SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Friday, December 5, 2025
डॉ. अप्पा साहेब कड यांना ‘जीवन गौरव पुरस्कार प्रदान ’ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या योद्ध्याचा सन्मान
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी जनहित फाऊंडेशन, आळंदी देवाची व पसायदान गुरुकुल पंचमुखी शिक्षा पद्धती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अप्पा साहेब कड यांच्या ६५व्या वाढदिवसा निमित्त त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या अतुलनीय सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
शेतकरी कुणबी मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब कड यांना जीवन गौरव पुरस्कार उत्तरप्रदेश लखनव चे माजी आमदार चंद्रिका प्रसाद, आळंदी जनहित फाउंडेशन सचिव रामदास दाभाडे, शालेय वारकरी संप्रदायातील साधक मुले यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संयोजक योगेश वाघ गुरुजी, आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त व जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विश्वनाथ पोटवडे, शिवाजी घारे, दत्तशेठ लोणारी, गौतम पाटोळे, हमीद शेख, दिनकर तांबे, कैवल्य टोपे, रामेश्वर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अप्पा साहेब कड हे शेतकरी कुणबी मराठा संघाचे अध्यक्ष असून, त्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अखंड लढाईत अर्पण केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करताना त्यांनी स्वतःचे सुख, वेळ व आयुष्य बाजूला ठेवत केवळ समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले. त्यांची लढण्याची ताकद, जनतेसाठीची करुणा आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबासारखे मानण्याची वृत्ती यामुळे ते शेतकऱ्यांचे खरे पोशिंदे, मार्गदर्शक आणि आधारवड म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे अनेक संकटग्रस्त कुटुंबांना आधार मिळाला, अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले आणि समाजात सकारात्मक बदल घडवत त्यांनी अनेकांना नवजीवन दिले. त्यांच्या हस्ते डॉ. कड यांना सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले.आप्पासाहेब कड यांच्या मार्गशीर्ष पौर्णिमा जन्म दिनाचे औचित्य साधत जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्यानंतर सिद्धबेट येथे वृक्षारोपण करण्यात आले आणि पसायदान गुरुकुलातील बालगोपालांना स्नेहभोजन सुग्रास मेजवानी देऊन वातावरण आनंदमय झाले.
डॉ. अप्पा साहेब कड यांची सेवा, त्याग आणि संघर्षाची परंपरा ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही.
ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिवनातील आशा, लढाई आणि जगण्याचा प्रकाश आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे एका व्यक्तीचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा विजय आहे. या वेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त करीत जिरवण गौरव पुरस्कार करीत पुरस्काराची उंची वाढल्याचे मान्यवरांनी सांगितले.
प्रास्ताविक संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केले. आभार योगेश वाघ गुरुजी यांनी मानले.
आळंदी पंचक्रोशीत दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा मरकळला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मरकळ परिसरातील दत्तभक्त ताई माऊली महाराज यांच्या प्रेरणेने व सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या श्री दत्त जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची हरिनाम गजरात विविध उपक्रमांनी झाली. सांगता सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार गोरक्षनाथ महाराज वर्पे यांनी सुस्राव्य हृदयस्पर्शी कीर्तन सेवा रुजू केली. आळंदी परिसरातील विविध दत्त मंदिरात देखील दत्त जन्मोत्सव साजरा झाला. मंदिरात विविध ठिकाणी लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती.
भाविक, दत्त भक्त, ग्रामस्थ यांची श्रींचे दर्शनास कीर्तनास मोठी गर्दी झाली होती. काल्याच्या कीर्तनानंतर पुणे जिल्हा वारकरी महामंडळ अध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांच्या वतीने अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आला. मरकळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ दत्तभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगता समारंभात अखंड हरिनाम सप्ताह सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करून सामाजिक बांधिलकीतील ऋण व्यक्त करण्यात आले. दत्तजन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, होम हवन, यज्ञ, कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, प्रासादिक कार्यक्रम हृदयस्पर्शी हरिनाम गजरात धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाले. यावेळी आयोजित ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व श्रद्धाताई पांचाळ, अनुजा ननवरे, गुरुप्रसाद शिवशेहे यांनी ज्ञानेश्वरी व्यासपीठ नेतृत्व केले. गोरक्षनाथ महाराज वर्पे यांनी गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व केले. मरकळ येथील क्षेत्रपाध्ये वामन काका मरकळे यांनी पौरोहित्य करीत दत्त यज्ञ, लघु रुद्र, दत्तयाग आदी धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत मंगलमय वातावरणात वेदमंत्र जयघोष करीत सेवा रुजू केली.
अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे काकडा, नित्यार्ती, गुरुचरित्र व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, होम हवन, गाथा भजन, हरिपाठ, रात्रीची आरती, हरिकीर्तन आणि हरीजागर श्री गुरुदत्त जन्मोत्सवा निमित्त झाले. जन्मोत्सवा निमित्त भाऊसाहेब महाराज यादव, भक्ती दीदी पांचाळ, दत्तात्रय महाराज माशेरे, गजानन महाराज गारडे, बाळासाहेब महाराज शेवाळे, एकनाथ महाराज शिंदे, दत्तात्रय महाराज सुरतकर यांच्या कीर्तनासह गोरक्ष महाराज वर्पे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची सांगता हरिनाम गजरात झाली.
अखंड हरिनाम सप्ताहातील संगीत भजन सेवेत इंद्रायणी भजन मंडळ, जोगेश्वरी महिला भजन मंडळ, गडकर महिला भजन मंडळ, साई महिला भजन मंडळ, कानिफनाथ भजन मंडळ, भानोबा भजन मंडळ, वाघजाई महिला भजन मंडळ, नागेश्वर भजन मंडळ या भजनी मंडळांनी आपापल्या गावातील ग्रामस्थ भजन सेवेकेरी यांच्या उपस्थितीत संगीत भजन सेवा रुजू केली.
धार्मिक सोहळ्यातील विशेष अन्नदान सेवेत अर्जुन वाकचौरे बबन पवळे, राहुल वागस्कर, मारुती आरदाळकर, पंडित बिरासदार, बाळासाहेब होले, दत्ताभाऊ थिटे, रोहिदास कदम, विजय लबडे, गोरक्ष दरेकर, रामदास साकोरे , किरण साकोरे, श्री दाते, श्री भोसले, श्री कातोरें यांचेसह काल्याचे महाप्रसाद अन्नदान सेवा विलास तात्या बालवडकर यांनी रुजू करीत महाप्रसाद वाटप केले. पालखी मिरवणूक हरिनाम गजरात झाली.
दत्त जन्मोत्सवास ताई मऊली महाराज यांचे मार्गदर्शन व प्रेरणेत अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला. रोहिदास कदम, काळुराम घेणंद, प्रतीक पांचाळ, मानव महाराज पाटील, अरुणा गौंड, बबन पवळे, अर्जुन मेदनकर, कैलास होले, बजरंग सुतार, मरकळ ग्रामस्त, पदाधिकारी, मरकळ सोसायटी पदाधिकारी, ग्रामपंचायत आजी, माजी सारंच, उपसरपंच, सदस्य यांचेसह पंचलिंग श्रीगुरुदेव दत्त प्रतिष्ठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्तांचा सत्कार समारंभ संपन्न
आळंदी पुणे - श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर मधील सर्व घटकांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी व विश्वस्त यांचा सत्कार समारंभ श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणामध्ये दिमाखदार स्वरूपात संपन्न झाला.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करून करण्यात आले. दीपप्रज्वलन व माऊलींच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रशालेचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारांचे स्वागत, अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रशालेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळा भरण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण वर्ग राबवावेत, अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. वासुदेव महाराज शेवाळे व ज्यांच्या शुभहस्ते आजचा कार्यक्रम संपन्न झाला त्या आळंदी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित बिनविरोध नगरसेविका सुजाता कालिदास तापकीर व ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला ते आळंदी शहर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाटील यांचा माऊलींची मूर्ती, मोत्यांची माळ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तद्नंतर श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्त यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या ऊपस्थितीत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला, या मध्ये प्रथमतः श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेशकाका वडगावकर, सचिवपदी अजित वडगांवकर, खजिनदारपदी डॉ. ज्ञानेश्वर पाटील, विश्वस्तपदी प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे, योगेंद्र कुऱ्हाडे निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या बांधकाम समितीच्या चेअरमनपदी विलास सोपान कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराच्या शाळा समिती सदस्यपदी अनिल वडगांवकर व राहूल घुंडरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना विश्वस्त प्रकाश काळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' या कार्यक्रमामुळे प्रशालेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. भविष्यात देश-विदेशात पोहचावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व परदेशी भाषा यांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधांचा आलेख चढता असल्याचे नमूद केले.
आपल्या मनोगतात सचिव अजित वडगावकर म्हणाले की गेली सलग 25 वर्षे पुन्हा-पुन्हा हेच विश्र्वस्तङ व पदाधिकारी बिनविरोधपणे नव्याने निवडले जातात, हे सर्व या पदाधिकाऱ्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे. हे सर्व पदाधिकारी एक विचाराने राहून प्रशालांच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्न करतात. संस्थेची स्थापना खेड तालुक्याचे मा. आमदार स्व.पंढरीनाथ कबीरबुवा यांनी केली व पुढेमा.आमदार स्व. ताराचंद वडगांवकर यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. संस्थेच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत संस्थेच्या प्रगतीचा प्रवास थोडक्यात सांगितला. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे मा. उपाध्यक्ष विलास गोपाळराव कुऱ्हाडे यांचेही योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. गत 25 वर्षातील कामगिरी आणि भविष्यातील वाटचाल यामध्ये बदल करावा लागेल. तसेच शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी संस्था नेहमीच अनुकूल असल्याचे सांगीतले. या संस्थेवर माऊलींची कृपा कायम राहो आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हे भविष्यामध्ये विश्वविद्यालय होवो ही डॉ. नारायण महाराज जाधव यांची भावना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे नमूद केले. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेची आजपर्यंतची वाटचाल यशस्वीपणे होणे ही माऊलींचीच कृपा असल्याचे संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी सांगितले तसेच ज्या सदस्यांनी त्यांची निवड केली त्या सर्वांचे आभार आपल्या मनोगतातून व्यक्त केले व प्रशालेच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत राहू, असे आश्वासन दिले.
गेले 48 वर्ष संस्थेचे अध्यक्ष म्हणून संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली हे सर्व माऊलींच्या कृपेमुळेच शक्य झाले असल्याचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी सांगितले. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्त यांच्या निवडीबद्दल अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी अभिनंदन केले. प्रशालेच्या-संस्थेच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत राहू असे सांगितले.
डॉ. विकास पाटील यांनी प्रशालेचा नावलौकिक समाजामध्ये वाढत जाणार आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या प्रशालेतून अनेक गुणवंत विद्यार्थी बाहेर पडले त्यांना विविध निमित्ताने बोलवावे असे मत व्यक्त केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नगरसेविका सुजाता तापकीर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमासाठी निमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ह.भ.प. वासुदेव म. शेवाळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रामध्ये प्रशालेचा नावलौकिक वाढलेला आहे. तसेच शाळेच्या अनेक भविष्यात शाखा वाढाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कालिदास तापकीर, माध्यमिक पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष श्रेणिक क्षिरसागर, प्राथमिक पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष तेजश्री साळुंके, ललित फिरके, विश्वंभर पाटील, धनाजी काळे, माऊली जाधव, हनुमंत तापकीर, ज्योती श्रीखंडे, प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस माध्यमिक शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, शिक्षकेतर प्रतिनिधी संगीता पाटील, प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी वैशाली शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रक्षेपण ऑनलाईन करण्यात आले होते.सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी तर आभार प्रदीप काळे यांनी मानले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Thursday, December 4, 2025
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विज्ञान व संगणक प्रदर्शनाचे उदघाटन
पुणे आळंदी
'नाते विज्ञानाशी.. मैत्री संगणकाशी' हे ब्रीद घेऊन
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वारस्य वाढवणे, सर्जनशील प्रतिभेचे अन्वेषण करणे, चौकटीच्या बाहेर विचार करण्यास प्रोत्साहित करणे, संगणक , रोबोटिक्स , AI ओळख करून घेणे .पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विज्ञान व संगणकाचे सखोल ज्ञान वाढवणे या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. इसाक सिखलगार मेकॅनिकल इंजिनिअरिंग एमआयटी (HOD ) यांच्या शुभ हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्याचे 71 प्रकल्प मांडले होते. यामध्ये दळणवळण, ऊर्जा समस्या, शेती, जलशुद्धीकरण इ.विषयावर प्रकल्प मांडले. संगणक प्रदर्शनाच्या निमित्ताने रांगोळी प्रदर्शन व्हिडिओ क्लीप , नाटिका आयोजन करण्यात आले . विज्ञान अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री अजित वडगावकर ,प्रशालेचे मुख्याध्यापक सुर्यकांत मुंगसे, उपमुख्याध्यापक किसन राठोड पर्यवेक्षिका अनिता पडळकर अनुजायीनी राजहंस, विज्ञान विभाग प्रमुख संजय उदमले, नारायण पिंगळे, संजय कंठाळे, मनिषा पवार ,कल्पना घोलप, आरती वडगणे, अनुराधा खेसे, योगेश मठपती, पूजा चौधरी, संगणक विभाग प्रमुख आल्हाट सर , उपप्रमुख स्वागती कदम , मोनिका जगताप, यमुना कुऱ्हाडे , प्रज्ञा यादव , सुजाता गोगावले , शेख . आय . एन , विज्ञान प्रयोगशाळा प्रमुख अरविंद शिंदे , राजू सोनावणे,अजित मेदनकर आदी उपस्थित होते.
संगणक विभागात नाटिका व व्हिडीओ सादरीकरण झाले .
उदघाटनानंतर प्रमुख पाहुणे .श्री इसाक शिखलगार यांनी वैदिक
गणित रोबोटिक्स ,AI , हे भविष्यात गरजेचे आहे हे सांगितले . सचिव श्री अजित वडगावकर यांनी विज्ञानाच्या पलीकडेही ज्ञान असून तेही महत्वाचे आहे हे सांगितले . प्राचार्य श्री सूर्यकांत मुंगसे सर यांनी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन संशोधक निर्माण होतील असे मत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरावर इन्स्पायर अवॉर्ड सहभागी अनिशा अरविंद शिंदे हिचा सत्कार संपन्न झाला . मदर अँड सन्स च्या असिस्टंट मॅनेजर शिल्का सिंग यांनी विद्यार्थ्यांचे प्रकल्प पाहून त्यांचे कौतुक केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय उदमले यांनी केले. तसेच सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व अनुराधा खेसे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले . .पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Sunday, November 30, 2025
विचारांच्या प्रगल्भतेमुळे आळंदी हे येत्या शतकात होणार विश्वाचे केंद्र- स्वामी गोविंददेव गिरीजी
पुणे आळंदी - गीता जयंतीचे औचित्य साधून वेदश्री तपोवन येथे 22 नोव्हें ते 27 नोव्हें 2025 या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांमधून बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव वेदश्री तपोवनच्या पावन भूमीत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी आणि हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
जीवन आणि संस्कृतीचे सार भगवद्गीता आहे आणि भगवद्गीता हा वेदांचा छोटा अवतार आणि सोपे रूप आहे. या भगवद्गीतेचे वाचन आणि श्रवण आळंदीच्या भूमीमध्ये होते. वैश्विक विचार माऊलींच्या साहित्यात आणि जीवनात आढळतात. विचारांच्या या प्रगल्भतेमुळे आळंदी हे येत्या शतकात विश्वाचे केंद्र होणार असा विश्वास स्वामीजींनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. विद्यार्थ्यांना योगा, सूर्यनमस्कार आणि गीता पाठांतराच्या माध्यमातून आपल्या संस्काराने संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
लाठी काठी स्पर्धा
प्रथम आरोही लक्ष्मण तांदळे (मोठा गट)
द्वितीय - संचिता डामरे (छोटा गट)
उत्तेजनार्थ गौराई ठोंबरे (मोठा गट)
वक्तृत्व स्पर्धा द्वितीय - ज्ञानेश्वरी ढगे (मोठा गट)
श्रीमद्भगवद्गीता पाठांतर स्पर्धा तृतीय- गायत्री इतिराज लोहोर (मोठा गट)
निबंध स्पर्धा उत्तेजनार्थ - सिद्धी सतीश थोरबोले
या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपयांची बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,.प्रकल्प समन्वयिका सौ उज्वला कडलासकर मार्गदर्शक शिक्षक श्री नारायण पिंगळे, श्री प्रमोद कुलकर्णी, सौ सोनाली आवारी ,श्री रामदास वहिले, सौ सोळंके मॅडम, श्रीम.भारती तायडे ,सौ प्रियंका भुजबळ यांचे व विद्यार्थी पालकांचे कौतुक करून अभिनंदन केले.
Thursday, November 20, 2025
श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना 'आयडियल स्टडी ऍप' मोफत वाटप
पुणे आळंदी - रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना *' आयडियल स्टडी'* या अभ्यासक्रमावरील मोबाईल ॲप चे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रो. मा. श्री. नरेंद्रशेठ गांधी
(असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब इंदापूर, पुणे),रो. मा. श्री. निखिल शहा (अध्यक्ष रोटरी क्लब इंदापूर) यांच्या शुभहस्ते आणि रो. मा. श्री. धरमचंद लोढा (अध्यक्ष भारतीय जैन संघ इंदापूर) व रो. मा. श्री. बाळासाहेब क्षीरसागर. मा . श्री. संदीपभाऊ भाबड (अध्यक्ष लोकशिक्षण संस्था सिन्नर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सचिव अजित वडगावकर यांनी प्रस्ताविकामध्ये संस्थेच्या आणि रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थी हितासाठी सर्वांनी संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले . संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना पुरवलेल्या ऍप बद्दल रोटरी क्लबचे आभार मानले.
रो. मा. श्री. नरेंद्रशेठ गांधी यांनी सांगीतले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत यश प्राप्तीसाठी या 'आयडियल स्टडी ऍप' निर्मिती केली आहे आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना या ऍपचे मोफत वाटप केले आहे. विद्यार्थ्यांनी या ॲप चा वापर करून दहावी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करावे असे आवाहन केले. याप्रसंगी धरमचंद लोढा (भारतीय जैन संघ इंदापूर), नितीन शहा (रोटरी क्लब इंदापूर) आणि संदीप भाबड (अध्यक्ष- लोकशिक्षण संस्था सिन्नर) यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमांमध्ये लोकशिक्षण संस्था, सिन्नर यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळातून अध्यक्षपदी फेरनिवडीसाठी सुरेश वडगावकर आणि सर्व विश्वस्त ,कार्यकारणी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त एल.जी. घुंडरे, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, उप मुख्याध्यापक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, संस्था सदस्य अनिल वडगावकर, राहुल घुंडरे प्रदीप काळे, इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक, सौ कदम एस. आर,श्रीम.जगताप मॅडम ऊपस्थित होते.
सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे व आभार सूर्यकांत मुंगसे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमांचा समारोप झाला.
Tuesday, November 18, 2025
स्व.भरत साहेब सदार यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
(खडकी सदार )येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भरत साहेब सदार .
यांच्या ७ व्या पुण्यस्मरना निमित्त पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री जाधव सर (मुख्याध्यापक) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 नोव्हेंबर मंगळवार रोजी ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ स्वातीताई सदार (अध्यक्षा संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार )प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील सदर तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये श्री संजू भाऊ सदार ( उपाध्यक्ष संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार) व श्री संदीप भाऊ सदार (सचिव संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार) तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्व.भरत साहेब सदार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पाटी लेखन हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांना रोजचा अभ्यास पाटीवर कसा करायचा गणित ,इंग्रजी ,विज्ञान,
या सारख्या अवघड विषयाच्या संकल्पना पाटीवर लिहून त्याचा सराव करायचा; अशाप्रकारे डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी उपक्रमाचे महत्त्व समजून सांगितले. कार्यक्रमाच्याअध्यक्षा सौ. स्वातीताई सदार यांनी विद्यार्थ्यांना स्व.भरत साहेबांच्या जीवन संघर्षाची संपूर्ण माहिती दिली. कोणत्या परिस्थितीत त्यांनी ही शाळा उभारली व चालवली. त्यांना कशा अडचणी आल्या याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले. अशाप्रकारे आमच्या विद्यालया मध्ये स्व. साहेब सदार आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाठोरे सर, तसेच आभार प्रदर्शन श्री बकाल सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री वायाळ सर, श्री फुकाटे सर, श्री माधव खडसे, श्री माधव मार्कड व श्री मंगेश कोरडे यांनी परिश्रम घेतले.
Tuesday, November 4, 2025
*घुमान सायकलवारीचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत स्वागत
आळंदी पुणे - श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये वारकरी सांप्रदायाच्या संत साहित्याचे प्रचारक, प्रसारक नामदेव महाराज यांच्या पादुकांचे, वारकरी, सायकल स्वारांचे ढोल, ताशे, टाळ मृदंग व पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी वारीचे संयोजक भिसे, मनोज मांढरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, संस्था सदस्य विलास सोपान कुऱ्हाडे, पत्रकार विठ्ठल शिंदे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, गुरुनानक यांच्या प्रतिमेचे व संत नामदेवांच्या पादुकांचे पूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. वारीचे संयोजक मनोज मांढरे यांचा सन्मान संस्थेच्या वतीने सुरेश वडगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला.अजित वडगांवकर यांनी सर्व सायकल स्वार, वारकरी यांचे स्वागत केले, आषाढीवारी प्रमाणे ही वारी गेले चार वर्षे पंढरपूर पासून घुमानमध्ये जाते, असे सांगत हैबतबाबांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी पालखी सोहळा चालू केला तेव्हा परिस्थिती प्रतिकूल होती व सहभागी वारकऱ्यांची संख्याही कमी होती.परंतू आज सोहळ्यांचे वाढलेले वैभव आपण पाहतो."इवलेसे रोप लावियेले द्वारी | तयाचा वेलू गेला गगनावरी ||"या ऊक्ती प्रमाणे ही घुमान वारी पूढे स्वरूप धारण करो अशी माऊलींकडे
प्रार्थना करीत या वारीसाठी शुभेच्छा दिल्या. सालाबाद प्रमाणे पुढील वर्षीही ही वारी संस्थेच्या प्रांगणात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वारीचे संयोजक, आयोजक यांनी संस्थेच्या प्रांगणामध्ये वारीचा रथ व पादुका आणल्याबद्दल आभार मानले.
मनोज मांढरे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुढील अनेक राज्यातून
जाणाऱ्या वारीसाठी शुभेच्छा दिल्याबद्दल व सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. सतीश जाधव यांनी विद्यार्थ्यांनी सायकल चालवावी, प्रदूषण मुक्त जीवन जगावे. तसेच पुढील वर्षापासून तुमच्या पालकांना आरोग्यदायी सायकलवारीमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान करा असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन राहुल चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
Tuesday, October 14, 2025
आळंदीतील मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील तसेच प्रभाग क्रमांक नऊ सह परिसरातील मोकाट कुत्रे यांचा मोठा त्रास होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे.
या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना घुले यांनी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील हिंदवी कॉलनी १, २, वाघजाई मंदिर परिसर, दगड़े बिल्डिंग परिसर तसेच चावडी चौक गावठाण येथील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे यांची संख्या वाढली आहे. या मुळे परिसरात ये जा करणे धोक्याचे झाल्याने भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक यांना रहदारी करणे गैरसोयीचे झाले आहे. यामुळे आळंदी नगरपरिषदेने तात्काळ या भागातील मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तात्काळ कार्यवाही होऊन परिसर मोकाट कुत्रे भय मुक्त व्हावा. या साठी प्राधान्याने प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांचे वतीने घुले यांनी केली आहे.
Subscribe to:
Comments (Atom)









