SHRIMANT

Saturday, January 3, 2026

संत तुकोबांच्या तपोभूमी रक्षणासाठी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मधुसूदन पाटील महाराजांनी घेतली भेट

देहू आळंदी-सातारा येथे आयोजित
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत संत तुकोबांच्या तपोभूमीच्या रक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मधुसूदन महाराजांनी सांगितले की, श्रीक्षेत्र देहूजवळील संत तुकोबांची ध्यान-चिंतन-साक्षात्कार तपोभूमी म्हणून वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र भंडारा व श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर यांना शासनाने सन २०११ मध्ये अधिसूचना काढून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. मात्र या ऐतिहासिक संतपीठ परिसरात शासनपुरस्कृत एमआयडीसी व काही बिल्डरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विध्वंस सुरू असून, तो तातडीने थांबवण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच १९५८ च्या सांस्कृतिक पुरातत्त्व विभागाच्या अधिनियमाचे उल्लंघन करून राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे, संत तुकोबांच्या तपोभूमी डोंगराभोवती तटबंदी उभारावी व घोराडा-भंडारा-भामचंद्र डोंगरांना सन २०११ च्या अधिसूचनेनुसार कायमस्वरूपी सुरक्षा देण्यासाठी शासनाने तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणी प्रत्यक्ष भेटीत मांडण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांसाठी तयार केलेले निवेदनही शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सादर करण्यात आले. या मागण्यांना प्रतिसाद देताना माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, “या प्रकरणात मी जातीने लक्ष घालेन व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन.” या भेटीप्रसंगी शिवेंद्रसिंह राजे यांच्या पत्नी सौ. वेदांकी राजे भोसले यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना “तुकोबा! संतभूमीच्या रणांगणात” ही भामचंद्र डोंगर संघर्षाचा इतिहास मांडणारी पुस्तिका भेट देण्यात आली. तसेच छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेत बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या बदलांकडेही लक्ष वेधण्यात आले. सौ. वेदांकी राजे भोसले यांनी ही पुस्तिका वाचून या विषयावर गांभीर्याने चर्चा करून योग्य निर्णयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कै. महाराज अभयसिंह राजे भोसले यांचे जुने कार्यकर्ते श्री. बाळासाहेब शितोळे (आंबेवाडी), वास्तुविशारद तज्ज्ञ सुभाष शामराव निकम (अपशिंगे), अजिंक्यतारा साखर कारखान्याचे शेती विभाग अधिकारी गजानन विभूते (फत्त्यापूर) तसेच संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संपर्क प्रमुख सचिन पाटील येरळीकर यांचा समावेश होता. या भेटीची सविस्तर माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील यांनी दिली.

Monday, December 22, 2025

जो आत्महत्या करण्याचा विचार करतो त्यांनी हा लेख नक्की वाचावा

तुकोबारायांना अवघं चाळीस-एक्के
चाळीस वर्षांचं आयुष्य लाभलं आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खूप दुःखांचा सामना करावा लागला . सांसारिक आयुष्य एक्केचाळीस वर्षांचं लाभलं तरी खऱ्या अर्थाने ज्याला सामाजिक आयुष्य म्हणतात ते फक्त एकोणीस-वीस वर्षांचंच होतं. या अल्प आयुष्यात तुकोबारायांनी हजारो अभंग रचले, सांसारिक सुखदुःखं अनुभवली, आणि सामाजिक सुखदुःखांवरही भाष्य केलं. समाजाच्या हाडामसात रुजलेल्या जुनाट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवाधर्माच्या नावावर माजवण्यात आलेलं कर्मकांड आणि होत असलेलं शोषण, जन्माधिष्ठीत उच्चनीचता, स्त्रीया आणि शूद्रातीशूद्रांची गुलामगिरी याविरोधात त्यांनी संघर्ष केला.तसं तुकोबारायांचं घराणं चांगलं तालेवार घराणं होतं. त्यांच्या घरात पिढीजात सावकारी होती. शेती होती. बागायत होती. किराणा दुकान होतं. व्यापार होता.थोरला भाऊ सावजी आध्यात्मिक वृत्तीचा होता. त्याच्या पत्नीचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर सावजी एक दिवस कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. त्याने संन्यास घेतला असं सांगितलं जातं. सुनेचा मृत्यू आणि मुलाचं घर सोडून जाणं यामुळे बोल्होबा, तुकोबारायांचे वडील, खचले. त्यामुळे संसाराचा भार आला फक्त बारा वर्षांच्या तुकोबारायांवर ! तो त्यांनी यशस्वीपणे पेललाही. तुकोबारायांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगाही झाला. पण पत्नी सतत आजारीच असायची. म्हणून बोल्होबांनी तुकोबारायांचं दुसरं लग्न पुण्याच्या गुळवे सावकाराच्या मुलीशी करुन दिलं. जरा बरे दिवस आले तोच पुन्हा महाभयंकर दुष्काळ पडला. सतत तीन वर्षांच्या दुष्काळाने सामान्य लोकांची स्थिती त्राही माम्, त्राही माम् अशी झाली. अन्न नाही, पाणी नाही. लोकांनी झाडाचा पाला पोटात भरला. कित्येक लोक अन्न अन्न करत मेले. कित्येकांनी पोटचे गोळे बाजारात विकले. पशूपक्षी किती मेले त्याची तर गणतीच नाही. तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा याच दरम्यान मृत्यू झाला. पाठोपाठ वडिल गेले. आईही गेली. *संकटं येतात तेंव्हा एकटी येत नाही* असं म्हणतात. सुखाचे काही क्षण मिळत नाही तोच दु:खाचे पहाड अंगावर कोसळावेत असं आयुष्य सुरु होतं. म्हणून तुकोबाराय एका म्हणतात,"सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वता एवढे ।।" ही तुकोबारायांची आत्मानुभूती होती. आपण आपल्यावर थोडं दुःख झालं की डळमळीत होऊन जातो थोडाही धीर धरत नाही यावर तुकोबाराय म्हणतात *आला होता गेला पूर l धीर धरिला जीवनी ll* माझ्या आयुष्यात पुराएवढी खूप दुःख आणि संकट आली , पण त्यावेळी त्यांना मी धीराने तोंड दिलं म्हणून जशी दुःख आली तशी निघूनही गेली. कठीण काळात माणसांनी शांत राहायचं आणि असतं जे जे होईल त्याला धीराने सामोर जायचं असतं. काळाचे चक्र थांबत नसतं. फक्त थोडा संयम ठेवावा लागतो, बदल होतो.कितीही बिकट किंवा प्रतिकूल परिस्थिती किंवा नैराश्यपूर्ण वातावरण असलं तरीही हिंमत न हरता, धीर धरुन, विचारपूर्वक पावलं टाकली तर यश निश्चित असतं आणि तसंच आलेल्या परिस्थितीतून बाहेरही पडता येतं.तथागत भगवान गोतम बुद्धांनी सांगितलं आहे, "जग अनिच्च आहे." सर्वच अनिच्च म्हणजे अनित्य असेल तर सुखही राहणार नाही तसंच दु:खही राहणार नाही. संकटाचा काळही कायम राहणार नाही. काळ बदलणारच आहे. प्रतिकूल काळही जाणारच आहे. कितीही अंधारी रात्र असली तरी तिचा अंत होणारच आहे. उद्याचा सूर्य उगवणारच आहे. त्याला कोणीही अडवू शकणार नाही. धीर सोडला नाही तर काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. यावर विश्वास ठेवून जो जगतो तो जिंकतो आणि आपल्या आजूबाजूला ही अशी आपल्याला दिसतात सुद्धा.छत्रपती शिवरायांच्या जीवनात सुद्धा अतिशय कठीण आणि दुःखाचे प्रसंग आले होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात अनेक प्रसंगी केवळ शौर्य आणि धैर्य या बळावर विजय प्राप्त केला आहे. म्हणून संकट प्रसंगी माणसाने धीर सोडू नये. एका अभंगात तुकोबाराय म्हणतात “धीर तो कारण l साह्य होतो नारायण ।l” जो धीर धरतो त्याला देव मदत करतो. जो घाबरून पळून जातो त्याला नाही. म्हणून आपल्यावर आलेल्या परिस्थितीला सक्षमपणे , धीराने आणि संयमाने तोंड द्यावे. - जय जगद्गुरु तुकोबाराय - धर्मापुत्र

करिअरवर प्रेम असले की काय होते नक्की वाचा

"तू माझ्या लायकीचा नाहीस संग्राम... आरश्यात चेहरा बघितलायस का तुझा? माझ्या पायातील सँडलची किंमत तुझ्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे..." भर कॉलेजच्या गेटवर सायलीने संग्रामचा अपमान केला आणि तोच अपमान संग्रामच्या काळजात जिवंत निखाऱ्यासारखा पे_टत राहिला! कोल्ह
ापूरच्या एका छोट्याशा गावातली संग्राम आणि सायलीची जोडी म्हणजे शाळेपासूनची 'फेव्हरेट लव्ह स्टोरी'. दहावीच्या निरोपाच्या दिवशी शाळेच्या पटांगणात वडाच्या झाडाखाली उभं राहून संग्रामने सायलीला वचन दिलं होतं, "बाळा, परिस्थिती गरीब आहे ग माझी, पण तुला राणीसारखं ठेवेन. आपण लग्न करू." सायलीने लाजून होकार दिला होता. शाळा संपली. सायली पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात गेली आणि संग्राम घरची शेती सांभाळत गावातल्या कॉलेजमध्ये जाऊ लागला. सुरुवातीला दोघे तासनतास फोनवर बोलायचे. संग्राम शेतात राबून, भाजी विकून साठवलेले पैसे सायलीच्या मोबाईल रिचार्जसाठी पाठवायचा. पण शहराचा वारा सायलीला लागला. कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांच्या गाड्या, त्यांचे महागडे कपडे, मॉलमध्ये फिरणं हे पाहून सायलीचे डोळे दिपले. तिला तिच्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड्स भारी गिफ्ट्स देताना दिसायचे. तिला वाटू लागलं, "माझा बॉयफ्रेंड तर नुसता शेतकरी आहे, गावंढळ आहे. तो मला काय देणार?" हळूहळू तिने संग्रामचे फोन उचलणे बंद केले. मेसेजला रिप्लाय उशिरा येऊ लागले. एकदा संग्रामने कसाबसा पैसा जमवून तिला वाढदिवसाला कुरिअरने एक छानसा ड्रेस पाठवला. पण सायलीने फोन करून त्याला सुनावले, "संग्राम, काय हे चिंध्यांसारखे कपडे पाठवलेत? माझ्या कॉलेजमध्ये मुली ब्रँडेड घालतात. तुला स्टॅंडर्ड कळतं का रे?" संग्रामच्या मनाला खूप लागलं, पण प्रेमापोटी तो गप्प राहिला. काही दिवसांतच सायलीने कॉलेजमधल्या 'रोहित' नावाच्या एका श्रीमंत मुलाशी मैत्री केली. रोहित तिला कारमधून फिरवायचा, महागड्या हॉटेलमध्ये नेायचा. संग्रामला हे मित्रांकडून कळलं तेव्हा तो कोलमडला. तो रडत तिला फोन करू लागला, पण तिने नंबर ब्लॉक केला. त्याने वेड्यासारखे तिच्या मैत्रिणींचे नंबर मिळवले, त्यांना विनवण्या केल्या, "प्लीज ताई, एकदा माझं सायलीशी बोलणं करून द्या, मी तिच्याशिवाय मरून जाईन." पण त्या मैत्रिणींनी उलट त्याची चेष्टा केली. संग्रामला राहवलं नाही. तो तसाच एसटीने पुण्यात आला. तिचा कॉलेजच्या गेटवर तासनतास उभा राहिला. दुपार झाली, सायली रोहितच्या कारमधून खाली उतरली. ती खूप मॉडर्न दिसत होती. संग्राम धावत तिच्या जवळ गेला. "सायली..." त्याचे डोळे भरले होते. तिने रागाने मागे वळून पाहिलं. "तू? इथे काय करतोयस भिकारड्यासारखा?" संग्रामने तिचे हात पकडले, तो गुडघ्यावर बसला. "सायली, तोडू नकोस ग आपलं नातं. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. मी मेहनत करीन, तुला हवं ते देईन, पण मला सोडून जाऊ नकोस." तो ढसाढसा रडत होता. कॉलेजची मुलं जमा झाली. सायलीच्या मैत्रिणी कुत्सितपणे हसल्या. "हहाहा, सायली हा तुझा तो गावठी बॉयफ्रेंड का ग?" सायलीचा अहंकार दुखावला. तिने सर्वांसमोर संग्रामच्या थोबाडीत मारली. "माझ्या जवळ येऊ नकोस. तुझी लायकी आहे का माझ्याशी बोलण्याची? गेट लॉस्ट!" तेवढ्यात रोहित आला. "ए ए, कोण रे तू? माझ्या गर्लफ्रेंडला त्रास देतोस?" रोहितने आणि त्याच्या मित्रांनी मिळून संग्रामला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. संग्राम र_क्ताळला, कपडे फाटले, पण त्याची नजर फक्त सायलीवर होती. पण सायलीने एकदाही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही. उलट ती रोहितच्या हातात हात घालून निघून गेली. त्या दिवशी पुणे स्टेशनवर बसून संग्राम रात्रभर रडला. पण त्या अश्रूंसोबतच त्याच्यातल्या जुन्या 'प्रेमवेड्या' मुलाचा अंत झाला होता. त्याने ठरवलं, "आता प्रेम नाही, जिद्द पेटवायची. ज्या लायकीवरून तिने मला हिणवलं, तीच लायकी कमवून दाखवायची." संग्राम गावी परतला. त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. शेतीसोबतच त्याने 'एमपीएससी'चा अभ्यास सुरू केला. दिवस-रात्र एक केली. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष दिलं नाही. पाच वर्षानंतर... कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) लोकांची गर्दी होती. सायली एका फाईलसाठी हेलपाटे मारत होती. रोहितचा बिझनेस जुगारात आणि व्यसनात बुडाला होता. त्यांच्या जमिनीचा लिलाव होणार होता आणि तो थांबवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सही हवी होती. शिपायाने नाव पुकारले, "मिसेस सायली रोहित कदम, साहेबांनी आत बोलावलंय." सायली केबिनमध्ये गेली. ती रडवेली झाली होती. "सर, प्लीज आमचं घर वाचवा, ही सही नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावर येऊ." समोरच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याने फाईलवरून नजर वर केली. ते भेदक डोळे, तो रुबाब आणि चेहऱ्यावर एक गंभीर शांतता. तो 'संग्राम' होता. आता तो 'उपजिल्हाधिकारी' (Deputy Collector) झाला होता. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे शब्द तोंडातच अडकले. "संग्राम... तू?" संग्रामने शांतपणे पेन उघडलं. तिच्याकडे बघून तो हसला नाही की रागावला नाही. त्याच्या नजरेत आता प्रेम नव्हतं, फक्त कर्तव्य होतं. त्याने फाईलवर सही केली आणि फाईल तिच्याकडे सरकवली. सायलीला रडू कोसळलं. "संग्राम, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. त्या रोहितने मला बर्बाद केलं. तुझं प्रेम..." संग्रामने हात वर करून तिला थांबवलं. "मॅडम, तुमचं काम झालंय. तुम्ही जाऊ शकता. बाहेर खूप लोक ताटकळत आहेत." "संग्राम, एकदा तरी बोल ना..." तिने विनवणी केली. संग्रामने शिपायाला बेल वाजवून बोलावलं आणि शांतपणे म्हणाला, "ज्या मुलाला तू कॉलेजच्या गेटवर मारलंस, तो तिथेच मेला. या खुर्चीवर जो बसलाय, तो फक्त एक अधिकारी आहे. आणि हो, जाताना गेटवरच्या वॉचमनला सलाम करून जा, कारण पाच वर्षांपूर्वी एका 'भिकारी' समजल्या जाणाऱ्या मुलामुळेच आज तुला ही सही मिळाली आहे." सायली फाईल छातीशी धरून रडत केबिनबाहेर पडली. तिला आज कळलं होतं की, ती ज्याला दगड समजून सोडून गेली होती, तो खरं तर 'हिरा' होता, जो आता तिच्या नशिबात उरला नव्हता.

हरिद्वार से महाराष्ट्र पुणे तक साइकिल यात्रा का प्रेरणादायी शुभारंभ

हरिद्वार - योग साधक संजय वाघ (निवासी: रांजणी, तहसील आंबेगांव) और नंदू जाधव (निवासी: केंदुर, तहसील शिरूर) ने हरिद्वार से साइकिल द्वारा अपने वापसी के सफर की शुरुआत की है। योग, स्वास्थ्य जागरूकता और समाजप्रबोधन के उद्देश्य से की जा रही इस साहसिक यात्रा की सर्वत्र सराहना हो रही है।
इस अवसर पर आदरणीय श्री परमार्थ देवजी तथा श्री राकेश कुमार जी ने दोनों योग साधकों को आशीर्वाद एवं शुभकामनाएं दीं और उनके साहस, दृढ़ संकल्प तथा सेवा भावना की मुक्तकंठ से प्रशंसा की। उन्होंने संदेश दिया कि योग का प्रसार और प्रचार और अधिक जोश के साथ करें, ताकि अधिक से अधिक लोग स्वस्थ जीवन की ओर अग्रसर हों। पवित्र हरिद्वार नगरी से प्रारंभ हुई यह साइकिल यात्रा युवाओं सहित समाज के प्रत्येक वर्ग को योग, स्वास्थ्य और सकारात्मक जीवनशैली अपनाने के लिए प्रेरित करने वाली सिद्ध होगी

हरिद्वार ते महाराष्ट्र सायकल यात्रेचा प्रेरणादायी प्रारंभ

हरिद्वार-
योग साधक संजय वाघ (रा. रांजणी, ता. आंबेगाव) आणि नंदू जाधव (रा. केंदुर, ता. शिरूर) यांनी हरिद्वार येथून सायकलने परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. योग साधना, आरोग्य जनजागृती व समाजप्रबोधनाचा संदेश घेऊन सुरू केलेल्या या धाडसी यात्रेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी आदरणीय श्री परमार्थ देवजी आणि श्री राकेश कुमार जी यांनी या दोन्ही योग साधकांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि सेवाभावाचे मनापासून कौतुक करत, “योगाचा प्रसार व प्रचार अधिक जोमाने करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
हरिद्वारसारख्या पवित्र स्थळावरून सुरू झालेली ही सायकल यात्रा युवकांना योग, आरोग्य व सकारात्मक जीवनशैलीकडे प्रेरित करणारी ठरणार आहे. समाजात योगाबाबत जनजागृती घडवून आणण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला हा प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थे मध्ये "गंध मातीचा रंग संस्कृतीचा" या त्रैवार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहात सांगता.या निमित्ताने स्पर्धा परीक्षा वाचन कक्ष उद्घाटन सोहळा संपन्न

आळंदी डिजिटल मीडिया: श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत “गंध मातीचा रंग संस्कृतीचा” या त्रैवार्षिक स्नेहसंमेलना च्या चौथ्या दिवशी संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा वाचन कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते, त्या धरतीवर शालेय जीवनात देखील विद्यार्थी स्कॉलरशिप, नवोदय, एन.एम.एम.एस, एन.टी.एस, एम.टी.एस सारख्या स्पर्धा परीक्षा देत असतात. भविष्यात द्याव्या लागणाऱ्या बँकिंग,
एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे सारख्या स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा वाचन कक्ष सुरू करण्यात आला. त्या निमित्ताने पन्नास हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेशी संबंधित पुस्तके या कक्षामध्ये ठेवण्यात आली आहेत. या पुढे गरजे नुसार पुस्तकांची संख्या वाढवण्यात येईल असे सांगण्यात आले. या पुस्तकांमुळे यशाच्या,अपयशाच्या अनेक कथा विद्यार्थ्यांना वाचता येतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कक्षाला भेट द्यावी अशी अपेक्षा संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सोनवणे यांनी केले. स्पर्धा परीक्षा वाचन कक्षाचे उद्घाटन सौ. स्नेहल कदम (अध्यक्षा क्षितज फाउंडेशन) यांच्या हस्ते संपन्न झाले. यांनी आजच्या काळात *जिथे शिक्षणाचे बाजारीकरण झालेले दिसून येते* अशा काळात *विद्यार्थीच नाही तर माणूस घडवण्याचे काम श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि शाळा करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.* आणि या निमित्ताने संस्था पदाधिकारी व शिक्षक यांचे कौतूक केले. स्पर्धा परीक्षा वाचन कक्षची सुरुवात शाळा स्तरांवर होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाचे ध्येय ठरवावे व त्यानंतर जे वाचले आहे त्याचे विश्लेषण करावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना या कक्षाची मदत होईल . विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम ह भ प महेश महाराज नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ह भ प नाना महाराज चंदिले (जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सचिव) यांनी सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद पर शुभेच्छा दिल्या. अजित वडगावकर यांनी या स्पर्धा परीक्षा वाचन कक्षामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढणार असल्याचे सांगितले. पालकांनी आपल्या पाल्याला शाळेच्या वेळाव्यतिरिक्त वेळात या कक्षात येऊन ही पुस्तके वाचावीत यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगितले. या स्पर्धा परीक्षा वाचन कक्षा मुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांची माहिती होईल यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून याचा पुरेपूर उपयोग विद्यार्थी करतील असे मत व्यक्त केले.दीपक पाटील, सुर्यकांत मुंगसे यांनी मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी प्राचार्य विक्रम काळे (श्री जैन विद्या प्रसारक मंदिरचे श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा विद्यालय), प्रा. बाळासाहेब खोसे, पत्रकार भानुदास पर्‍हाड, सोमनाथ काळे, अरुण कुरे, बद्रिनाथ घुगे, राजलक्ष्मी पाटील, राजेंद्र आढारी (मॅनेजर पीडीसीसी बँक आळंदी), राहुल कोहिनकर, उद्योजक सदाशिव येळवंडे, सी.ए. संदेश पवार, श्रीकांत ईल्ले, अनुज्ञा ईल्ले, काशिनाथ गुंजाळ, रोहिणीताई लोंढे कबीरबुवा, ह. भ. प. वेद लोंढे कबीरबुवा, जनार्दन घुंडरे, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी पोलिस स्टेशन चे पवार साहेब, मछ्चिंद्र शेंडे, गर्जे साहेब समवेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष पांडुरंग कुर्‍हाडे, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर पाटील, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, सदस्य अनिल वडगावकर, शहाजी करपे, बाबूलाल घुंडरे, श्रीधर कुर्‍हाडे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवण, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, प्रमोद कुलकर्णी, संगीता पाटील, श्रेणिक क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. रघुनंदन कन्स्ट्रक्शनचे भगवान साकोरे यांनी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये देणगी दिली. नंतर "गंध मातीचा रंग संस्कृतीचा" या विविध कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. *या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव,एकता,मूल्यशिक्षण, सामाजिक जनजागृती, देशप्रेम, देशाचा प्रगल्भ इतिहास इत्यादी विषयांवर शिकवण देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.* उपस्थित सर्व प्रमुख अतिथी, विद्यार्थी, शिक्षक,पालक आणि ग्रामस्थ हे सर्व कार्यक्रमांचे सादरीकरण पाहून मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले.उपस्थितांचे आभार सूर्यकांत मुंगसे यांनी मानले.

Saturday, December 20, 2025

स्वामी रामदेवबाबा यांचा पुणेरी पगडीने सन्मान करण्यात आला

हरिद्वार - पतंजली योगपीठाचे परम
श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज यांचा पुणेरी पगडी घालून अत्यंत गौरवपूर्ण व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा सन्मान पतंजली युवा भारतच्या सर्व जिल्हा प्रभारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय परंपरेनुसार स्वामीजींचा विधिवत सत्कार करण्यात आला. या सन्मानाने स्वामी रामदेवजी महाराजांनी विशेष आनंद व्यक्त केला. उपस्थित सर्व जिल्हा व तहसील प्रभारी यांना त्यांनी मंगलमय शुभेच्छा देत आपले आशीर्वाद प्रदान केले. योग, आरोग्य, राष्ट्रसेवा तसेच संस्कारयुक्त समाजनिर्मितीसाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे प्रेरणादायी विचार स्वामीजींनी यावेळी मांडले. शुभ आशीर्वाद स्वीकारताना श्री श्रीमंत दादासाहेब करांडे, श्री उत्तरेश्वर तोडकर, श्री राजेन्द्र ओझा अॅड श्री शांताराम दामगुडे, श्री संतोष जांभुळकर, श्री संजय वाघ, श्री नंदू जाधव, श्री रामदास तांबे यांच्यासह पतंजली युवा भारतचे सर्व जिल्हा व तहसील प्रभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय, उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. हा सत्कार सोहळा पतंजली परिवारातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, स्वामी रामदेवजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताच्या कार्याला अधिक गती व बळ मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Thursday, December 18, 2025

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छ .संभाजीनगर ला येतो

संभाजी नगर - एकीकडे कोट्यवधी
रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. मात्र छ .संभाजी नगरातील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची.. सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये ( औरंगाबादेत) होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आला. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि छ .संभाजी नगरातील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून छ. संभाजी नगरच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण छ .संभाजी नगरात झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते छ .संभाजी नगरात एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायचीय रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डला काशिनाथ काकांनी मदत केली आणि त्याला रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशिनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा. 1989 मध्ये त्याने छ .संभाजी नगर सोडलं त्यावेळी काशिनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती.रिचर्ड मायदेशी परतला. तिकडे राजकारणात जाऊन त्याने मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्याला कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथ काका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्याला होती. गेली 30 वर्ष त्याला भारतात यायला जमलं नाही, मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसूकच छ.संभाजी नगरकडे वळली आणि त्यानं शोध घेतला तो काशिनाथ काकांचा. तब्बल दोन दिवस त्याने काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून तो रडायला लागला. खर तरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं.ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही तो आवर्जून सांगतो.काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं, मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होता, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डला आनंद आहेच मात्र मलाही अभिमान असल्याचं रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. काशिनाथ काकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होत, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला. नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात. काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्याने काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे. प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो. लेखक : अज्ञात

Wednesday, December 17, 2025

आनंद, कला व संस्काराचा संगम' श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

आळंदी पुणे-श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *“गंध मातीचा : रंग संस्कृतीचा”* वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ चा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन करून
मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून चार दिवस चालणाऱ्या त्रैवार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर वर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनि माऊलींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग विविध वेषभूषत ,पारंपरिक वाद्यसंगीत, शास्त्रीय धार्मिक वातावरण आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सजीव दृशामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मवीर अध्यात्मिक सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. अक्षय महाराज भोसले समवेत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सुप्रसिद्ध मराठी बिग बॉस विजेते, सिनेअभिनेता सुरज चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी संजना सुरज चव्हाण यांची उपस्थिती लाभली. तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुरेशकाका वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, ,राजाभाऊ चोपदार, "आजीचा लाडका नातू "फेम महेश जगदाळे, श्रीधर कुऱ्हाडे, संस्थेचे सदस्य अनिल वडगावकर, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष फणसे व सचिव साळुंखे, बेबीताई सांडभोर, उमेश म. बागडे, एम. डी. पाखरे, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी प्रथम पाहुण्यांचा परिचय करून देत सर्वांचे स्वागत केले व या कार्यक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांच्या सर्वांनी विकासाकरिता कसा महत्त्वाचा आहे हे सांगितल. संतांचे आशीर्वाद, समाजातील ज्ञानी महात्म्यांच्या आशीर्वादाने व दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सहकार्याने , पालक ,ग्रामस्थ संस्थेतील निवृत्त व विद्यमान शिक्षक शिक्ष इतर कर्मचारी यांच्या यांच्या सहकार्यातून संस्था प्रगती करत आहे व अशीच प्रगती पुढे व्हावी या करता या सर्व घटकांनी पुढे अशीच मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली व चार दिवस चालणाऱ्या स्नेहसंमेलनाची माहिती देत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले . व " ओळख श्री ज्ञानेश्वरी ची" हा अभ्यासक्रम पसायदान प्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू व्हावा अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडे व्यक्त केली. तसेच सुरेश वडगावकर, डॉ. दीपक पाटील, सूर्यकांत मुंगसे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
नंतर सूरज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी नृत्यद्वारे संवाद साधत आपल्या यशाचा प्रवास, मेहनतीचे महत्त्व आणि कलागुणांना वाव देण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतातून अक्षय भोसले यांनी संस्कारक्षम मूलं घडवणारे संस्कारक्षम विद्यालय, समाजाला दिशा देणारे कीर्तनकार प्रवचनकार व संस्कारक्षम विद्यार्थी ची खाण निर्माण करणारी शाळा म्हणून शाळे चे कौतुक केले यावेळी विविध कला गुणदर्शन” या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत व लोककलेचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. भारतीय संस्कृतीची मुळे, मातीचा गंध आणि परंपरेचे रंग विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून प्रभावीपणे उलगडताना दिसून आले. अशा प्रकारे “गंध मातीचा : रंग संस्कृतीचा” या संकल्पनेतून आयोजित ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन हे शैक्षणिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे ठरत आहे सूत्रसंचालन योगेश मठपती व आभारप्रदीप काळे मानले. इंद्रायणी मातेच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.