक सुविधा करीता देऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ऋतुजा घुंडरे यांनी मुलांची प्रगती ही आई-वडिलांचे आशीर्वाद असतात. आई-वडिलांनी मुलांशी विविध विषयावर चर्चा केली, धार्मिक ऐतिहासिक स्थळी एकत्र जायला पाहिजे. त्यांच्याबरोबर एकत्र वेळ घालवला पाहिजे असे विचार व्यक्त केले. सुरेश झोंबाडे यांनी आई-वडिलांचे महत्त्व सांगत आईसाठी तिच्या आजारपणात वेळ देता यावा या कारणास्तव आपण सरकारी नोकरी सोडल्याचे सांगितले. व तिची सेवा केल्याने उद्योगधंद्यात नाव कमवू शकलो तसेच आई-वडिलांच्या आशीर्वादाने, संस्काराने आज समाजात मानाचे जीवन जगत आहे असे सांगितले. प्रशालेच्या भौतिक सुविधांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. ह.भ.प.भाग्यश्री भाग्यवंत यांनी भक्त पुंडलिकाचे उदाहरण देत आई ,वडील,मुले यांनी मोबाईल, टीव्ही इ. सोशियल मीडियापासून दूर राहून एकमेकांना वेळ द्यावा असे सांगत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेची सहल यावर्षी रायगड किल्ल्यावर गेली होती सहलीवर आधारित परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील तीन क्रमांकाचे विद्यार्थी व एक उत्तेजनार्थ विद्यार्थ्यास मान्यवरांच्या हस्ते वस्तुरूप बक्षीस, प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. सहलीसाठी पाच हजार रुपये योगदान दिलेले पालक हेमंत जामदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना कुमकुम तिलक करून फुले वाहून पालकांच्या गळ्यात हार घातला. तदनंतर पालकांनी मुलांना कुमकुम तिलक करत आपल्या गळ्यातील हार मुलांच्या गळ्यात घातले. मुलांनी आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवून वंदन केले. मुलांनी आई-वडिलांच्या भोवती सात प्रदक्षिणा घातल्या व आई-वडिलांची सेवा करण्याचा दृढ निश्चय केला. आई-वडिलांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून "त्रिलोचन बना व आयुष्यात यशस्वी व्हा" असे आशीर्वाद दिले. मुलांनी पालकांना व पालकांनी मुलांना गोड खाऊ देऊन तोंड गोड केले अशा रीतीने मातृ-पितृ पूजनाचा भावपूर्ण सोहळा संपन्न झाला. वैशाली शेळके आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. राहुल चव्हाण,आरती गावडे यांनी सूत्रसंचालन केले.निशा कांबळे वर्षा काळे,प्रतिभा भालेराव, गीतांजली मोरस्कर, गजानन राठोड,राजू सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

Friday, February 20, 2026

इंदापूरमध्ये पतंजली योग समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

mee24taas team इंदापूर : आज पतंजली योग समिती, इंदापूर यांच्या वतीने आयोजित योगवर्गात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी व समाजसेवकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्रेरणादायी वातावरणात सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक काकासाहेब मांढरे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र गौरव सन्मान’ प्रदान झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ९० किलोमीटर अंतर अवघ्या १० तासांत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच इंदापूरमध्ये प्रथमच ‘इंद्रेश्वर मॅरॅथॉन’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून इंदापूरकरांचा अभिमान वाढविणारे श्री. संतोष वाघचौरे, श्री. संदीप जाधव आणि श्री. गोपीनाथ मोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कु. तनिष्का आत्माराम फलफले हिची Indian Space Research Organisation (इस्रो) मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राज घाडगे, श्रेयस बोंगाणे व अभिनव गटकुळ या विद्यार्थ्यांनी JEE परीक्षेत मिळवलेल्या उत्कृष्ट यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. अक्षय बाळासाहेब मोरे याची आंतरराष्ट्रीय बेसबॉल टीममध्ये निवड झाल्याबद्दल तर अथर्व सचिन मोरे याने आंतरराष्ट्रीय कुराश शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तरुण पिढीला प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पतंजली योग समितीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tuesday, February 17, 2026

आत्मविश्वास, परिश्रम आणि यशाचा संकल्प — श्री ज्ञानेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा

पुणे आळंदी Mee24TaasTeam शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एस. एस. सी. बोर्ड परीक्षेनिमित्त शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व मा. प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड (खंडोबा) देव संस्थान जेजुरीचे तुषार सहाणे, प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय खराटे, उद्योजक व सिव्हिल (स्ट्रक्चरल) इंजिनीयर रवींद्र कर्नावट, संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक व महाराष्ट्र राज्य संत भगवान बाबा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, हेमांगी उपरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये किसन राठोड यांनी शाळा हे विद्येचे मंदिर असून सर्वांनी ज्ञानाने परिपूर्ण व्हावे. या ज्ञानाच्या मंदिरातून दिलेल्या ज्ञानाचा बाहेरील विश्वात योग्य वापर करून यशस्वी व्हावे याकरिता शुभेच्छा दिल्या. यानंतर इयत्ता नववीच्या राधिका फपाळ या विद्यार्थिनीने इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोर्ड परीक्षेसाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शुभेच्छांना प्रत्युत्तर देताना ओम गेठे व दिव्यांग विद्यार्थिनी धनश्री जाधव या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता, शाळा व मित्रांप्रती जिव्हाळा आणि उज्ज्वल भविष्यासाठीची स्वप्ने व्यक्त केली. शिक्षक अल्लाबक्ष मुलाणी यांनी आत्मविश्वास, ज्ञान व प्रयत्नांची चिकाटी याच्या आधारे यशाची शिखर गाठावे यासाठी विद्यालयातील सर्व घटकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. तदनंतर अजित वडगावकर यांनी आपल्या भाषणात विद्यालयाच्या निकालाचा यशस्वी चढता आलेख व 100 % ची परंपरा मांडली. या ज्ञानमंदिरातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर संस्कार व सर्व भौतिक सुविधा देऊन समाज हितासाठी एक आदर्श विद्यार्थी घडविला जातो. या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा, गुरु व जेष्ठांचा आदर करून समाजात आपले व विद्यालयाचे नाव मोठे करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. रवींद्र कर्नावट यांनी विद्यालयाच्या वतीने केलेल्या स्वागताने भारावून गेलो असल्याचे सांगितले. विद्यालयात विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांची प्रगती ,त्यांच्यातील कला- कौशल्य व गुण पाहून संस्था पदाधिकारी व शाळेच्या सर्व घटकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना जीवनातील पाच लक्ष्यांचा परिचय करून देत असताना मातृभूमी, मातृभाषा, माता-पिता, माझी शाळा व स्वतःबद्दल आदर व अभिमान ठेवावा याविषयी मोलाचा संदेश दिला. तसेच संस्थेच्या भौतिक विकासात गरजेनुसार सहकार्य करू अशी भावना व्यक्त केली. विजय खराटे यांनी परिश्रम, आत्मविश्वास आणि वेळेचे व्यवस्थापन यांचे महत्त्व पटवून दिले. “परीक्षा ही आयुष्याची अंतिम पायरी नसून यशाकडे नेणारा एक टप्पा आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. परीक्षेतील महत्त्वाच्या सूचना व अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. आपल्याला शाळेत मिळालेल्या ज्ञान संस्काराचा सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी उपयोग करावा. माऊलींच्या पसायदानातील दृष्टांत देत ज्यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंना वंदन करून आपल्या कर्माने संतुष्ट करण्याची प्रेरणा दिली. तसेच टॅलेंट बरोबर स्मार्टनेस असण्याची गरज व्यक्त करून शिक्षण, जिद्द, चिकाटी व ऊर्जा या बळावर जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब सानप यांनी एवढी मोठी विद्यार्थी संख्या असलेली संस्था एवढ्या चांगल्या प्रकारे प्रगतशील आहे हे फक्त माऊलीच्या कृपाशीर्वादामुळे शक्य होऊ शकते असे सांगितले. महाराष्ट्राच्या विविध भागातून काम करण्यासाठी आलेल्या गरिबांची मुले या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे परिश्रम लक्षात घेता चांगले शिक्षण घेऊन आपले उज्वल भविष्य घडवावे यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार सहाणे यांनी राहिलेल्या पुढील दिवसात अभ्यासाचे नियोजन करून आत्मविश्वासाने परीक्षेत सामोरे जावे यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास आपली आठवण म्हणून 14 फॅन व 14 ट्यूबलाईट भेट दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास वहिले यांनी व हेमांगी उपरे यांनी आभार मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Thursday, February 12, 2026

इंद्रायणी स्वच्छता मोहीमेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा सहभाग

आळंदी पुणे डिजिटल Mee24Taas आळंदी नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या इंद्रायणी स्वच्छता मोहिमेत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या ६०० विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आळंदी परिसरात स्वच्छतेचा संदेश देत चाकण रस्ता नवीन पूल ते साधकाश्रम दरम्यान इंद्रायणी च्या तीरावर भव्य स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत या सर्वांनी दीड तास श्रमदान करत इंद्रायणी तीर व परिसर स्वच्छ केला. “माऊली सेवा” या भावनेतून आयोजित या उपक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुख्याध्यापक राठोड , प्रदीप काळे तसेच संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत झाडू व स्वच्छता साहित्य हातात घेत श्रमदान केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने परिसर स्वच्छ करत समाजापुढे आदर्श निर्माण केला. तसेच नगराध्यक्ष प्रशांत दादा कु-हाडे व नगरसेवक गिलबिले यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व स्वच्छता हीच खरी सेवा असल्याचे प्रतिपादन केले. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण करणारी ही मोहीम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

Friday, January 30, 2026

दादा स्वर्गात पोहोचायच्या आत त्याचं घर फोडलं, पार्टी फोडली. वारस नेमून झाला, मंत्रीपद नेमून झाली

...... अरे हो, इतकी घाई का? दादा हयात असता तर तुमचं काय झालं असतं......?
दीपक प्रभावळकर, सातारा अजीतदादाची चिता पेटली की सातव्या मिनिटाला अमित शाह स्क्रीन दाखवणाऱ्या मिडियाला राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतकी कसली घाई लागलीय की दादा स्वर्गात पोहोचायच्या आधीच त्यांचं घर फोडताय, पार्टी फोडताय, वहिनीला उपमुख्यमंत्री पदावर बसवलं? पोरांची वाटणी केली. दादाचा पक्ष विलीन पण करून टाकलात. आत्ता काही मिनिटांपूर्वी पर्यंत ज्याला ढाण्यावाघ म्हणत होता, आता त्याची पाठ फिरून काही क्षण होत नाहीत तोवर इतकं पुढं निघालात. अरे दादा हयात असता तर बिषाद झाली असती का? दादाच्या आत्म्याला नाय तर स्वतः आंतरआत्म्याला तरी थोडं भ्या..... साल्यांनो ! दादाचं विमान बुधवारी 8.46 ला कोसळ्या पासून गुरुवारी दुपारी 12.27 पर्यंत सर्वत्र दादा, दादा आणि दादा ! 12. 16 ला अग्नी दिवून झाला की लग्गेच "अमित शाह विमानतळाच्या दिशेने निघाले" पुढच्या सात - आठ मिनिटांत दुःखाचे अश्रू गिळून लग्गेच शहाच्या मागं? हो, मला माहित आहे की, "मिडियाला एक पाऊल पुढं रहावं लागतं" पण इतकं? की पूर्ण चितेने आग पकडायच्या आत तुम्ही मंत्रालयापर्यंत धावत जावं? दादाच्याच पक्षातल्या आमदार - मंत्र्यांनी कालचं हामसून उमसून रडणं थांबवून "पक्षाचं पुढं काय होणार?" यावर बाईट देणं. हे सगळं संतापजनक चाललंय. तिकडं चिता धडाडत असताना इकडं, अजीतदादांच्या पश्चात कोण? सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याची काहींची मागणी, पार्थ - जय यांच्यापैकी एकाला कॅबिनेट, दोन्ही पोरांना तितका अनुभव नसल्याने घड्याळाचे अध्यक्षपद कोणाला? दादांकडे बारामतीतील आणि राज्यातील विविध संस्था यांची पदे आहेत ती कशी वाटली जाणार? दादाचा पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करून जयंत पाटलांना अध्यक्ष पद द्यावे. सुप्रिया आज अंत्यविधी वेळी जसा पुढाकार घेत होत्या तसं पाहता त्यांना अध्यक्ष पद दिले तर सुनेत्रा वहिनीला मान्य होईल का? आज दादासाठी भाजपाने दिलेल्या जाहिराती आणि अमित शाह यांचं अंत्यविधीला येणं पाहता दादांचा पक्ष भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास त्या महायुतीमध्ये सहभागी होण्याला शरद पवार मान्यता देतील का? ........ अरे हो हो हो ! दादाची चिता तरी शांत होऊ दे. पुढील प्रश्न निर्माण होणार आहेत त्याची उत्तरं पवार कुटुंबीय बसून शोधतील की. पार्टी फुटलीय, घर नाही. मिडियाला नुसती घाई लागलीय असं नाही. राष्ट्रवादीचे नेते सुद्धा घरी परत जाताना थांबून थांबून बाईट देतायत. झिरवळ सारख्या माणसानं पवार कुटुंबाचा निर्णय घ्यावा? सुनेत्रा वहिनींना कोणतं मंत्रीपद द्यावं हे त्यानं सांगावं?? अरे दादा हयात असता तर.....? मीडियाच्या प्रश्नाला दादांनी कधी अव्हेरलं नाही. पण असल्या टुकार प्रश्नावर "छान वाटतंय..... हे नाय छान वाटत" "तू गप रे, तुला काय कळत न्हाय. उगाच पुढं पुढं विचारू नकोस. सर्रर्रर्र मागं" "ते काय म्हणाले ते त्यांना जाऊन विचार, माझ्या पुढं कशाला तुझं दांडूक नाचवतोयस" "अरे बाळा हा प्रश्न आमच्या घरचा आहें, आंम्ही बघून घेऊ. तू नंको काळजी करूस" अशी दादानं मिश्किलीत उत्तरं दिली असती पण त्याचा संताप लपवून. या बाईट देणाऱ्या आमदार - मंत्री - नेत्यांना तर दादांनी सोडलं असतं.....? दादा आले की, "बरं निघूया सभेला? कोण कोण बोलणार आहे? ये तू नको बोलूस. किती बडबडतोस..... कश्याला त्या तात्याला? त्याचं मागचं भाषण ऐकलंय उगा मोठ्ठ मोठ्ठ बोलतो...... स्थानिक आमदार असला तरी असू दे, तू फक्त आभार मान" असं म्हणून ज्याच्या त्याच्या पारड्यात त्याचं त्याचं माप घालणारा होता दादा. "व्हय रं, त्या जिल्ह्यात काय भाषण केलंस? पश्चिम महाराष्ट्राचा विकास्स.... ये हिकडं तुझा पश्चिम महाराष्ट्र बाहेरच काढतो. अरे तुझा आवाका किती, तू बोलतो किती? दादांनी वयाची चाळीस वर्षं या स्टाईलमध्ये काढली असताना त्याची पाठ वळताच सुरु झालेली बेताल बडबड दादाच्या चाहत्यांना संताप आणणारी आहे. विश्लेषण दादांच्या ऐहसीती प्रमाणे करा, तुमच्या लायकी प्रमाणे का करताय.....? लोकशाही आहे, कुणाचं तोंड धरणार? मिडिया असो किंवा राष्ट्रवादीचे मंत्री - आमदार. प्रत्येकाला लग्गेच का होईना विश्लेषण करण्याचा अधिकार आहे. पण......? ज्या अजीतदादानं नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपा यांच्याकडे जाऊन कधी मान तुकवली नाही, उजव्या आघाडीत जाऊन शाहू - फुले - आंबेडकर विसरले नाहीत. ही त्यांची ऐहसीकता होती. त्याप्रमाणे विश्लेषण झालं तर किमान माफी योग्य असेल. चिता विजयच्या आत जे मंत्रालयापासून साऱ्या महाराष्ट्रभर डिंडून आलेत त्यांच्याबद्दल आधीच संताप होत असताना आपल्या लायकी प्रमाणे बोलणाऱ्यांना काय....? लोक शोकमग्न आहेत. नायतर......! खरंतर, दादाची चिता रचायच्या आधीच हा घातपात आहे म्हणणारे...... विमानात 7.2 लाख होते असा दावा करणारे...... विकीपीडियावर विमान कोसळलायच्या आधीच दादांचा मृत्यू झाल्याची नोंद कशी...... दक्षिण बाजूने जाणाऱ्या विमानाला अपघात होणार आहे हे मी आधीच सांगितलं होतं...... असं म्हणणारे सुद्धा आहेतच की. अश्या वेळी मला एकच विचार येऊन गेला "दादा हयात असते तर......?" दीपक प्रभावळकर, सातारा 9527403232 🙏🏻

Sunday, January 25, 2026

नर्मदा जयंती इंद्रायणी नदी घाटावर उत्साहात साजरी.

अर्जुन मेदनकर आळंदी - इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती निमित्त नर्मदा आरती तसेच इंद्रायणी माता,नर्मदा माता नाम
जयघोष, वारकरी सांप्रदायिक भजन सेवा, पंचपदी धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती साजरी करण्यात आलीं. या वेळी दिनकर तांबे यांचे हस्ते नर्मदा प्रतिमा पूजन, कन्या पूजन ,आले. या प्रसंगी रविंद्र महाराज कुमकर, दिलीप महाराज ठाकरे, इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे, अशोक महाराज सालपे यांचे सह श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री मोहन महाराज शिंदे यांचे संस्थेतील साधक वारकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, वारकरी, भाविक उपस्थित होते. या वेळी हरिनाम जय घोष उत्साहात करण्यात आला. गेल्या तीन वर्षां पासून इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती, रथ सप्तमी साजरी करण्यात येत असल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.