SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Sunday, January 25, 2026
नर्मदा जयंती इंद्रायणी नदी घाटावर उत्साहात साजरी.
अर्जुन मेदनकर आळंदी - इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती निमित्त नर्मदा आरती तसेच इंद्रायणी माता,नर्मदा माता नाम जयघोष, वारकरी सांप्रदायिक भजन सेवा, पंचपदी धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती साजरी करण्यात आलीं. या वेळी दिनकर तांबे यांचे हस्ते नर्मदा प्रतिमा पूजन, कन्या पूजन ,आले. या प्रसंगी रविंद्र महाराज कुमकर, दिलीप महाराज ठाकरे, इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे, अशोक महाराज सालपे यांचे सह श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री मोहन महाराज शिंदे यांचे संस्थेतील साधक वारकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, वारकरी, भाविक उपस्थित होते. या वेळी हरिनाम जय घोष उत्साहात करण्यात आला. गेल्या तीन वर्षां पासून इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती, रथ सप्तमी साजरी करण्यात येत असल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची उत्साहात सांगता* *"ओळख श्री ज्ञानेश्वरीची" पुस्तकाचा द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा संपन्न
आळंदी पुणे डिजिटल मीडिया महाराष्ट्र - श्री ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची सांगता कार्यक्रम मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान व जीवनमूल्ये यांचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम याचा सखोल आणि प्रभावी उलगडा आपल्या वक्तृत्वातून केला व सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी विजेत्या 23 सहभागी स्पर्धकांना आकर्षक स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रे व रोख पारितोषिके देऊन उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' व हरिपाठ राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत एकूण 405 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये 38 विद्यार्थी उपांत्य फेरीत पोहोचले. त्यातील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथील राधिका परमेश्वर फपाळ या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक प्राप्त करून 9251 ₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. ओम गोरक्षनाथ गेठे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून 8251₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. तर श्री व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल वडगावशेरी येथील अक्षदा अरुण डोळस या विद्यार्थ्यांनीने 7251 ₹. रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी पारितोषिक मिळविले. तसेच हरिपाठ पाठांतर व अर्थ विवेचन या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत भेकराईमाता माध्यमिक विद्यालय भेखराईनगर येथील यश शिंदे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त करून 5000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले, श्री निकेतन गुरुकुल विद्यालय आळंदी येथील स्वरांजली झाडे या विद्यार्थिनींने द्वितीय क्रमांक प्राप्त करून 4000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले तर भोसरी येथील ध्रुव सोनवणे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त करून 3000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी पारितोषिक मिळविले.
तसेच विलास महाराज बालवडकर यांच्या वतीने प्रथम पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000₹ व स्वकाम सेवा संघाचे सारंग जोशी यांच्या वतीने प्रथम तीन विद्यार्थ्यांना (रोख 500₹) देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. योगी निरंजननाथ प्रमुख उपस्थिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, वारकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विलास बालवडकर, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, विविध संस्थांचे, शाळांचे पदाधिकारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विविध संस्थांचे सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रकाश काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली. ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान व मूल्यशिक्षणाने आदर्श समाज व देश घडावा यासाठी सुरू झालेल्या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' उपक्रमाचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व पत्रकार संघ आळंदी देवाची, सर्व अध्यापक या परिवाराच्या सहकार्याने साऱ्या विश्वात या उपक्रमाचा प्रचार व प्रसार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
तदनंतर 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत सुरू झालेल्या 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' या रोपट्याचा केवळ माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने वटवृक्ष झाला याचा आनंद व्यक्त केला. “अशा उपक्रम व स्पर्धांमुळे तरुण पिढीच्या विचार विश्वाचा विकास होतो” असे सांगितले.
सुभाष महाराज गेठे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या वक्तृत्वा मुळे अंगावर शहारे उमटल्याचे सांगितले. या उपक्रमातील विद्यार्थी हा समाजाचा आरसा असून यांना चमकविण्याचे काम आपण सर्वांनी करावे व समाजातील धनाढ्य लोकांनी हा उपक्रम जगभर पोहचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डॉ. भावार्थ देखणे यांनी उपक्रमाची महती व आजच्या पिढीला उपक्रमाची असलेली आवश्यकता सांगत हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविला जावा जेणेकरून विद्यार्थ्यांमधील दोष - दुर्गुण दूर होतील. ज्ञानेश्वरीतील अभ्यासपूरक भाव, विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्व घटकांचे कौतुक केले. आणि हे कार्य असेच अबाधित टिकविण्यासाठी संस्थान कायम बांधील राहील असे आश्वासनही दिले.
अध्यक्षीय भाषणात योगी निरंजननाथ यांनी ज्ञानेश्वरीचे विचार आजच्या समाजासाठी किती मार्गदर्शक आहेत यावर प्रकाश टाकला. आजच्या पिढीला अंधारातून बाहेर काढणारा तेजोमय सूर्य म्हणजे "ओळख श्री ज्ञानेश्वरीची" हा उपक्रम असल्याचे गौरवास्पद उद्गार काढले. विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने वकृत्व स्पर्धेमध्ये भाष्य केले तेव्हा आज या उपक्रमासाठी कष्ट घेत असलेल्या आयोजकांचा उद्देश साध्य झाल्याचा आनंदही व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने आळंदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे, नगरसेविका कांचन किरण येळवंडे, अर्चना तापकीर, उज्वला काळे, वैजयंता उमरगेकर यांचा शाल, श्रीफळ, मोत्याची माळ व माऊलींची मूर्ती देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व तुकाराम गवारी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Friday, January 16, 2026
धानोरे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत सदिच्छा समारंभाचे आयोजन
धानोरे (ता. खेड) येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत बदली झालेल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता व सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेच्या जडणघडणीत, गुणवत्तावाढीत व शैक्षणिक यशप्राप्तीत मोलाचे योगदान देत शाळेला गुणवत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी ज्या शिक्षकांनी तन-मन-धन अर्पण करून निष्ठेने सेवा बजावली, अशा बदली झालेल्या सर्व शिक्षकांचा या समारंभात गौरव करण्यात येणार आहे.
हा सदिच्छा समारंभ शनिवार, दि. 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, धानोरे यांनी केले आहे.
Thursday, January 15, 2026
श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदीची संस्कृती बाजीराव नवले इंटरमिजिएट परीक्षेत राज्यात १५ वी
आळंदी पुणे - कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा सप्टेंबर २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून ३,१४,६६६ तीन लाख चौदा हजार सहाशे सहासष्ट विद्यार्थी बसले होते. श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत परीक्षा केंद्र असून याच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कु. संस्कृती बाजीराव नवले ही राज्यात गुणवत्ता यादीत १५ वी आली आहे. या विद्यार्थ्यांनीला मार्गदर्शन कलाशिक्षक वंजारी दत्तात्रय मारुती यांनी केले आहे.
या अगोदरही शासकीय रेखाकला एलिमेंटरी परीक्षेत २०१८ साली स्वप्निल हनुमंत राऊत हा विद्यार्थी राज्यात २७ वा आला होता. या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या तालुका, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. संस्कृतीच व कलाशिक्षक वंजारी यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव अजित वडगावकर व प्राचार्य किसन राठोड यांनी केले .
Wednesday, January 14, 2026
अलंकापुरीत मकर संक्रांत दिनी महिलांची माऊली मंदिरात गर्दी माऊली मंदिरात षटतिला एकादशी दिनी लाखावर भाविक श्रींचे दर्शनास इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती उत्साहात ; महिलांचे हळदी कुंकू
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरात षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत दिनी राज्यातील लाखावर भाविकांनी गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले. इंद्रायणी नदी दुतर्फ़ा आणि नदीवरील स्काय वॉल्कवर देखील महिला सह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आळंदी माऊली मंदिरात महिला भाविकांची दर्शनास गर्दी अधिक गर्दी होती. मकर संक्रांती, षटतिला एकादशीच्या पावन पर्व साधत इंद्रायणी नदी घाटावर आळंदी देवस्थान तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू आणि इंद्रायणी आरती सेवा समितीसह देबस्थानचे वतीने इंद्रायणी महाआरती मंत्र जयघोषात झाली.
मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती.
इंद्रायणी नदी घाटावर आरती प्रसंगी पदाधिकारी आणि सेवा भावी संस्था यांचा सत्कार करीत नदी प्रदूषण, नदी परिसर स्वच्छतेचा एल्गार जाहीर करण्यात आला. महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आळंदी देवस्थान महिला विश्वस्त रोहिणी पवार यांनी देवस्थान तर्फे राबविला. आळंदीतील इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी आरती आणि आवेकर भावे रामचंद्र संस्थान तर्फे मंदिरात महिलांसाठी उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत सुमारे २०० वर महिला भाविकांना वाण वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख विश्वस्त ऍड राहुल आवेकर, पूजा आवेकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, महेश आयचीत आदी उपस्थित होते. या वेळी महिलांना वाण आणि हळदी कुंकू पूजा आवेकर यांचे हस्ते देण्यात आले.
आळंदीत मकर संक्रांत दिनी हजारो महिलांनी माऊलीचे दर्शनासह महिलाना हळदी कुंकू देत आळंदी परिसरातील मंदिरांसह इंद्रायणी नदी घाटावर ओवसा वाहण्यास तसेच एकमेकींना ओवसा वाण देत मकर संक्रांत प्रथा परंपरांचे पालन करीत साजरी केली. आळंदी देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त ऍड रोहिणी पवार यांनी प्रथमच इंद्रायणी नदी घाटावर देवस्थान तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू उपक्रम राबविला.
इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने देखील इंद्रायणी नदीची आरती करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजक अनिता झुजम, संयोजक नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, बाळासाहेब ठाकूर, महिला बचत गट महा संघ अध्यक्षा सुवर्णा काळे, अनिता शिंदे, कौशल्या देवरे, नीलम कुरधोंडकर, लता वर्तले, शैला तापकीर, केशरबाई कदम, मीरा कांबळे, सरस्वती भागवत, रंजना गिरे, सावित्री घुंडरे पाटील, सुनंदा पवार, पूजा पवार, वर्षा खिलारे, शोभा कुलकर्णी, कोमल वाळूतकर, सुनीता घोटकुले, कांचन घनवट, कमल नाणेकर, काशीबाई अडकिने, जयश्री भागवत, राधिका अडकिने, सुनीता हिळ्ळी, सृष्टी हिळ्ळी, अस्मिता गोरे, समृद्धी भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
माऊली मंदिरात श्रीना तिळाचा अभिषेक, महानैवेद्य झाला. भाविकांची गर्दी लक्षांत घेता महिलांसाठी पंखा मंडपातून तसेच पुरुष भाविकांना विना मंडपा समीप श्रींचे दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. मागील वेळी पुरुष भाविकांना दर्शनास मंदिरात न सोडल्याने झालेली नाराजी यावरी दूर करून श्रींचे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविक, वारकरी, नागरिकांनी श्रींचे दर्शन गर्दी करत घेतले. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविक दर्शनास जातील असे नियोजन देवस्थानाने केले. मंदिरात शांतता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होतो. या साठी व्यवस्थापक माऊली वीर, उप व्यवस्थापक तुकाराम माने, बल्लालेश्वर वाघमारे, देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम पूर्वक काम पाहिले. या वेळी आळंदी देवस्थानचे पदाधिकारी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, निलेश महाराज लोंढे, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, नगरपरिषदेचे नूतन पदाधिकारी आदींचे उपस्थितीत इंद्रायणी आरती वेदमंत्र जय गोष्ट झाली. या वेळी इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासह स्वच्छतेचे काम प्रभावी होण्यासाठी पदाधिकारी यांनी ग्वाही दिली.
एअकादशी आणि मकर संक्रांत एकत्र आल्याने महिला भाविकांची मोठी गर्दी दर्शनबारीसह मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाटावर तसेच आळंदीतील श्री विष्णू मंदिर, श्री राम मंदिर, श्री स्वामी महाराज मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर येथे भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनबारीसाठी पुढे इंद्रायणी नदी वरील स्काय वॉल्क पुलावर हि महिलांची मोठी गर्दी होती. मंदिराचे दर्शनबारी लगत भाविकांची दर्शनास गर्दी झाली. मात्र त्या भागातील अरुंद रस्ते तसेच मंदिर परिक्रमा पान दरवाजा मार्ग प्रशस्त नसल्याने रहदारीला गैरसोयीचे ठरले. षटतिला एकादशी दिनी आळंदी मंदिर परिसरासह इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा, प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणेस भाविकांनी गर्दी केली. परंपरेने मंदिरातील धार्मिक उपक्रम विधी झाले. मात्र देवदर्शनास श्रींचा गाभारा बंद ठेवण्यात आला होता. एकादशी दिनी लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेत मकर संक्रांत देखील साजरी केली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र नाईक यांनी शांतता सुव्यवस्थेचे काम परिश्रम पूर्वक पाहिले.
Saturday, January 3, 2026
संत तुकोबांच्या तपोभूमी रक्षणासाठी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मधुसूदन पाटील महाराजांनी घेतली भेट
देहू आळंदी-सातारा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत संत तुकोबांच्या तपोभूमीच्या रक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मधुसूदन महाराजांनी सांगितले की, श्रीक्षेत्र देहूजवळील संत तुकोबांची ध्यान-चिंतन-साक्षात्कार तपोभूमी म्हणून वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र भंडारा व श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर यांना शासनाने सन २०११ मध्ये अधिसूचना काढून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. मात्र या ऐतिहासिक संतपीठ परिसरात शासनपुरस्कृत एमआयडीसी व काही बिल्डरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विध्वंस सुरू असून, तो तातडीने थांबवण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
तसेच १९५८ च्या सांस्कृतिक पुरातत्त्व विभागाच्या अधिनियमाचे उल्लंघन करून राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे, संत तुकोबांच्या तपोभूमी डोंगराभोवती तटबंदी उभारावी व घोराडा-भंडारा-भामचंद्र डोंगरांना सन २०११ च्या अधिसूचनेनुसार कायमस्वरूपी सुरक्षा देण्यासाठी शासनाने तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणी प्रत्यक्ष भेटीत मांडण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांसाठी तयार केलेले निवेदनही शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सादर करण्यात आले.
या मागण्यांना प्रतिसाद देताना माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, “या प्रकरणात मी जातीने लक्ष घालेन व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन.”
या भेटीप्रसंगी शिवेंद्रसिंह राजे यांच्या पत्नी सौ. वेदांकी राजे भोसले यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना “तुकोबा! संतभूमीच्या रणांगणात” ही भामचंद्र डोंगर संघर्षाचा इतिहास मांडणारी पुस्तिका भेट देण्यात आली. तसेच छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेत बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या बदलांकडेही लक्ष वेधण्यात आले. सौ. वेदांकी राजे भोसले यांनी ही पुस्तिका वाचून या विषयावर गांभीर्याने चर्चा करून योग्य निर्णयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात कै. महाराज अभयसिंह राजे भोसले यांचे जुने कार्यकर्ते श्री. बाळासाहेब शितोळे (आंबेवाडी), वास्तुविशारद तज्ज्ञ सुभाष शामराव निकम (अपशिंगे), अजिंक्यतारा साखर कारखान्याचे शेती विभाग अधिकारी गजानन विभूते (फत्त्यापूर) तसेच संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संपर्क प्रमुख सचिन पाटील येरळीकर यांचा समावेश होता.
या भेटीची सविस्तर माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील यांनी दिली.
Monday, December 22, 2025
जो आत्महत्या करण्याचा विचार करतो त्यांनी हा लेख नक्की वाचावा
तुकोबारायांना अवघं चाळीस-एक्केचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलं आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खूप दुःखांचा सामना करावा लागला . सांसारिक आयुष्य एक्केचाळीस वर्षांचं लाभलं तरी खऱ्या अर्थाने ज्याला सामाजिक आयुष्य म्हणतात ते फक्त एकोणीस-वीस वर्षांचंच होतं. या अल्प आयुष्यात तुकोबारायांनी हजारो अभंग रचले, सांसारिक सुखदुःखं अनुभवली,
आणि सामाजिक सुखदुःखांवरही भाष्य केलं. समाजाच्या हाडामसात रुजलेल्या जुनाट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवाधर्माच्या नावावर माजवण्यात आलेलं कर्मकांड आणि होत असलेलं शोषण, जन्माधिष्ठीत उच्चनीचता, स्त्रीया आणि शूद्रातीशूद्रांची गुलामगिरी याविरोधात त्यांनी संघर्ष केला.तसं तुकोबारायांचं घराणं चांगलं तालेवार घराणं होतं. त्यांच्या घरात पिढीजात सावकारी होती. शेती होती. बागायत होती. किराणा दुकान होतं. व्यापार होता.थोरला भाऊ सावजी आध्यात्मिक वृत्तीचा होता. त्याच्या पत्नीचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर सावजी एक दिवस कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. त्याने संन्यास घेतला असं सांगितलं जातं. सुनेचा मृत्यू आणि मुलाचं घर सोडून जाणं यामुळे बोल्होबा, तुकोबारायांचे वडील, खचले. त्यामुळे संसाराचा भार आला फक्त बारा वर्षांच्या तुकोबारायांवर ! तो त्यांनी यशस्वीपणे पेललाही. तुकोबारायांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगाही झाला. पण पत्नी सतत आजारीच असायची. म्हणून बोल्होबांनी तुकोबारायांचं दुसरं लग्न पुण्याच्या गुळवे सावकाराच्या मुलीशी करुन दिलं. जरा बरे दिवस आले तोच पुन्हा महाभयंकर दुष्काळ पडला. सतत तीन वर्षांच्या दुष्काळाने सामान्य लोकांची स्थिती त्राही माम्, त्राही माम् अशी झाली. अन्न नाही, पाणी नाही. लोकांनी झाडाचा पाला पोटात भरला. कित्येक लोक अन्न अन्न करत मेले. कित्येकांनी पोटचे गोळे बाजारात विकले. पशूपक्षी किती मेले त्याची तर गणतीच नाही. तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा याच दरम्यान मृत्यू झाला. पाठोपाठ वडिल गेले. आईही गेली. *संकटं येतात तेंव्हा एकटी येत नाही* असं म्हणतात. सुखाचे काही क्षण मिळत नाही तोच दु:खाचे पहाड अंगावर कोसळावेत असं आयुष्य सुरु होतं. म्हणून तुकोबाराय एका म्हणतात,"सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वता एवढे ।।" ही तुकोबारायांची आत्मानुभूती होती. आपण आपल्यावर थोडं दुःख झालं की डळमळीत होऊन जातो थोडाही धीर धरत नाही यावर तुकोबाराय म्हणतात
*आला होता गेला पूर l धीर धरिला जीवनी ll*
माझ्या आयुष्यात पुराएवढी खूप दुःख आणि संकट आली , पण त्यावेळी त्यांना मी धीराने तोंड दिलं म्हणून जशी दुःख आली तशी निघूनही गेली. कठीण काळात माणसांनी शांत राहायचं आणि असतं जे जे होईल त्याला धीराने सामोर जायचं असतं. काळाचे चक्र थांबत नसतं. फक्त थोडा संयम ठेवावा लागतो, बदल होतो.कितीही बिकट किंवा प्रतिकूल परिस्थिती किंवा नैराश्यपूर्ण वातावरण असलं तरीही हिंमत न हरता, धीर धरुन, विचारपूर्वक पावलं टाकली तर यश निश्चित असतं आणि तसंच आलेल्या परिस्थितीतून बाहेरही पडता येतं.तथागत भगवान गोतम बुद्धांनी सांगितलं आहे, "जग अनिच्च आहे." सर्वच अनिच्च म्हणजे अनित्य असेल तर सुखही राहणार नाही तसंच दु:खही राहणार नाही. संकटाचा काळही कायम राहणार नाही. काळ बदलणारच आहे. प्रतिकूल काळही जाणारच आहे. कितीही अंधारी रात्र असली तरी तिचा अंत होणारच आहे. उद्याचा सूर्य उगवणारच आहे. त्याला कोणीही अडवू शकणार नाही. धीर सोडला नाही तर काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. यावर विश्वास ठेवून जो जगतो तो जिंकतो आणि आपल्या आजूबाजूला ही अशी आपल्याला दिसतात सुद्धा.छत्रपती शिवरायांच्या जीवनात सुद्धा अतिशय कठीण आणि दुःखाचे प्रसंग आले होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात अनेक प्रसंगी केवळ शौर्य आणि धैर्य या बळावर विजय प्राप्त केला आहे. म्हणून संकट प्रसंगी माणसाने धीर सोडू नये. एका अभंगात तुकोबाराय म्हणतात “धीर तो कारण l साह्य होतो नारायण ।l” जो धीर धरतो त्याला देव मदत करतो. जो घाबरून पळून जातो त्याला नाही. म्हणून आपल्यावर आलेल्या परिस्थितीला सक्षमपणे , धीराने आणि संयमाने तोंड द्यावे.
- जय जगद्गुरु तुकोबाराय
- धर्मापुत्र
करिअरवर प्रेम असले की काय होते नक्की वाचा
"तू माझ्या लायकीचा नाहीस संग्राम... आरश्यात चेहरा बघितलायस का तुझा? माझ्या पायातील सँडलची किंमत तुझ्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे..." भर कॉलेजच्या गेटवर सायलीने संग्रामचा अपमान केला आणि तोच अपमान संग्रामच्या काळजात जिवंत निखाऱ्यासारखा पे_टत राहिला!
कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावातली संग्राम आणि सायलीची जोडी म्हणजे शाळेपासूनची 'फेव्हरेट लव्ह स्टोरी'. दहावीच्या निरोपाच्या दिवशी शाळेच्या पटांगणात वडाच्या झाडाखाली उभं राहून संग्रामने सायलीला वचन दिलं होतं, "बाळा, परिस्थिती गरीब आहे ग माझी, पण तुला राणीसारखं ठेवेन. आपण लग्न करू." सायलीने लाजून होकार दिला होता.
शाळा संपली. सायली पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात गेली आणि संग्राम घरची शेती सांभाळत गावातल्या कॉलेजमध्ये जाऊ लागला. सुरुवातीला दोघे तासनतास फोनवर बोलायचे. संग्राम शेतात राबून, भाजी विकून साठवलेले पैसे सायलीच्या मोबाईल रिचार्जसाठी पाठवायचा.
पण शहराचा वारा सायलीला लागला. कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांच्या गाड्या, त्यांचे महागडे कपडे, मॉलमध्ये फिरणं हे पाहून सायलीचे डोळे दिपले. तिला तिच्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड्स भारी गिफ्ट्स देताना दिसायचे. तिला वाटू लागलं, "माझा बॉयफ्रेंड तर नुसता शेतकरी आहे, गावंढळ आहे. तो मला काय देणार?"
हळूहळू तिने संग्रामचे फोन उचलणे बंद केले. मेसेजला रिप्लाय उशिरा येऊ लागले.
एकदा संग्रामने कसाबसा पैसा जमवून तिला वाढदिवसाला कुरिअरने एक छानसा ड्रेस पाठवला. पण सायलीने फोन करून त्याला सुनावले, "संग्राम, काय हे चिंध्यांसारखे कपडे पाठवलेत? माझ्या कॉलेजमध्ये मुली ब्रँडेड घालतात. तुला स्टॅंडर्ड कळतं का रे?" संग्रामच्या मनाला खूप लागलं, पण प्रेमापोटी तो गप्प राहिला.
काही दिवसांतच सायलीने कॉलेजमधल्या 'रोहित' नावाच्या एका श्रीमंत मुलाशी मैत्री केली. रोहित तिला कारमधून फिरवायचा, महागड्या हॉटेलमध्ये नेायचा. संग्रामला हे मित्रांकडून कळलं तेव्हा तो कोलमडला. तो रडत तिला फोन करू लागला, पण तिने नंबर ब्लॉक केला. त्याने वेड्यासारखे तिच्या मैत्रिणींचे नंबर मिळवले, त्यांना विनवण्या केल्या, "प्लीज ताई, एकदा माझं सायलीशी बोलणं करून द्या, मी तिच्याशिवाय मरून जाईन." पण त्या मैत्रिणींनी उलट त्याची चेष्टा केली.
संग्रामला राहवलं नाही. तो तसाच एसटीने पुण्यात आला. तिचा कॉलेजच्या गेटवर तासनतास उभा राहिला. दुपार झाली, सायली रोहितच्या कारमधून खाली उतरली. ती खूप मॉडर्न दिसत होती. संग्राम धावत तिच्या जवळ गेला.
"सायली..." त्याचे डोळे भरले होते.
तिने रागाने मागे वळून पाहिलं. "तू? इथे काय करतोयस भिकारड्यासारखा?"
संग्रामने तिचे हात पकडले, तो गुडघ्यावर बसला. "सायली, तोडू नकोस ग आपलं नातं. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. मी मेहनत करीन, तुला हवं ते देईन, पण मला सोडून जाऊ नकोस." तो ढसाढसा रडत होता.
कॉलेजची मुलं जमा झाली. सायलीच्या मैत्रिणी कुत्सितपणे हसल्या. "हहाहा, सायली हा तुझा तो गावठी बॉयफ्रेंड का ग?"
सायलीचा अहंकार दुखावला. तिने सर्वांसमोर संग्रामच्या थोबाडीत मारली. "माझ्या जवळ येऊ नकोस. तुझी लायकी आहे का माझ्याशी बोलण्याची? गेट लॉस्ट!"
तेवढ्यात रोहित आला. "ए ए, कोण रे तू? माझ्या गर्लफ्रेंडला त्रास देतोस?" रोहितने आणि त्याच्या मित्रांनी मिळून संग्रामला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. संग्राम र_क्ताळला, कपडे फाटले, पण त्याची नजर फक्त सायलीवर होती. पण सायलीने एकदाही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही. उलट ती रोहितच्या हातात हात घालून निघून गेली.
त्या दिवशी पुणे स्टेशनवर बसून संग्राम रात्रभर रडला. पण त्या अश्रूंसोबतच त्याच्यातल्या जुन्या 'प्रेमवेड्या' मुलाचा अंत झाला होता. त्याने ठरवलं, "आता प्रेम नाही, जिद्द पेटवायची. ज्या लायकीवरून तिने मला हिणवलं, तीच लायकी कमवून दाखवायची."
संग्राम गावी परतला. त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. शेतीसोबतच त्याने 'एमपीएससी'चा अभ्यास सुरू केला. दिवस-रात्र एक केली. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष दिलं नाही.
पाच वर्षानंतर...
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) लोकांची गर्दी होती. सायली एका फाईलसाठी हेलपाटे मारत होती. रोहितचा बिझनेस जुगारात आणि व्यसनात बुडाला होता. त्यांच्या जमिनीचा लिलाव होणार होता आणि तो थांबवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सही हवी होती.
शिपायाने नाव पुकारले, "मिसेस सायली रोहित कदम, साहेबांनी आत बोलावलंय."
सायली केबिनमध्ये गेली. ती रडवेली झाली होती. "सर, प्लीज आमचं घर वाचवा, ही सही नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावर येऊ."
समोरच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याने फाईलवरून नजर वर केली. ते भेदक डोळे, तो रुबाब आणि चेहऱ्यावर एक गंभीर शांतता.
तो 'संग्राम' होता. आता तो 'उपजिल्हाधिकारी' (Deputy Collector) झाला होता.
सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे शब्द तोंडातच अडकले. "संग्राम... तू?"
संग्रामने शांतपणे पेन उघडलं. तिच्याकडे बघून तो हसला नाही की रागावला नाही. त्याच्या नजरेत आता प्रेम नव्हतं, फक्त कर्तव्य होतं.
त्याने फाईलवर सही केली आणि फाईल तिच्याकडे सरकवली.
सायलीला रडू कोसळलं. "संग्राम, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. त्या रोहितने मला बर्बाद केलं. तुझं प्रेम..."
संग्रामने हात वर करून तिला थांबवलं. "मॅडम, तुमचं काम झालंय. तुम्ही जाऊ शकता. बाहेर खूप लोक ताटकळत आहेत."
"संग्राम, एकदा तरी बोल ना..." तिने विनवणी केली.
संग्रामने शिपायाला बेल वाजवून बोलावलं आणि शांतपणे म्हणाला, "ज्या मुलाला तू कॉलेजच्या गेटवर मारलंस, तो तिथेच मेला. या खुर्चीवर जो बसलाय, तो फक्त एक अधिकारी आहे. आणि हो, जाताना गेटवरच्या वॉचमनला सलाम करून जा, कारण पाच वर्षांपूर्वी एका 'भिकारी' समजल्या जाणाऱ्या मुलामुळेच आज तुला ही सही मिळाली आहे."
सायली फाईल छातीशी धरून रडत केबिनबाहेर पडली. तिला आज कळलं होतं की, ती ज्याला दगड समजून सोडून गेली होती, तो खरं तर 'हिरा' होता, जो आता तिच्या नशिबात उरला नव्हता.
हरिद्वार से महाराष्ट्र पुणे तक साइकिल यात्रा का प्रेरणादायी शुभारंभ
हरिद्वार - योग साधक संजय वाघ (निवासी: रांजणी, तहसील आंबेगांव) और नंदू जाधव (निवासी: केंदुर, तहसील शिरूर) ने हरिद्वार से साइकिल द्वारा अपने वापसी के सफर की शुरुआत की है। योग, स्वास्थ्य जागरूकता और समाजप्रबोधन के उद्देश्य से की जा रही इस साहसिक यात्रा की सर्वत्र सराहना हो रही है।
इस अवसर पर आदरणीय श्री परमार्थ देवजी तथा श्री राकेश कुमार जी ने दोनों योग साधकों को आशीर्वाद एवं शुभकामनाएं दीं और उनके साहस, दृढ़ संकल्प तथा सेवा भावना की मुक्तकंठ से प्रशंसा की। उन्होंने संदेश दिया कि योग का प्रसार और प्रचार और अधिक जोश के साथ करें, ताकि अधिक से अधिक लोग स्वस्थ जीवन की ओर अग्रसर हों।
पवित्र हरिद्वार नगरी से प्रारंभ हुई यह साइकिल यात्रा युवाओं सहित समाज के प्रत्येक वर्ग को योग, स्वास्थ्य और सकारात्मक जीवनशैली अपनाने के लिए प्रेरित करने वाली सिद्ध होगी
Subscribe to:
Comments (Atom)










