SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Tuesday, February 17, 2026
आत्मविश्वास, परिश्रम आणि यशाचा संकल्प — श्री ज्ञानेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा
पुणे आळंदी Mee24TaasTeam
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एस. एस. सी. बोर्ड परीक्षेनिमित्त शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व मा. प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड (खंडोबा) देव संस्थान जेजुरीचे तुषार सहाणे, प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय खराटे, उद्योजक व सिव्हिल (स्ट्रक्चरल) इंजिनीयर रवींद्र कर्नावट, संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक व महाराष्ट्र राज्य संत भगवान बाबा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, हेमांगी उपरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये किसन राठोड यांनी शाळा हे विद्येचे मंदिर असून सर्वांनी ज्ञानाने परिपूर्ण व्हावे. या ज्ञानाच्या मंदिरातून दिलेल्या ज्ञानाचा बाहेरील विश्वात योग्य वापर करून यशस्वी व्हावे याकरिता शुभेच्छा दिल्या. यानंतर इयत्ता नववीच्या राधिका फपाळ या विद्यार्थिनीने इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोर्ड परीक्षेसाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शुभेच्छांना प्रत्युत्तर देताना ओम गेठे व दिव्यांग विद्यार्थिनी धनश्री जाधव या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता, शाळा व मित्रांप्रती जिव्हाळा आणि उज्ज्वल भविष्यासाठीची स्वप्ने व्यक्त केली.
शिक्षक अल्लाबक्ष मुलाणी यांनी आत्मविश्वास, ज्ञान व प्रयत्नांची चिकाटी याच्या आधारे यशाची शिखर गाठावे यासाठी विद्यालयातील सर्व घटकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
तदनंतर अजित वडगावकर यांनी आपल्या भाषणात विद्यालयाच्या निकालाचा यशस्वी चढता आलेख व 100 % ची परंपरा मांडली. या ज्ञानमंदिरातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर संस्कार व सर्व भौतिक सुविधा देऊन समाज हितासाठी एक आदर्श विद्यार्थी घडविला जातो. या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा, गुरु व जेष्ठांचा आदर करून समाजात आपले व विद्यालयाचे नाव मोठे करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
रवींद्र कर्नावट यांनी विद्यालयाच्या वतीने केलेल्या स्वागताने भारावून गेलो असल्याचे सांगितले. विद्यालयात विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांची प्रगती ,त्यांच्यातील कला- कौशल्य व गुण पाहून संस्था पदाधिकारी व शाळेच्या सर्व घटकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना जीवनातील पाच लक्ष्यांचा परिचय करून देत असताना मातृभूमी, मातृभाषा, माता-पिता, माझी शाळा व स्वतःबद्दल आदर व अभिमान ठेवावा याविषयी मोलाचा संदेश दिला. तसेच संस्थेच्या भौतिक विकासात गरजेनुसार सहकार्य करू अशी भावना व्यक्त केली. विजय खराटे यांनी परिश्रम, आत्मविश्वास आणि वेळेचे व्यवस्थापन यांचे महत्त्व पटवून दिले. “परीक्षा ही आयुष्याची अंतिम पायरी नसून यशाकडे नेणारा एक टप्पा आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. परीक्षेतील महत्त्वाच्या सूचना व अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. आपल्याला शाळेत मिळालेल्या ज्ञान संस्काराचा सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी उपयोग करावा. माऊलींच्या पसायदानातील दृष्टांत देत ज्यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंना वंदन करून आपल्या कर्माने संतुष्ट करण्याची प्रेरणा दिली. तसेच टॅलेंट बरोबर स्मार्टनेस असण्याची गरज व्यक्त करून शिक्षण, जिद्द, चिकाटी व ऊर्जा या बळावर जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेब सानप यांनी एवढी मोठी विद्यार्थी संख्या असलेली संस्था एवढ्या चांगल्या प्रकारे प्रगतशील आहे हे फक्त माऊलीच्या कृपाशीर्वादामुळे शक्य होऊ शकते असे सांगितले. महाराष्ट्राच्या विविध भागातून काम करण्यासाठी आलेल्या गरिबांची मुले या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे परिश्रम लक्षात घेता चांगले शिक्षण घेऊन आपले उज्वल भविष्य घडवावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार सहाणे यांनी राहिलेल्या पुढील दिवसात अभ्यासाचे नियोजन करून आत्मविश्वासाने परीक्षेत सामोरे जावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास आपली आठवण म्हणून 14 फॅन व 14 ट्यूबलाईट भेट दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास वहिले यांनी व हेमांगी उपरे यांनी आभार मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Thursday, February 12, 2026
इंद्रायणी स्वच्छता मोहीमेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा सहभाग
आळंदी पुणे डिजिटल Mee24Taas
आळंदी नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या इंद्रायणी स्वच्छता मोहिमेत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या ६०० विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आळंदी परिसरात स्वच्छतेचा संदेश देत चाकण रस्ता नवीन पूल ते साधकाश्रम दरम्यान इंद्रायणी च्या तीरावर भव्य स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत या सर्वांनी दीड तास श्रमदान करत इंद्रायणी तीर व परिसर स्वच्छ केला. “माऊली सेवा” या भावनेतून आयोजित या उपक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुख्याध्यापक राठोड , प्रदीप काळे तसेच संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत झाडू व स्वच्छता साहित्य हातात घेत श्रमदान केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने परिसर स्वच्छ करत समाजापुढे आदर्श निर्माण केला.
तसेच नगराध्यक्ष प्रशांत दादा कु-हाडे व नगरसेवक गिलबिले यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व स्वच्छता हीच खरी सेवा असल्याचे प्रतिपादन केले.
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण करणारी ही मोहीम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
Friday, January 30, 2026
दादा स्वर्गात पोहोचायच्या आत त्याचं घर फोडलं, पार्टी फोडली. वारस नेमून झाला, मंत्रीपद नेमून झाली
...... अरे हो, इतकी घाई का? दादा हयात असता तर तुमचं काय झालं असतं......?
दीपक प्रभावळकर, सातारा
अजीतदादाची चिता पेटली की सातव्या मिनिटाला अमित शाह स्क्रीन दाखवणाऱ्या मिडियाला राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतकी कसली घाई लागलीय की दादा स्वर्गात पोहोचायच्या आधीच त्यांचं घर फोडताय, पार्टी फोडताय, वहिनीला उपमुख्यमंत्री पदावर बसवलं? पोरांची वाटणी केली. दादाचा पक्ष विलीन पण करून टाकलात.
आत्ता काही मिनिटांपूर्वी पर्यंत ज्याला ढाण्यावाघ म्हणत होता, आता त्याची पाठ फिरून काही क्षण होत नाहीत तोवर इतकं पुढं निघालात. अरे दादा हयात असता तर बिषाद झाली असती का? दादाच्या आत्म्याला नाय तर स्वतः आंतरआत्म्याला तरी थोडं भ्या..... साल्यांनो !
दादाचं विमान बुधवारी 8.46 ला कोसळ्या पासून गुरुवारी दुपारी 12.27 पर्यंत सर्वत्र दादा, दादा आणि दादा ! 12. 16 ला अग्नी दिवून झाला की लग्गेच
"अमित शाह विमानतळाच्या दिशेने निघाले" पुढच्या सात - आठ मिनिटांत दुःखाचे अश्रू गिळून लग्गेच शहाच्या मागं?
हो, मला माहित आहे की, "मिडियाला एक पाऊल पुढं रहावं लागतं" पण इतकं? की पूर्ण चितेने आग पकडायच्या आत तुम्ही मंत्रालयापर्यंत धावत जावं? दादाच्याच पक्षातल्या आमदार - मंत्र्यांनी कालचं हामसून उमसून रडणं थांबवून "पक्षाचं पुढं काय होणार?" यावर बाईट देणं.
हे सगळं संतापजनक चाललंय.
तिकडं चिता धडाडत असताना
इकडं, अजीतदादांच्या पश्चात कोण?
सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याची काहींची मागणी,
पार्थ - जय यांच्यापैकी एकाला कॅबिनेट,
दोन्ही पोरांना तितका अनुभव नसल्याने घड्याळाचे अध्यक्षपद कोणाला?
दादांकडे बारामतीतील आणि राज्यातील विविध संस्था यांची पदे आहेत ती कशी वाटली जाणार?
दादाचा पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करून जयंत पाटलांना अध्यक्ष पद द्यावे.
सुप्रिया आज अंत्यविधी वेळी जसा पुढाकार घेत होत्या तसं पाहता त्यांना अध्यक्ष पद दिले तर सुनेत्रा वहिनीला मान्य होईल का?
आज दादासाठी भाजपाने दिलेल्या जाहिराती आणि अमित शाह यांचं अंत्यविधीला येणं पाहता दादांचा पक्ष भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास त्या महायुतीमध्ये सहभागी होण्याला शरद पवार मान्यता देतील का?
........ अरे हो हो हो !
दादाची चिता तरी शांत होऊ दे. पुढील प्रश्न निर्माण होणार आहेत त्याची उत्तरं पवार कुटुंबीय बसून शोधतील की.
पार्टी फुटलीय, घर नाही.
मिडियाला नुसती घाई लागलीय असं नाही. राष्ट्रवादीचे नेते सुद्धा घरी परत जाताना थांबून थांबून बाईट देतायत.
झिरवळ सारख्या माणसानं पवार कुटुंबाचा निर्णय घ्यावा? सुनेत्रा वहिनींना कोणतं मंत्रीपद द्यावं हे त्यानं सांगावं??
अरे दादा हयात असता तर.....?
मीडियाच्या प्रश्नाला दादांनी कधी अव्हेरलं नाही. पण असल्या टुकार प्रश्नावर
"छान वाटतंय..... हे नाय छान वाटत"
"तू गप रे, तुला काय कळत न्हाय. उगाच पुढं पुढं विचारू नकोस. सर्रर्रर्र मागं"
"ते काय म्हणाले ते त्यांना जाऊन विचार, माझ्या पुढं कशाला तुझं दांडूक नाचवतोयस"
"अरे बाळा हा प्रश्न आमच्या घरचा आहें, आंम्ही बघून घेऊ. तू नंको काळजी करूस"
अशी दादानं मिश्किलीत उत्तरं दिली असती पण त्याचा संताप लपवून.
या बाईट देणाऱ्या आमदार - मंत्री - नेत्यांना तर दादांनी सोडलं असतं.....?
दादा आले की,
"बरं निघूया सभेला?
कोण कोण बोलणार आहे? ये तू नको बोलूस. किती बडबडतोस.....
कश्याला त्या तात्याला? त्याचं मागचं भाषण ऐकलंय उगा मोठ्ठ मोठ्ठ बोलतो......
स्थानिक आमदार असला तरी असू दे, तू फक्त आभार मान"
असं म्हणून ज्याच्या त्याच्या पारड्यात त्याचं त्याचं माप घालणारा होता दादा.
"व्हय रं, त्या जिल्ह्यात काय भाषण केलंस? पश्चिम महाराष्ट्राचा विकास्स.... ये हिकडं तुझा पश्चिम महाराष्ट्र बाहेरच काढतो. अरे तुझा आवाका किती, तू बोलतो किती?
दादांनी वयाची चाळीस वर्षं या स्टाईलमध्ये काढली असताना त्याची पाठ वळताच सुरु झालेली बेताल बडबड दादाच्या चाहत्यांना संताप आणणारी आहे.
विश्लेषण दादांच्या ऐहसीती प्रमाणे करा, तुमच्या लायकी प्रमाणे का करताय.....?
लोकशाही आहे, कुणाचं तोंड धरणार? मिडिया असो किंवा राष्ट्रवादीचे मंत्री - आमदार. प्रत्येकाला लग्गेच का होईना विश्लेषण करण्याचा अधिकार आहे. पण......?
ज्या अजीतदादानं नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपा यांच्याकडे जाऊन कधी मान तुकवली नाही, उजव्या आघाडीत जाऊन शाहू - फुले - आंबेडकर विसरले नाहीत. ही त्यांची ऐहसीकता होती. त्याप्रमाणे विश्लेषण झालं तर किमान माफी योग्य असेल.
चिता विजयच्या आत जे मंत्रालयापासून साऱ्या महाराष्ट्रभर डिंडून आलेत त्यांच्याबद्दल आधीच संताप होत असताना आपल्या लायकी प्रमाणे बोलणाऱ्यांना काय....?
लोक शोकमग्न आहेत. नायतर......!
खरंतर, दादाची चिता रचायच्या आधीच हा घातपात आहे म्हणणारे......
विमानात 7.2 लाख होते असा दावा करणारे......
विकीपीडियावर विमान कोसळलायच्या आधीच दादांचा मृत्यू झाल्याची नोंद कशी......
दक्षिण बाजूने जाणाऱ्या विमानाला अपघात होणार आहे हे मी आधीच सांगितलं होतं...... असं म्हणणारे सुद्धा आहेतच की.
अश्या वेळी मला एकच विचार येऊन गेला
"दादा हयात असते तर......?"
दीपक प्रभावळकर, सातारा
9527403232
🙏🏻
Sunday, January 25, 2026
नर्मदा जयंती इंद्रायणी नदी घाटावर उत्साहात साजरी.
अर्जुन मेदनकर आळंदी - इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती निमित्त नर्मदा आरती तसेच इंद्रायणी माता,नर्मदा माता नाम जयघोष, वारकरी सांप्रदायिक भजन सेवा, पंचपदी धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती साजरी करण्यात आलीं. या वेळी दिनकर तांबे यांचे हस्ते नर्मदा प्रतिमा पूजन, कन्या पूजन ,आले. या प्रसंगी रविंद्र महाराज कुमकर, दिलीप महाराज ठाकरे, इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे, अशोक महाराज सालपे यांचे सह श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री मोहन महाराज शिंदे यांचे संस्थेतील साधक वारकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, वारकरी, भाविक उपस्थित होते. या वेळी हरिनाम जय घोष उत्साहात करण्यात आला. गेल्या तीन वर्षां पासून इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती, रथ सप्तमी साजरी करण्यात येत असल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची उत्साहात सांगता* *"ओळख श्री ज्ञानेश्वरीची" पुस्तकाचा द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा संपन्न
आळंदी पुणे डिजिटल मीडिया महाराष्ट्र - श्री ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची सांगता कार्यक्रम मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान व जीवनमूल्ये यांचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम याचा सखोल आणि प्रभावी उलगडा आपल्या वक्तृत्वातून केला व सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी विजेत्या 23 सहभागी स्पर्धकांना आकर्षक स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रे व रोख पारितोषिके देऊन उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' व हरिपाठ राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत एकूण 405 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये 38 विद्यार्थी उपांत्य फेरीत पोहोचले. त्यातील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथील राधिका परमेश्वर फपाळ या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक प्राप्त करून 9251 ₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. ओम गोरक्षनाथ गेठे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून 8251₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. तर श्री व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल वडगावशेरी येथील अक्षदा अरुण डोळस या विद्यार्थ्यांनीने 7251 ₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. तसेच हरिपाठ पाठांतर व अर्थ विवेचन या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत भेकराईमाता माध्यमिक विद्यालय भेखराईनगर येथील यश शिंदे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त करून 5000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले, श्री निकेतन गुरुकुल विद्यालय आळंदी येथील स्वरांजली झाडे या विद्यार्थिनींने द्वितीय क्रमांक प्राप्त करून 4000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले तर भोसरी येथील ध्रुव सोनवणे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त करून 3000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले.
तसेच विलास महाराज बालवडकर यांच्या वतीने प्रथम पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000₹ व स्वकाम सेवा संघाचे सारंग जोशी यांच्या वतीने प्रथम तीन विद्यार्थ्यांना (रोख 500₹) देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. योगी निरंजननाथ प्रमुख उपस्थिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, वारकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विलास बालवडकर, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, विविध संस्थांचे, शाळांचे पदाधिकारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विविध संस्थांचे सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रकाश काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली. ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान व मूल्यशिक्षणाने आदर्श समाज व देश घडावा यासाठी सुरू झालेल्या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' उपक्रमाचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व पत्रकार संघ आळंदी देवाची, सर्व अध्यापक या परिवाराच्या सहकार्याने साऱ्या विश्वात या उपक्रमाचा प्रचार व प्रसार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
तदनंतर 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत सुरू झालेल्या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' या रोपट्याचा केवळ माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने वटवृक्ष झाला याचा आनंद व्यक्त केला. “अशा उपक्रम व स्पर्धांमुळे तरुण पिढीच्या विचार विश्वाचा विकास होतो” असे सांगितले.
सुभाष महाराज गेठे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या वक्तृत्वा मुळे अंगावर शहारे उमटल्याचे सांगितले. या उपक्रमातील विद्यार्थी हा समाजाचा आरसा असून यांना चमकविण्याचे काम आपण सर्वांनी करावे व समाजातील धनाढ्य लोकांनी हा उपक्रम जगभर पोहचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डॉ. भावार्थ देखणे यांनी उपक्रमाची महती व आजच्या पिढीला उपक्रमाची असलेली आवश्यकता सांगत हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविला जावा जेणेकरून विद्यार्थ्यांमधील दोष - दुर्गुण दूर होतील. ज्ञानेश्वरीतील अभ्यासपूरक भाव, विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्व घटकांचे कौतुक केले. आणि हे कार्य असेच अबाधित टिकविण्यासाठी संस्थान कायम बांधील राहील असे आश्वासनही दिले.
अध्यक्षीय भाषणात योगी निरंजननाथ यांनी ज्ञानेश्वरीचे विचार आजच्या समाजासाठी किती मार्गदर्शक आहेत यावर प्रकाश टाकला. आजच्या पिढीला अंधारातून बाहेर काढणारा तेजोमय सूर्य म्हणजे "ओळख श्री ज्ञानेश्वरीची" हा उपक्रम असल्याचे गौरवास्पद उद्गार काढले. विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने वकृत्व स्पर्धेमध्ये भाष्य केले तेव्हा आज या उपक्रमासाठी कष्ट घेत असलेल्या आयोजकांचा उद्देश साध्य झाल्याचा आनंदही व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने आळंदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे, नगरसेविका कांचन किरण येळवंडे, अर्चना तापकीर, उज्वला काळे, वैजयंता उमरगेकर यांचा शाल, श्रीफळ, मोत्याची माळ व माऊलींची मूर्ती देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व तुकाराम गवारी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Friday, January 16, 2026
धानोरे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत सदिच्छा समारंभाचे आयोजन
धानोरे (ता. खेड) येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत बदली झालेल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता व सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेच्या जडणघडणीत, गुणवत्तावाढीत व शैक्षणिक यशप्राप्तीत मोलाचे योगदान देत शाळेला गुणवत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी ज्या शिक्षकांनी तन-मन-धन अर्पण करून निष्ठेने सेवा बजावली, अशा बदली झालेल्या सर्व शिक्षकांचा या समारंभात गौरव करण्यात येणार आहे.
हा सदिच्छा समारंभ शनिवार, दि. 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, धानोरे यांनी केले आहे.
Thursday, January 15, 2026
श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदीची संस्कृती बाजीराव नवले इंटरमिजिएट परीक्षेत राज्यात १५ वी
आळंदी पुणे - कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा सप्टेंबर २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून ३,१४,६६६ तीन लाख चौदा हजार सहाशे सहासष्ट विद्यार्थी बसले होते. श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत परीक्षा केंद्र असून याच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कु. संस्कृती बाजीराव नवले ही राज्यात गुणवत्ता यादीत १५ वी आली आहे. या विद्यार्थ्यांनीला मार्गदर्शन कलाशिक्षक वंजारी दत्तात्रय मारुती यांनी केले आहे.
या अगोदरही शासकीय रेखाकला एलिमेंटरी परीक्षेत २०१८ साली स्वप्निल हनुमंत राऊत हा विद्यार्थी राज्यात २७ वा आला होता. या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या तालुका, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. संस्कृतीच व कलाशिक्षक वंजारी यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव अजित वडगावकर व प्राचार्य किसन राठोड यांनी केले .
Wednesday, January 14, 2026
अलंकापुरीत मकर संक्रांत दिनी महिलांची माऊली मंदिरात गर्दी माऊली मंदिरात षटतिला एकादशी दिनी लाखावर भाविक श्रींचे दर्शनास इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती उत्साहात ; महिलांचे हळदी कुंकू
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरात षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत दिनी राज्यातील लाखावर भाविकांनी गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले. इंद्रायणी नदी दुतर्फ़ा आणि नदीवरील स्काय वॉल्कवर देखील महिला सह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आळंदी माऊली मंदिरात महिला भाविकांची दर्शनास गर्दी अधिक गर्दी होती. मकर संक्रांती, षटतिला एकादशीच्या पावन पर्व साधत इंद्रायणी नदी घाटावर आळंदी देवस्थान तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू आणि इंद्रायणी आरती सेवा समितीसह देबस्थानचे वतीने इंद्रायणी महाआरती मंत्र जयघोषात झाली.
मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती.
इंद्रायणी नदी घाटावर आरती प्रसंगी पदाधिकारी आणि सेवा भावी संस्था यांचा सत्कार करीत नदी प्रदूषण, नदी परिसर स्वच्छतेचा एल्गार जाहीर करण्यात आला. महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आळंदी देवस्थान महिला विश्वस्त रोहिणी पवार यांनी देवस्थान तर्फे राबविला. आळंदीतील इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी आरती आणि आवेकर भावे रामचंद्र संस्थान तर्फे मंदिरात महिलांसाठी उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत सुमारे २०० वर महिला भाविकांना वाण वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख विश्वस्त ऍड राहुल आवेकर, पूजा आवेकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, महेश आयचीत आदी उपस्थित होते. या वेळी महिलांना वाण आणि हळदी कुंकू पूजा आवेकर यांचे हस्ते देण्यात आले.
आळंदीत मकर संक्रांत दिनी हजारो महिलांनी माऊलीचे दर्शनासह महिलाना हळदी कुंकू देत आळंदी परिसरातील मंदिरांसह इंद्रायणी नदी घाटावर ओवसा वाहण्यास तसेच एकमेकींना ओवसा वाण देत मकर संक्रांत प्रथा परंपरांचे पालन करीत साजरी केली. आळंदी देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त ऍड रोहिणी पवार यांनी प्रथमच इंद्रायणी नदी घाटावर देवस्थान तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू उपक्रम राबविला.
इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने देखील इंद्रायणी नदीची आरती करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजक अनिता झुजम, संयोजक नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, बाळासाहेब ठाकूर, महिला बचत गट महा संघ अध्यक्षा सुवर्णा काळे, अनिता शिंदे, कौशल्या देवरे, नीलम कुरधोंडकर, लता वर्तले, शैला तापकीर, केशरबाई कदम, मीरा कांबळे, सरस्वती भागवत, रंजना गिरे, सावित्री घुंडरे पाटील, सुनंदा पवार, पूजा पवार, वर्षा खिलारे, शोभा कुलकर्णी, कोमल वाळूतकर, सुनीता घोटकुले, कांचन घनवट, कमल नाणेकर, काशीबाई अडकिने, जयश्री भागवत, राधिका अडकिने, सुनीता हिळ्ळी, सृष्टी हिळ्ळी, अस्मिता गोरे, समृद्धी भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
माऊली मंदिरात श्रीना तिळाचा अभिषेक, महानैवेद्य झाला. भाविकांची गर्दी लक्षांत घेता महिलांसाठी पंखा मंडपातून तसेच पुरुष भाविकांना विना मंडपा समीप श्रींचे दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. मागील वेळी पुरुष भाविकांना दर्शनास मंदिरात न सोडल्याने झालेली नाराजी यावरी दूर करून श्रींचे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविक, वारकरी, नागरिकांनी श्रींचे दर्शन गर्दी करत घेतले. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविक दर्शनास जातील असे नियोजन देवस्थानाने केले. मंदिरात शांतता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होतो. या साठी व्यवस्थापक माऊली वीर, उप व्यवस्थापक तुकाराम माने, बल्लालेश्वर वाघमारे, देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम पूर्वक काम पाहिले. या वेळी आळंदी देवस्थानचे पदाधिकारी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, निलेश महाराज लोंढे, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, नगरपरिषदेचे नूतन पदाधिकारी आदींचे उपस्थितीत इंद्रायणी आरती वेदमंत्र जय गोष्ट झाली. या वेळी इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासह स्वच्छतेचे काम प्रभावी होण्यासाठी पदाधिकारी यांनी ग्वाही दिली.
एअकादशी आणि मकर संक्रांत एकत्र आल्याने महिला भाविकांची मोठी गर्दी दर्शनबारीसह मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाटावर तसेच आळंदीतील श्री विष्णू मंदिर, श्री राम मंदिर, श्री स्वामी महाराज मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर येथे भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनबारीसाठी पुढे इंद्रायणी नदी वरील स्काय वॉल्क पुलावर हि महिलांची मोठी गर्दी होती. मंदिराचे दर्शनबारी लगत भाविकांची दर्शनास गर्दी झाली. मात्र त्या भागातील अरुंद रस्ते तसेच मंदिर परिक्रमा पान दरवाजा मार्ग प्रशस्त नसल्याने रहदारीला गैरसोयीचे ठरले. षटतिला एकादशी दिनी आळंदी मंदिर परिसरासह इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा, प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणेस भाविकांनी गर्दी केली. परंपरेने मंदिरातील धार्मिक उपक्रम विधी झाले. मात्र देवदर्शनास श्रींचा गाभारा बंद ठेवण्यात आला होता. एकादशी दिनी लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेत मकर संक्रांत देखील साजरी केली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र नाईक यांनी शांतता सुव्यवस्थेचे काम परिश्रम पूर्वक पाहिले.
Saturday, January 3, 2026
संत तुकोबांच्या तपोभूमी रक्षणासाठी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मधुसूदन पाटील महाराजांनी घेतली भेट
देहू आळंदी-सातारा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत संत तुकोबांच्या तपोभूमीच्या रक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मधुसूदन महाराजांनी सांगितले की, श्रीक्षेत्र देहूजवळील संत तुकोबांची ध्यान-चिंतन-साक्षात्कार तपोभूमी म्हणून वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र भंडारा व श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर यांना शासनाने सन २०११ मध्ये अधिसूचना काढून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. मात्र या ऐतिहासिक संतपीठ परिसरात शासनपुरस्कृत एमआयडीसी व काही बिल्डरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विध्वंस सुरू असून, तो तातडीने थांबवण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
तसेच १९५८ च्या सांस्कृतिक पुरातत्त्व विभागाच्या अधिनियमाचे उल्लंघन करून राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे, संत तुकोबांच्या तपोभूमी डोंगराभोवती तटबंदी उभारावी व घोराडा-भंडारा-भामचंद्र डोंगरांना सन २०११ च्या अधिसूचनेनुसार कायमस्वरूपी सुरक्षा देण्यासाठी शासनाने तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणी प्रत्यक्ष भेटीत मांडण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांसाठी तयार केलेले निवेदनही शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सादर करण्यात आले.
या मागण्यांना प्रतिसाद देताना माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, “या प्रकरणात मी जातीने लक्ष घालेन व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन.”
या भेटीप्रसंगी शिवेंद्रसिंह राजे यांच्या पत्नी सौ. वेदांकी राजे भोसले यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना “तुकोबा! संतभूमीच्या रणांगणात” ही भामचंद्र डोंगर संघर्षाचा इतिहास मांडणारी पुस्तिका भेट देण्यात आली. तसेच छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेत बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या बदलांकडेही लक्ष वेधण्यात आले. सौ. वेदांकी राजे भोसले यांनी ही पुस्तिका वाचून या विषयावर गांभीर्याने चर्चा करून योग्य निर्णयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात कै. महाराज अभयसिंह राजे भोसले यांचे जुने कार्यकर्ते श्री. बाळासाहेब शितोळे (आंबेवाडी), वास्तुविशारद तज्ज्ञ सुभाष शामराव निकम (अपशिंगे), अजिंक्यतारा साखर कारखान्याचे शेती विभाग अधिकारी गजानन विभूते (फत्त्यापूर) तसेच संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संपर्क प्रमुख सचिन पाटील येरळीकर यांचा समावेश होता.
या भेटीची सविस्तर माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील यांनी दिली.
Subscribe to:
Comments (Atom)












