SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Tuesday, November 4, 2025
*घुमान सायकलवारीचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत स्वागत
आळंदी पुणे - श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये वारकरी सांप्रदायाच्या संत साहित्याचे प्रचारक, प्रसारक नामदेव महाराज यांच्या पादुकांचे, वारकरी, सायकल स्वारांचे ढोल, ताशे, टाळ मृदंग व पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी वारीचे संयोजक भिसे, मनोज मांढरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, संस्था सदस्य विलास सोपान कुऱ्हाडे, पत्रकार विठ्ठल शिंदे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, गुरुनानक यांच्या प्रतिमेचे व संत नामदेवांच्या पादुकांचे पूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. वारीचे संयोजक मनोज मांढरे यांचा सन्मान संस्थेच्या वतीने सुरेश वडगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला.अजित वडगांवकर यांनी सर्व सायकल स्वार, वारकरी यांचे स्वागत केले, आषाढीवारी प्रमाणे ही वारी गेले चार वर्षे पंढरपूर पासून घुमानमध्ये जाते, असे सांगत हैबतबाबांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी पालखी सोहळा चालू केला तेव्हा परिस्थिती प्रतिकूल होती व सहभागी वारकऱ्यांची संख्याही कमी होती.परंतू आज सोहळ्यांचे वाढलेले वैभव आपण पाहतो."इवलेसे रोप लावियेले द्वारी | तयाचा वेलू गेला गगनावरी ||"या ऊक्ती प्रमाणे ही घुमान वारी पूढे स्वरूप धारण करो अशी माऊलींकडे
प्रार्थना करीत या वारीसाठी शुभेच्छा दिल्या. सालाबाद प्रमाणे पुढील वर्षीही ही वारी संस्थेच्या प्रांगणात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वारीचे संयोजक, आयोजक यांनी संस्थेच्या प्रांगणामध्ये वारीचा रथ व पादुका आणल्याबद्दल आभार मानले.
मनोज मांढरे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुढील अनेक राज्यातून
जाणाऱ्या वारीसाठी शुभेच्छा दिल्याबद्दल व सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. सतीश जाधव यांनी विद्यार्थ्यांनी सायकल चालवावी, प्रदूषण मुक्त जीवन जगावे. तसेच पुढील वर्षापासून तुमच्या पालकांना आरोग्यदायी सायकलवारीमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान करा असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन राहुल चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
Tuesday, October 14, 2025
आळंदीतील मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील तसेच प्रभाग क्रमांक नऊ सह परिसरातील मोकाट कुत्रे यांचा मोठा त्रास होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे.
या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना घुले यांनी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील हिंदवी कॉलनी १, २, वाघजाई मंदिर परिसर, दगड़े बिल्डिंग परिसर तसेच चावडी चौक गावठाण येथील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे यांची संख्या वाढली आहे. या मुळे परिसरात ये जा करणे धोक्याचे झाल्याने भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक यांना रहदारी करणे गैरसोयीचे झाले आहे. यामुळे आळंदी नगरपरिषदेने तात्काळ या भागातील मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तात्काळ कार्यवाही होऊन परिसर मोकाट कुत्रे भय मुक्त व्हावा. या साठी प्राधान्याने प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांचे वतीने घुले यांनी केली आहे.
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात सायबर क्राईम विषयावर जनजागृती कार्यशाळा
पुणे आळंदी-विद्यार्थी शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेची जागरूकता निर्माण
पिपरी चिंचवड पुलिस आयुक्तालय व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साइबर गुन्ह्यांबाबत जागृति कार्यक्रम आज शेठ कांतिलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभा गृहामध्ये आयोजित करण्यात आला. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ऑनलाइन प्रास्ताविक केले व साइबर गुन्ह्याबद्दल माहिती देत कार्यक्रमाचा ऊद्देश सांगितला.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचाही धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण मिळावे, तसेच जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करावा या उद्देशाने श्री ज्ञानेश्वर विद्यालयात “सायबर क्राईम विषयावर जनजागृती कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नरके साहेब उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाइन फसवणूक, बनावट ओळखपत्रे, OTP व बँक फसवणूक, सोशल मीडियावरची गोपनीयता, पासवर्ड सुरक्षा, फिशिंग आणि ट्रोलिंग, डिजिटल अँरेस्ट याविषयी सोप्या उदाहरणांसह माहिती दिली.
तसेच “अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, वैयक्तिक माहिती शेअर करू नका, आणि संशयास्पद संदेश मिळाल्यास लगेच तक्रार करा” असा इशाराही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांबाबत प्रश्न विचारले, त्यांची योग्य उत्तरे व मार्गदर्शन अतिथींकडून मिळाले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे सचिव अजित वडगावकर, भाजप पश्चिम महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे साहेब, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस आदी उपस्थित होते.
अजित वडगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “तंत्रज्ञान हे आशीर्वाद आहे, पण त्याचा अतिरेक व गैरवापर हानिकारक ठरू शकतो. सायबर सजगता ही काळाची गरज आहे. त्यामुळे योग्य तेवढाच वापर करून सायबर धोके टाळावीत."
शेवटी विद्यार्थ्यांनी या उपयुक्त कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करत, सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याची शपथ घेतली.
Sunday, October 12, 2025
ज्ञानेश्वरी आरोग्यदायींनी, जीवनदायिनी ग्रंथ- अजित वडगावकर
आळंदी पुणे - श्री ज्ञानेश्वर जाधव यांच्या माध्यमातून तयार झालेल्या हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन व त्यांचा सत्कार कार्यक्रम
शनिवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आळंदी देवाची येथे ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने पार पडला.
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आळंदीचे माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर ,चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर ,राम मंदिर आवेकर संस्थांनचे विश्वस्त अर्जुन मेदनकर ,बाबासाहेब गवारे ,ज्ञानेश्वर दिघे, नंदकुमार वडगावकर ,विश्वंभर पाटील, धनाजी काळे, अरुण कुरे व ज्ञानेश्वर जाधव यांचे कुटुंबातील सदस्य व आप्तेष्ट ,नातेवाईक उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व उपस्थितांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन केले . सुरेश वडगावकर ,प्रकाश काळे ,अजित वडगावकर, बाबा गवारी ,नंदकुमार वडगावकर ,अर्जुन मेदनकर यांनी ज्ञानेश्वर जाधव यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन सत्कार केला.
या निमित्ताने आपल्या मनोगतात अजित वडगावकर म्हणाले की आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो, सार्थ ज्ञानेश्वरी अभ्यासतो. किंवा ज्ञानेश्वरी सप्रेम भेट देऊन प्रचार प्रसार करतो.परंतु आज ग्रंथराज ज्ञानेश्वरी हस्तलिखित करून त्याचे प्रकाशन व ज्यांनी ग्रंथ स्वहस्ते लिहिला त्यांचा सत्कार हा ऐक आगळावेगळा विषय या निमित्ताने अनुभवायला मिळतोय. त्यांचा सत्कार म्हणजे आपल्यातील संवेदनाचे प्रतीक आहे.ज्ञानेश्वर जाधव यांनी गेली चार-पाच महिने दररोज आठ ते दहा तास हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे श्लोक हे लाल शाईने व ओव्या या निळ्या शाईने लिहिल्या. अतिशय स्वच्छ, सुवाच्च ,सुंदर अशा अक्षरात व सुंदर अशी मांडणी अतिशय प्रेमपूर्वक त्यांनी त्यात केली.म्हणूनच आज ओळख ज्ञानेश्वरी परिवाराने त्यांचा सत्कार येथे केला ते स्तुत्य आहे. याप्रसंगी बाबा गवारी,प्रकाश काळे, सुरेश वडगावकर यानी आपली मनोगते व्यक्त केली.सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर जाधव यांनी उपक्रम राबवीत असताना आलेले अनुभव सांगितले. तसेच आपल्या कुटुंबीयांनी यात साथ दिल्याचे कबूल केले व हा ग्रंथ माऊलींनीच माझ्याकडून करूवुन घेतला असे सांगितले. पसायदान वअल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
Sunday, October 5, 2025
श्री ज्ञानेश्वर विद्यालय उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित
पुणे आळंदी मी24तास टीम
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने तर विद्यालयातील उपशिक्षिका उज्वला कडलासकर यांना शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्व सुख सुविधांनी युक्त देखणी इमारत, कलादालन, क्रीडा दालन, गणित, विज्ञान, संगणक प्रयोगशाळा ,भव्य क्रीडांगण, माऊली बाग इ. भौतिक सुविधांबरोबरच ओळख श्री ज्ञानेश्वरीची, विद्यार्थी घडताना, कलाकार घडताना, दहावी, बारावी ज्यादा तास, स्कॉलरशिप, एन. एम. एम. एस, ओलंपियाड, विविध विषयांच्या प्रज्ञाशोध परीक्षा यांना विनामूल्य मार्गदर्शन, मासिक चाचणी, असाइनमेंट, आकर्षक वर्ग सजावट, विद्यार्थी अपघात फंड, आनंददायी शनिवारच्या माध्यमातून कृतीयुक्त अध्यापन असे अनेकविध उपक्रम विद्यालयात राबविले जातात. क्रीडा, सांस्कृतिक विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्र दीपक यशाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, नारायण पिंगळे, उज्वला कडलासकर, सोनाली आवारी यांनी स्विकारला.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर आणि सचिव अजित वडगावकर व सर्व संस्था पदाधिकारी यांनी प्रशासन, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि पालकांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने तर विद्यालयातील उपशिक्षिका उज्वला कडलासकर यांना शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व सुख सुविधांनी युक्त देखणी इमारत, कलादालन, क्रीडा दालन, गणित, विज्ञान, संगणक प्रयोगशाळा ,भव्य क्रीडांगण, माऊली बाग इ. भौतिक सुविधांबरोबरच ओळख श्री ज्ञानेश्वरीची, विद्यार्थी घडताना, कलाकार घडताना, दहावी, बारावी ज्यादा तास, स्कॉलरशिप, एन. एम. एम. एस, ओलंपियाड, विविध विषयांच्या प्रज्ञाशोध परीक्षा यांना विनामूल्य मार्गदर्शन, मासिक चाचणी, असाइनमेंट, आकर्षक वर्ग सजावट, विद्यार्थी अपघात फंड, आनंददायी शनिवारच्या माध्यमातून कृतीयुक्त अध्यापन असे अनेकविध उपक्रम विद्यालयात राबविले जातात. क्रीडा, सांस्कृतिक विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्र दीपक यशाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, नारायण पिंगळे, उज्वला कडलासकर, सोनाली आवारी यांनी स्विकारला.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर आणि सचिव अजित वडगावकर व सर्व संस्था पदाधिकारी यांनी प्रशासन, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि पालकांचे अभिनंदन केले.
Wednesday, October 1, 2025
आजोबांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त नातवाचा उपक्रम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकलद्वारे दिला जाणार शिक्षण प्रवासाला वेग
आळंदी :
ह.भ.प. धोंडीबा बाळाची आल्हाट यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त नातू तुषार आल्हाट यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. ग्रामीण भागातील मुलांना रोज ३ ते ५ किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते. डोळ्यांत मोठी स्वप्नं असली तरी थकलेल्या पायांमुळे त्यांचा शैक्षणिक प्रवास कठीण होत असतो. या प्रवासाला गती मिळावी आणि मुलांच्या शिक्षणाला बळ मिळावे या उद्देशाने तुषार आल्हाट यांनी ‘सायकल दान उपक्रम’ सुरू केला आहे.
या उपक्रमाअंतर्गत आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून जुन्या सायकली जमा केल्या जाणार असून, त्या RKH Group तर्फे नीट सर्व्हिस करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचणे सोपे होणार आहे.
“आजोबांचा ९७ वा वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता, समाजातील मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या उपक्रमाद्वारे तो अर्थपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे तुषार आल्हाट यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ होईल. त्यांच्या डोळ्यांतली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ही सायकल छोटीशी पण मोठा बदल घडवणारी ठरणार आहे.
Monday, September 29, 2025
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात महाभोंडला उत्साहात साजरा
पुणे आळंदी- पारंपारिक नृत्य व गीतामधून विद्यार्थिनींनी महिला पालकांनी व शिक्षिकांनी लुटला आनंद
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक, मानसिक, कलात्मक, सामाजिक व भावनिक विकास होण्याकडे प्रशालेचा कल असतो. त्यादृष्टीने प्रशाला दरवर्षी वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबवत असते. त्या अनुषंगाने याही वर्षी प्रशालेत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. भोंडला मराठी संस्कृतीतील एक प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा केवळ आनंदासाठी नाही तर निसर्गाशी जुळलेले आदर, शेतीसाठी शुभेच्छा आणि सामाजिक एकात्मता वाढवण्यासाठी देखील आहे. गरब्याचा त्यानिमित्ताने मुली आणि महिला सगळे एकत्र येतात मनोरंजना बरोबरच त्यातून स्त्री सशक्तिकरणास चालना मिळते. अलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल, वेड्याच्या बायकोने इत्यादी गीतांचे गायन करून फेर धरण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर , मंजुश्री वडगावकर तसेच सुमनताई कुऱ्हाडे, सुनीता पाटील व निकिता पाटील, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सुरेखा लोहोर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा मनीषा केदार, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे उप प्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर ,अनुजायीनी राजहंस ,ज्येष्ठ लिपिक संगीता पाटील इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या औचित्य साधून संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांची पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना अजित वडगावकर यांनी ही निवड व हा सन्मान माझा नसून या संस्थेच्या विकासासाठी तन-मन-धनाने काम करणाऱ्या सर्व घटकांचा असल्याचे सांगितले.
या महाभोंडला कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला पालकांना आमंत्रित करण्यात आलेले होते. त्यातून उपस्थित महिला पालकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले. यातून पहिल्या पाच महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच महिला पालक आरती आहेर यांना मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
नंतर संगीतावर विद्यार्थिनी ,महिला पालक व अध्यापिका यांनी दांडिया, गरबा नृत्यामधून आनंद लुटला. व शेवटी खिरापत वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा खेसे यांनी केले.
Sunday, September 28, 2025
संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्ह्याच्या कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड
पुणे आळंदी – माऊलींच्या कृपेने संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्ह्याच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. या कार्यकारी मंडळात संस्थेचे अध्यक्ष म्हणून मा. विजयराव कोलते यांची निवड झाली असून, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीतून संचालक म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे.
आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या प्रसंगी ग्रामोन्नती शिक्षण मंडळ, नारायणगाव चे अध्यक्ष मा. अनिल तात्या मेहेर यांच्या हस्ते नवनियुक्त मंडळाचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला गणपतराव बालवडकर, प्रदीप दादा वळसे पाटील, वि.ल. पाटील, प्रमिलाताई गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी नव्या कार्यकारी मंडळाचे अभिनंदन करून, संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास पुढील काळात अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
---
Thursday, September 25, 2025
9 दिवस बसायचं नाही, उभं राहूनच झोपतात; सातारच्या पांडे गावातील उभ्याच्या नवरात्रीची अनोखी परंपरा
सध्या देशभरात शारदीय नवरात्रौत्सव सुरू आहे. घरोघरी घटस्थापना करीत देवीची पूजा केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रुपांची स्थापना करण्यात आली आहे.
नऊ दिवस अनेक भक्त उपवास करतात. उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काहीजण नऊ दिवस उपवास करतात मात्र एक वेळ जेवतात. तर काही जण केवळ उपवासाचं खाऊन नऊ दिवस उपवास करतात. जे नवरात्रीचा कडक उपवास करतात ते चप्पलही वापरत नाहीत. ज्याला जसं जमेल तशी देवीची पूजा-अर्चा केली जाते.
साताऱ्यात नवरात्रौत्सवातील अनोखी प्रथा समोर आली आहे. याला उभ्याची नवरात्र म्हटलं जातं. या भक्तांची इतकी श्रद्धा इतकी विलक्षण आहे की ऐकल्यावर नवलच वाटेल. साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील पांडे गावात दुर्गादेवीच्या उत्सवाला भक्त एक अनोखी उपासना करतात. ही परंपरा साधारण साडे तिनशे वर्ष जुनी आहे. येथे काळभैरवाचं जागृत स्थान आहे. येथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे.
उपासक दिवसभर काळभैरवाची पूजा करतात
पांडे हे बारा बलुतेदारांचं गाव आहे. दरवर्षी या गावातील 350 ते 400 लोक उपवास करतात. हातात काठी घेऊन गावभर आरती करतात. आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. आणि नवसासाठी हा कडक उपवास केला जातो. विशेष म्हणजे गावातील मुस्लीम समाजातील लोकही देवीचा हा कडक उपवास करतात. आजही येथील हिंदू-मुस्लीम समाज एकत्रितपणे आनंदात नांदतो.
उपासक या पाळण्यावर छाती टेकवून आणि एक पाय वर घेऊन उभ्या उभ्या झोपतात
उपवासाला तेल, मीठ, तिखट पूर्ण त्याग
पांडे गावातील हे उपासक नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस कडक उपवास करतात. तेल, मीठ, तिखटाचा पूर्णपणे त्याग केला जातो. हे नऊ दिवस ते केवळ गोड खातात. यामध्ये साबुदाण्याची खिर खाल्ली जाते. याशिवाय ते फळं आणि दूध घेतात.
9 दिवस उभं राहतात...
हा उपवास इतका कडक असतो की या नऊ दिवसांच्या काळात ते बसत नाहीत. ते अख्खे नऊ दिवस उभेच राहतात. आधार फक्त काठीचा. झोपेसाठी ते पाळण्याचा वापर करतात. या नऊ दिवसास ते झोपत नाहीत. पळत नाही. चप्पल घालत नाही. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास आरती केली जाते. पहाटे पाच वाजता उठून नैसर्गिक विधी उभ्यानेच केला जातो. झोपाळ्यावर छाती टेकून एक पाय वर घेऊन झोपतात. या उपासनेत एक पाय जमिनीवर ठेवावा लागतो.
मुस्लीम उपासकही नऊ दिवस उभ्याची नवरात्र करतात
नाथांची सेवा जितकी कडक कराल, तितकं फळ चांगलं मिळतं अशी उपासकांची मान्यता आहे. गावकरी मानतात की अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते. विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात. मुस्लीम बांधवही हाच उपवास पाळतात. 'देव जातीपातीचा नसतो'... असं सांगत तेही नऊ दिवस देवीसमोर उभे राहतात. ही भक्ती, हा त्याग, ही श्रद्धा - यासाठी पांडे गावात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते. देवीवरची ही अनोखी आस्था पाहायची असेल. तर तुम्हालाही एकदा या गावात यावंच लागेल.
#maharashtra #satarakar #NewsUpdate #newsupdate2025 #MaharashtraNews #navratrispecial #navratri2025special #Navratri2025 #literature #autumn #fallleaves #leaves #astrology #rainydays #positivevibes
#holiday #Holidays #emotional
#halloweenvibes #literature
Subscribe to:
Comments (Atom)










