SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Wednesday, September 17, 2025
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांचा श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न
आळंदी - भरतशेठ गोगावले यांना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी मंत्री) पद मिळाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा) यांच्या अध्यक्षतेखाली व मा. नगराध्यक्ष (आळंदी नगरपालिका) व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या हस्ते भव्य सत्कार समारंभ संस्थेच्या शेठ कांतिलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न झाला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संजय घुंडरे, खेड तालुक्याचे सहाय्य गट विकास अधिकारी भोईर साहेब, शिवसेना आळंदी शहराध्यक्ष राहुल चव्हाण, लक्ष्मण गोगावले, सुहास महाराज गोगावले, शिवसेना शेतकरी संघटनेचे सुनील कोंढाळकर, आदर्श गाव वरंध ग्रामपंचायतीचे सदस्य यशवंत पोकळे, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, सदस्य अनिल वडगावकर, बाबुलाल घुंडरे, पत्रकार दिनेश कुऱ्हाडे, शिव व्याख्याते आकाश भोंडवे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. मंत्री महोदय साहेबांचे सनई, ढोल ताशांच्या सुमधुरवाद्यासह लेझीम पथक तसेच तांबूगाच्या गजरात दमदार स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अजित वडगावकर यांनी मा. मंत्री महोदय साहेब जेव्हा आमदार झाल्यानंतर शाळेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते त्यावेळेस सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे सर्व शिक्षक - विद्यार्थी यांनी मा. भरत गोगावले साहेबांना मंत्री मंडळामध्ये पद मिळावे अशी माऊली चरणी प्रार्थना केली होती. त्याची फलश्रुती मा. भरत गोगावले साहेबांना मंत्रीपद मिळाले याचा आनंद व्यक्त केला. त्यानिमित्ताने त्यांच्या सत्काराचा समारंभ आयोजित केल्याचे सांगितले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीमध्ये आषाढी व कार्तिकी यात्रेमध्ये माऊली भक्तांना संपूर्ण शाळा इमारत व परिसर राहण्यासाठी दिला जातो. तेव्हा अरुंद कमान व असलेला कच्चा रस्ता यामुळे त्यांना व वाहनांना अडचण निर्माण होते. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांनाही अडचण तयार होते .त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेलं असलेलं विद्यालयाच्या कमान व रस्त्याचे काम करून मिळावे अशी मागणी केली . तदनंतर चैतन्य महाराज लोंढे यांनी मा भरत गोगावले हे कॅबिनेट मंत्री जरी असले तरी ते आमच्यातील एक सदस्य आहेत याचा जास्त आनंद आहे. तसेच त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडत करत समाजसेवेचे व्रत घेतले आणि या समाजसेवेची फलश्रुती म्हणजे आज त्यांना कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त झाले ही माऊलीची कृपा असल्याचे सांगितले.
शेवटी भरत गोगावले हे बोलताना म्हणाले की वारकऱ्यांच्या भक्ती करिता जसे ईश्वराचे मंदिर पवित्र तसे शालेय विद्यार्थ्यांना ज्ञान व संस्कार मिळण्याचे ज्ञानमंदिर म्हणजे शाळा. त्यामुळे शाळेला सर्वांनी करावी .शाळेतून आदर्श व्यक्तिमत्व घडतात म्हणून शाळेविषयी सर्वांनी आदर ठेवावा असे सांगितले. तसेच आयुष्यात कितीही मोठे झालो तरी देव, देश आणि धर्म त्याचबरोबर आई-वडील, गुरु व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नये असा मोलाचा संदेश दिला. संतांच्या त्याग व विचारामुळे आज हे जग चालत आहे. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आचार व विचारांवर चालण्याची गरज असल्याचे सांगितले. जिद्द, चिकाटी आणि एकाग्रता साधली तर माणूस कधीच अपयशी होऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी सतत प्रयत्न करत राहण्यासाठी प्रेरणा दिली. स्वतःच्या जीवनातील खडतर / प्रतिकूल परिस्थिती ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास थोडक्यात व्यक्त केला. तो सर्वांना प्रेरणादायी ठरेल . अजित वडगावकर यांनी स्व: साठी काही न मागता शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व माऊली भक्तासाठी केलेली मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी मानले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर मंत्री विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षक शिक्षकदारांमध्ये रमले व त्यांच्याशी संवाद साधला.
Tuesday, September 16, 2025
सुनीता विलियम्स यांचे धक्कादायक खुलासे
अंतराळात नऊ महिने घालविल्यानंतर अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी पत्रकारांशी केलेले वक्तव्य सध्या संपूर्ण जगभर चर्चेचा विषय ठरत आहे.
"माझं अंतराळात अडकणं हे देवाची इच्छा असल्यासारखं वाटत होतं. जेव्हा मला अंतराळात २० दिवस झाले होते, तेव्हा मी जणू मृत्यूशी सामना करत होते. अन्न व पाण्याचा साठा कमी होत चालल्यावर मला वाटलं की आता पुढे कसं जगायचं? त्याच वेळी मला सनातन धर्मातील चैत्र नवरात्रीच्या उपवासाची आठवण झाली. त्या दिवसापासून मी संध्याकाळी थोडं अन्न व पाणी घेत असे आणि सकाळी थोडंसं पाणी. एक महिना असा गेला आणि मी निरोगी आणि आनंदी होते. मला वाटू लागलं की मी आणखी काही काळ तग धरू शकते.
"मृत्यूची वाट पाहत असताना मी संगणक उघडला आणि विचार केला की बायबल वाचावं. मी ते आधी अनेक वेळा वाचलं होतं, त्यामुळे एका पानानंतर मला कंटाळा आला. मग मला पुन्हा एकदा रामायण आणि भगवद्गीता वाचायची इच्छा झाली (आता वाटतं की त्यातून मला काहीशा शक्तीची अनुभूती झाली). मी त्याचं इंग्रजी भाषांतर डाउनलोड केलं आणि वाचायला सुरुवात केली. १०-१५ पाने वाचल्यावर मी थक्क झाले. त्यातील भ्रूणविज्ञान, खोल समुद्र आणि आकाश याबद्दलचं वर्णन अद्भुत होतं. मला वाटलं की हे जगाला सांगितलं पाहिजे.
"अंतराळातून पाहिलं तर सूर्य चिखलाच्या तळ्यात बसल्यासारखा दिसतो. कधी कधी मला वरून काही आवाज येत, जणू काही मंत्रोच्चार चालू आहेत, आणि मला वाटलं की हे संस्कृत किंवा हिंदीत आहेत. माझा सहप्रवासी बॅरी विलमोर म्हणाला की हे सगळं मी दररोज रामायण आणि भगवद्गीता वाचते म्हणून होतंय. त्यानंतर मी रामायण आणि गीतेचं सखोल वाचन करायचं ठरवलं. ती एक अद्वितीय अनुभूती होती. मी लगेच एलन मस्कला फोन करून हे सांगितलं.
"आता तुम्ही थक्क व्हाल – काही दिवस आम्ही इतके घाबरलो होतो कारण आमच्या अंतराळ स्थानकाच्या दिशेने प्रचंड उल्का धडधडत येत होत्या. आमच्याकडे काही उपाय नव्हता, म्हणून आम्ही देवाला प्रार्थना केली. आणि एका चमत्कारीक प्रकारे काही लहान गोलाकार प्रकाशकण (जणू काही तारे) खाली उतरले आणि त्या सर्व उल्कांचा नाश केला. आम्ही ते पाहिलं तेव्हा असं वाटलं की जणू आम्ही त्यांच्यावर तारे फेकतोय. हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होतं. नासाने या घटनेवर अधिक संशोधन करण्याचे आश्वासन दिलं आहे.
"आठ महिन्यांत मी संपूर्ण रामायण आणि भगवद्गीता वाचली. मला जाणवू लागलं की आता मी पृथ्वीवर परतू शकते. माझ्यात एक विलक्षण आत्मविश्वास निर्माण झाला.
"एप्रिल महिन्यात, सूर्यास्ताच्या वेळी, सिंहासारख्या एका जीवासोबत माताजी व त्रिशूल घेतलेली एक आकृती पृथ्वीवर उतरतानासारखी दिसली. ती आकृती पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर अदृश्य झाली. ती कुठून आली हे समजत नव्हतं, म्हणून मी आणि बॅरी विलमोर तिचं निरीक्षण करत होतो. असं वाटलं की ती आकाशाच्या एखाद्या विशेष थरातून खाली आली. त्यामुळे मला समजलं की आकाशाचे एकापेक्षा जास्त थर असतात. कितीही विचार केल्यावरही आम्हाला हे उमगलं नाही की हे उडणारे घोडे कुठे गेले? नंतर मला न्यू यॉर्क टाईम्समधील एक अहवाल दिसला – त्यात हडसन नदीवर चंद्रकोर दिसली होती आणि २ मार्चपासून सनातनी उपवास सुरू झाल्याची बातमी होती. त्यानंतर नांगलमध्ये हे निरीक्षण सुरू होतं. नंतर आम्हाला जाणवलं की आता पृथ्वीवर उपवास संपवण्याची वेळ झाली होती. मला वाटतं की ते देवाच्या आशीर्वादाने येणारे देवदूत होते.
"आता मला वाटतं की सनातन धर्मातील भगवद्गीता खरी आहे. आता माझं संशोधन वेदांच्या विज्ञानावर आधारित असेल – भ्रूणविज्ञान, खोल समुद्राचं विज्ञान. मला खगोलशास्त्राविषयी सर्व काही शिकायचं आहे. नासामध्ये वेदांच्या अलौकिक शक्तींवर संशोधन करणाऱ्या नवीन विभागाची स्थापना करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे."
Friday, September 12, 2025
मराठा भूषण पुरस्काराने" अजित वडगांवकर व संजय घुंडरे यांना सन्मानित
आळंदी - अखिल भारतीय मराठा महासंघ व जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय जगन्नाथ सिताराम शेंडगे पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ व महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित सुरेश वडगांवकर आणि भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी पश्चिम विभागाचे संजयजी घुंडरे पाटील यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन "मराठा भूषण पुरस्कार" श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. निलेश महाराज लोंढे कबीरबुवा, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब मोरे, बंकट स्वामी संस्थानचे ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे शुभहस्ते व मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. संजय घुंडरे यांचा पुरस्कार त्यांच्या वतीने बाबूलाल घुंडरे यांनी स्वीकारला.
याप्रसंगी दिल्ली येथील विश्वभुषण राजे शिवछत्रपती फौंडेशनचे जनार्दन पाटील, ह.भ.प. पंडित क्षीरसागर, ह.भ.प. आत्माराम शास्त्री जाधव, ह.भ.प. भगवान कराड, ह.भ.प. बाळासाहेब शेवाळे, ह.भ.प. संदीप लोहार तसेच मराठा महासंघाचे पदाधिकारी दशरथ पिसाळ, दिलीप धंदे, धाराजी भुसारे, प्राध्यापक शिवराम सोंडगे, गणेश नाईकवाडे, संतोष नानावटे, अविनाश घिघे, आळंदी नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष सुरेश वडगांवकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष विलासराव घुंडरे, आळंदी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाबूलाल घुंडरे, नितीन घुंडरे, दिनेश कुऱ्हाडे, विश्वंभर पाटील, मराठा महासंघाचे भारतातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते, आळंदीकर ग्रामस्थ व वारकरी संप्रदायातील भाविकभक्त, विद्यार्थी, मराठा महासंघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष बब्रुवान शेंडगे व शेंडगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविकात भगवान शेंडगे यांनी पिताश्री स्व. जगन्नाथ सि. शेंडगे पा. यांच्या पाचव्या पुण्यस्मरण सोहळा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जन्म महोत्सवी वर्षानिमित्त श्री क्षेत्र आळंदीत करीत असल्याचे सांगितले व त्यानिमित्ताने ह.भ. प. पंडित क्षीरसागर यांचे कीर्तन झाले व अजित वडगांवकर समाजात विविध क्षेत्रात विशेषतः शिक्षण क्षेत्रात गेली 25 वर्ष आपल्या कार्यकर्तुत्वाने उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांनी शिस्त, परिश्रम, ध्यास गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून शैक्षणिक कला व क्रीडा या क्षेत्रात मारलेली गरुड झेप मराठा समाजाला भूषणावह वाटते आणि म्हणूनच त्यांच्या या अतुलनीय सेवेबद्दल त्यांना "मराठा भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात अभिमान वाटतो असे सांगितले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून संजय घुंडरे हे सुद्धा धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करीत असल्याचे सांगितले.
आपल्या मनोगतामध्ये बापूसाहेब मोरे म्हणाले की, आजचा हा पुरस्कार जैन - मारवाडी समाजातील व्यक्तीला दिला जात आहे कारण मराठा समाज हा जातीपातीच्या पलीकडे आहे. त्याकरिता त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या साहित्याचे दाखले देत हा मुद्दा स्पष्ट केला. अजित वडगांवकर हे गेली 25 वर्षे तुकाराम बीजेला माझ्या कीर्तनाला आपल्या बंधूसह येत असतात. त्यावेळी तुकाराम महाराज मराठा समाजाचे आणि मी जैन समाजाचा हा भेद त्यांनी मानला असता तर हा पुरस्कार त्यांना मिळालाच नसता. तसेच त्यांची व संजय घुंडरे या योग्य व्यक्तींची पुरस्कारा करीता निवड केल्याबद्दल शेंडगे यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. निलेश महाराज लोंढे कबीरबुवा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मराठा महासंघ संस्था ही जातीयवादी नाही. महाराष्ट्रात राहणारी माणसं ही सर्व माय मराठीची लेकरं आहेत ही सर्व मराठा आहेत असे समजून आपण महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व अठरापगड जातींना बरोबर घेऊन आपला संघ काम करतोय व त्यांना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित करतो हे आजच्या जातीपातीच्या राजकारणाचा विचार करता संघाचं काम व भूमिका दीपस्तंभाप्रमाणे आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये संघाच्या वतीने असे पुरस्कार दिले गेले पाहिजेत हीच वारकरी संप्रदायाची समतेची भूमिका आहे व याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये आठशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी केली. त्यावेळी ज्या व्यवस्थेने समाजात विघातकपणा आणला ती व्यवस्था ज्ञानदेवांनी उलथवून टाकली. हीच भूमिका पुढे छत्रपती शिवाजीराजांनी घेतली आणि हे विचार याच भूमीत रुजले. ज्याला इतिहास आणि भूगोल समजला त्याला पुढील उज्वल भविष्य घडवता येते त्याकरिता इतिहास आणि भूगोल समजला पाहिजे. समाजापुढे असणारे ज्वलंत प्रश्न सोडविण्याकरीता आपल्या संघाबरोबर आम्ही सर्वजण राहू. गोरगरिबांच्या विशेषता वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत अजित वडगावकर चांगल्या पद्धतीने काम करतायेत. त्यांना व संजय घुंडरे यांना पुरस्कार दिल्याबद्दल महासंघाचे आभार मानले.
माझ्या आजोबांपासून आम्ही बहुजन समाजात काम करत असताना जाती धर्माचा विचार न करता माऊलींची सेवा म्हणून काम करतो व समाज सुद्धा आम्हाला सामावून घेतो. आज हा पुरस्कार स्वीकारताना जबाबदारी अजून वाढली. आळंदीत येऊन वेगवेगळ्या माध्यमातून माऊलींची सेवा करणाऱ्यांना मदत करणे हे आमचं कर्तव्यच असल्या कारणाने आम्ही ते करत असतो व करत राहू. आज आम्हाला हा पुरस्कार संघाने दिला त्याबद्दल संघाचा आभारी असल्याचं सन्मानास उत्तर देताना अजित वडगांवकर यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात दिलीपदादा जगताप म्हणाले महासंघ जाती व धर्माच्या पलीकडे काम करतो हाच विचार आजच्या राजकारणातील लोकांनी करावा आणि म्हणूनच आज अजित वडगांवकर यांना हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. प्रमोद महाराज काळे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Tuesday, September 9, 2025
श्रीमंत दादासाहेब करांडे हे आध्यात्मिक वारकरी चे जागतिक दूत आहेत
📖 श्रीमंत दादासाहेब करांडे
---
प्रकरण १ : प्रारंभिक परिचय
श्रीमंत दादासाहेब करांडे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. उद्योग, सामाजिक कार्य, अध्यात्म, शिक्षण व कला अशा सर्व क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या जीवनाची दिशा ही केवळ वैयक्तिक प्रगतीपुरती मर्यादित नसून, “समाजाच्या प्रत्येक घटकाला काहीतरी देत राहणे” हा त्यांचा जीवनमंत्र आहे.
---
प्रकरण २ : उद्योगक्षेत्रातील वाटचाल
व्यवसायात आधुनिकतेची सांगड घालून समाजहिताची जाणीव ठेवणारे ते एक यशस्वी उद्योजक आहेत.
श्रीमंत भारत ग्रुप व डी.के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या नामांकित उद्योगसमूहांचे ते CEO आहेत.
रोजगारनिर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिकांना संधी देणे हे त्यांच्या उद्योगधंद्यांचे मुख्य आधार आहेत.
त्यांनी उद्योग क्षेत्र केवळ नफा मिळवण्याचे साधन न मानता, “समाजाच्या प्रगतीचे साधन” म्हणून पाहिले आहे.
---
प्रकरण ३ : सामाजिक कार्यातील योगदान
दादासाहेब यांची सामाजिक जाण अतिशय प्रगल्भ आहे.
ते मी 24 तास डिजिटल मीडिया या माध्यमाचे प्रमुख आहेत. समाजातील प्रश्न, चळवळी, लोकांच्या भावना यांना आवाज देण्याचे कार्य ते करत आहेत.
ते सनई छत्रपती शासन आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आहेत. या पदावरून त्यांनी छत्रपतींच्या आदर्शांवर आधारित समाजसेवा व आध्यात्मिक मूल्ये यांचा प्रसार सुरू केला आहे.
समाजातील वंचित घटकांपर्यंत छत्रपतींचा संदेश पोहोचवणे, हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे.
---
प्रकरण ४ : वारकरी परंपरेतील अद्वितीय कार्य
वारकरी संप्रदायाच्या इतिहासात दादासाहेबांनी नवा अध्याय लिहिला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या चलित पादुका दिंडीचे आयोजन परदेशात करून त्यांनी इतिहास घडवला.
दुबई, लंडन, नेपाळ, जपान अशा अनेक देशांत त्यांनी “श्री संत ज्ञानोबा-तुकोबा विश्वभ्रमण दिंडी” नेली.
ही दिंडी पुढे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा संकल्प घेऊन पुढे चालत आहे.
त्यांच्या या कार्याचा उद्देश असा – “भारतीय परदेशात कुठेही असला, तरी त्याने आपली संस्कृती विसरू नये.”
आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून त्यांनी डिजिटल कीर्तनकार ही संकल्पना सुरू केली आणि वारकरी संप्रदायातील पहिले डिजिटल कीर्तनकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
---
प्रकरण ५ : शैक्षणिक व कला क्षेत्रातील भूमिका
श्रीमंत दादासाहेब करांडे हे केवळ उद्योजक किंवा आध्यात्मिक नेतेच नाहीत तर एक कुशल शिक्षक आणि कलाकार देखील आहेत.
ते सुप्रसिद्ध सूत्रसंचालक असून, विविध कार्यक्रमात प्रभावी सूत्रसंचालन करतात.
भाषणकला, संवादकौशल्य व नेतृत्वगुण या विषयांवर ते प्रशिक्षण देतात.
अनेक नाटकं व वेब सिरीज मध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत, ज्यातून त्यांची कलात्मक बाजू प्रकट झाली आहे.
त्यांनी तरुण पिढीसाठी “मी श्रीमंत आहे” या शोद्वारे मार्गदर्शन केले आहे. या शोमुळे असंख्य विद्यार्थ्यांना जीवनात सकारात्मक दृष्टी मिळाली.
---
प्रकरण ६ : जागतिक अनुभव
आजवर त्यांनी १८ देशांचा दौरा केला आहे.
या प्रवासातून त्यांनी विविध संस्कृती, समाजव्यवस्था, शिक्षणपद्धती आणि अध्यात्माचे अनेक पैलू जवळून पाहिले आहेत.
विदेश दौऱ्यांतून त्यांनी केवळ शिकणेच नाही, तर भारतीय संस्कृतीचा प्रसारही केला आहे.
प्रत्येक देशात भारतीय वारकरी परंपरेची ओळख करून देऊन त्यांनी भारताचा सांस्कृतिक दूत म्हणून कार्य केले आहे.
---
प्रकरण ७ : सर्वांगीण प्रेरणा
श्रीमंत दादासाहेब करांडे यांच्या कार्याचा सार असा आहे की, ते ज्या क्षेत्राला स्पर्श करतात तेथे नवा उजेड निर्माण होतो.
उद्योगात ते दूरदृष्टीचे नेते,
समाजात प्रेरणादायी कार्यकर्ते,
अध्यात्मात वारकरी परंपरेचे जागतिक वाहक,
शिक्षणात मार्गदर्शक,
तर कलाक्षेत्रात प्रभावी कलाकार आहेत.
त्यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ वैयक्तिक यशापुरते मर्यादित नसून, हजारो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे.
---
✨ निष्कर्ष
श्रीमंत दादासाहेब करांडे हे नाव म्हणजे – उद्योगातील प्रगती, समाजातील सेवा, अध्यात्मातील जागरूकता, शिक्षणातील मार्गदर्शन आणि कलाक्षेत्रातील प्रतिभा.
त्यांची वाटचाल म्हणजे “यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवताना समाजालाही साथ घेऊन पुढे जाण्याचा आदर्श मार्ग.”
---
Friday, September 5, 2025
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव संपन्न
आळंदी - श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची येथे गणेश उत्सवाचे औचित्य साधून चित्रकला विभागाच्या वतीने कलाशिक्षक दत्तात्रय वंजारी व सोमनाथ बेळळे यांच्या मार्गदर्शनाखाली *'व्यसन सोडा आरोग्य जोडा'* या विषयावर पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. तसेच “विद्यार्थी घडताना” या उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत इंद्रायणी नगर व कासारवाडी येथील मातृभूमी ढोल-ताशा पथकाने वादनाचा शानदार कार्यक्रम सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध वाद्य संस्कृतीला उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गणेश वंदना वादनाने झाली. नंतर मातृभूमी पथकाने एकसुरात ढोल, ताशा आणि झांज वाजवून शाळेचा परिसर दणाणून सोडला. तालावर थिरकणारे स्वर आणि त्यात गुंफलेला उत्साह पाहून उपस्थित विद्यार्थी, पालक सर्वच प्रेक्षक भारावून गेले. ढोल-ताशा पथक हे महाराष्ट्रातील उत्सव, मिरवणुका व जत्रांचे वैशिष्ट्य आहे. या वाद्यसंस्कृतीतून एकात्मता, शिस्त, सामूहिकता आणि परंपरेचे दर्शन घडते. विद्यार्थ्यांना या वादनाचा अनुभव मिळावा, त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास, टीमवर्क व सांस्कृतिक अभिमान निर्माण व्हावा हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
संस्था सचिव अजित वडगांवकर यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की,आपल्या पिढीपर्यंत पोहोचलेली ढोल-ताशाची परंपरा ही फक्त नादमय कलाच नाही तर महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांत सहभागी झाल्यामुळे त्यांच्यात शिस्तबद्धता, सहकार्याची भावना आणि संस्कृतीची जाण निर्माण होते. प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून 'सोशल मीडिया आभास की आरसा' याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मधील कौशल्यांचा विकास करून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जतन केल्या पाहिजेत. या कार्यक्रमात शिक्षक, पालक व स्थानिक मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उद्योजक दत्तात्रय मुंगसे पाटील त्यांच्या हस्ते आणि शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गणरायांची आरती संपन्न झाली. उज्वला कडलासकर, सोनाली आवारी, अमीर शेख, साहेबराव वाघुले दत्तात्रय वंजारी, राजू सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व महिलांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयातील पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, मुख्यालिपीका संगीता पाटील, ज्येष्ठ अध्यापिका हेमांगी उपरे व विद्यालयाच्या माजी शिक्षिका नीता गांधी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. गुणवत्ता विभागाच्या वतीने गणपती उत्सवाचे औचित्य साधून *नशा नको...ज्ञान हवे* या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले. गणरायाच्या आगमनाचा आनंदोत्सव, विद्यार्थ्यांमधील विविध कलाकृती, वाद्य संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच पारंपारिक व आधुनिक उपक्रम साजरे करून या कार्यक्रमास वेगळी उंची प्राप्त झाली.
Thursday, September 4, 2025
पालक बनले शिक्षक
आळंदी देवाची :- श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकदिन उत्साहात संपन्न झाला.
प्रशालेने पालकांमधून शिक्षक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचा लाभ घेत २८ पालक शिक्षक व त्यामधील एक मुख्याध्यापक यांना संधी देण्यात आली. प्रशालेने इयत्तावार केलेल्या दिवसभराच्या नियोजनाप्रमाणे पालक शिक्षकांनी वेळेत उपस्थित राहून बालवाडी ते इयत्ता चौथीच्या १२ वर्गांचे अध्यापनाचे आनंदाने कामकाज केले. संपूर्ण दिवसाचा प्रशालेचा कार्यभार यशस्वीरित्या पार पाडत शिक्षक बनण्याचा आनंद घेतला.
शेवटच्या तासिकेमध्ये समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, २८ शिक्षक बनलेले पालक, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.
प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकामध्ये प्रशालेमध्ये राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांची माहिती देत शिक्षकाची भूमिका, पालकाची भूमिका, शिक्षणाचा हेतू प्रत्यक्षरित्या समजावा म्हणून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
याप्रसंगी पालक शिक्षक भाग्यश्री भागवत, अमृता कारेकर, भाग्यश्री बैरागी, अंजली ढगे, शितल ढवळे, चंदा खुळे, पुजा साकोरे इ. पालकांनी शिक्षक बनण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशालेचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. प्रशाला करत असलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्या व भविष्यात प्रशालेच्या उपक्रमांमध्ये आणि कार्यामध्ये सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुर्यकांत मुंगसे यांनी प्रशालेमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.
एक दिवसीय मुख्याध्यापक रामेश्वर गाडे यांनी प्रशाला चालवण्यासाठी सूक्ष्म नियोजन, यशस्वीरित्या अंमलबजावणी आणि योग्य नेतृत्व गुणांची आवश्यकता असते असे मत व्यक्त करत प्रशालेस विद्यार्थी उपयोगी वस्तू देण्याचे आश्वासन दिले.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यकारी सदस्य अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रशालेत राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत संस्थेचा इतिहास व गौरवशाली परंपरा पालकांना सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, नियोजन व आभार राहुल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा काळे, निशा कांबळे, वैशाली शेळके, प्रतिभा भालेराव, गजानन राठोड, गीतांजली मोरस्कर यांनी सहकार्य केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Sunday, August 24, 2025
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या हस्ते सुवर्ण कलशारोहण कृतज्ञता सोहळ्यामध्ये सन्मान
श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत व ह .भ. प .डॉ. नारायण म. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
त्या सुवर्ण कलशाकरिता देवस्थानने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने जमा झालेला सेवा निधी देवस्थानकडे जमा करण्यात आला होता. त्यानिमित्ताने आज देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा सन्मान केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या हस्ते व ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व देवस्थानचे सर्व विश्वस्त व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. संस्थेच्या वतीने हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी स्वीकारला.
Wednesday, August 20, 2025
जगातील मोठ्यात मोठी ऑफर सुद्धा लोक आपल्या स्वप्नांसाठी आणि ध्येयांसाठी नाकारू शकतात
मार्क झुकरबर्ग हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर फेसबुक आणि मेटा उभं राहतं. जगातील सगळ्यात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटाचे सीईओ असलेले झुकरबर्ग नेहमीच नवे टॅलेंट शोधत असतात. पण अलीकडेच घडलेली एक घटना दाखवते की जगातील मोठ्यात मोठी ऑफर सुद्धा लोक आपल्या स्वप्नांसाठी आणि ध्येयांसाठी नाकारू शकतात.
मीरा मुराटी, या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील टॉप वैज्ञानिक. ओपनएआयच्या माजी सीटीओ असलेल्या मुराटी यांनी स्वतःचं थिंकिंग मशीन लॅब नावाचं स्टार्टअप सुरू केलं. झुकरबर्ग यांनी त्यांचं स्टार्टअप विकत घेण्यासाठी तब्बल १ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८५०० कोटी रुपयांची ऑफर दिली. ही ऑफर ऐकून कुणालाही मोह होईल, पण मुराटी यांनी ती थेट नाकारली. त्यांच्यासाठी पैशांपेक्षा महत्त्वाचं होतं त्यांच्या स्वप्नांचा आणि संशोधनाचा प्रवास.
ही गोष्ट इथेच थांबली नाही. मुराटी यांच्या निर्णयामुळे झुकरबर्ग भडकले आणि त्यांनी कंपनीतील टॅलेंट "हायजॅक" करण्याचा प्लॅन आखला. त्यांचे सहसंस्थापक अँड्र्यू टुलॉक यांना तर जवळपास १.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल १३,००० कोटी रुपयांचा पॅकेज देण्याची ऑफर मेटाकडून आली. ही ऑफर ऐकून जग थक्क झालं. पण टुलॉक यांनीही स्पष्ट सांगितलं – “पैसे सगळं नाही, मला माझ्या आयडियावर आणि टीमसोबत काम करायचं आहे.”
हे ऐकल्यावर सगळ्यांना एक गोष्ट कळली – खरा टॅलेंट फक्त पैशांसाठी विकला जात नाही. मीरा मुराटी आणि टुलॉक यांनी दाखवून दिलं की इनोव्हेशन आणि व्हिजन यांचं मूल्य डॉलरमध्ये मोजता येत नाही. त्यांना जे घडवायचं आहे ते फक्त मोठ्या पगारासाठी कंपनी बदलून शक्य होणार नाही, त्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास लागतो.
आज ही कहाणी जगभरात चर्चेत आहे कारण झुकरबर्गसारख्या मोठ्या सीईओची ऑफर नाकारणं हे छोटं काम नाही. पण यामुळे हेही स्पष्ट झालं की भविष्यातील टेक जग AIवर आधारित असेल आणि त्यात खरी ताकद असणारे लोक आपलं व्हिजन गमावणार नाहीत.
ही यशोगाथा आपल्याला शिकवते की पैशांचा मोह कितीही मोठा असला तरी स्वप्नांवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवला तर आपण इतिहास घडवू शकतो. मीरा मुराटी आणि टुलॉक यांचा निर्णय आज लाखो तरुणांना प्रेरणा देतोय – “खरी कमाई म्हणजे आपल्या ध्येयांवर ठाम राहणं, फक्त पैशांचा मागे धावणं नाही.”
#SuccessStory #MiraMurati #AndrewTulloch #Meta #MarkZuckerberg #Inspiration #AI #TechFuture #Motivation #successgurumarathi
Tuesday, August 19, 2025
कुंडेश्वर अपघात: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पीडित कुटुंबांना ना.एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ आर्थिक मदत
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे ११ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडुन ना.एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली आहे. नीलमताई गोर्हे यांनी दिलेल्या या आर्थिक मदतीचे खेड तहसीलदार व स्थानिक अधिकारी, पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
खेड येथील दुर्घटनेनंतर डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः मृतांच्या नातेवाईकांना भेटून सांत्वन केले. मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल, खेडमधील सुश्रुत आणि शिवतीर्थ हॉस्पिटल्समध्ये जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. पापळवाडी येथे शोकाकुल कुटुंबांशी संवाद साधताना त्यांनी शासनाच्या सर्वतोपरी सहकार्याची हमी दिली होती. त्यानुसार तातडीने पावले उचलत आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संवेदनशील आणि त्वरित हस्तक्षेपामुळे पीडितांना स्वनिधीतून केवळ आर्थिक मदतच नाही, तर मानसिक आधारही मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या उपाययोजनांनी शासनाची संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा दिसून येते. कुंडेश्वरच्या या दु:खद घटनेत गमावलेल्या जीवांना परत आणता येणार नाही, परंतु डॉ. गोऱ्हे यांच्या प्रयत्नांमुळे पीडित कुटुंबांना आर्थिक स्वरुपात दिलासा आणि आधार मिळाला आहे.
*सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना*
डॉ. गोऱ्हे यांनी राजगुरुनगर येथे तातडीची शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अपघातस्थळी धोकादायक वळणावर संरक्षक भिंत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ संरक्षक भिंत बांधण्याचे आणि अन्य सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या कारवाईमुळे भविष्यातील संभाव्य अपघातांना आळा बसेल असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)